AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जेलमधून बाहेर पडल्यानंतर उद्धव ठाकरे फोनवर काय म्हणाले? संजय राऊत म्हणतात…

संजय राऊत यांची जेलमधून बाहेर पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर बातचित झाली.

जेलमधून बाहेर पडल्यानंतर उद्धव ठाकरे फोनवर काय म्हणाले? संजय राऊत म्हणतात...
| Updated on: Nov 09, 2022 | 8:08 PM
Share

मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांची आज अखेर 102 दिवसांनी जेलमधून जामिनावर सूटका झालीय. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी त्यांना तीन महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली होती. गेल्या अनेक दिवसांपासून राऊत त्यांच्या जामिनाची वाट पाहत होते. अखेर त्यांना आज जामीन मिळाला. राऊतांना जामीन मिळाल्यानंतर शिवसेनेत एक वेगळं चैतन्य संचारलं आहे. या दरम्यान जामीन मिळाल्यानंतर त्यांचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर बातचित झाली का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनी हो असं उत्तर दिलं. तसेच ठाकरेंसोबत आणखी काय बातचित झाली, याबाबतची त्यांनी माहिती दिली.

“उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर बातचित झाली. तेही माझा आवाज ऐकण्याची वाट पाहत होते. त्यांचाही घसा भरुन आला होता”, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.

“जामिनाच्या निकालानंतर माझा न्यायालयावरचा विश्वास वाढला. न्यायव्यवस्था, घटना, कायदा जीवंत आहे”, असं संजय राऊत म्हणाले.

संजय राऊत यांनी जेलमध्ये असताना आपल्या आईला पत्र पाठवलं होतं. राऊत जेलमध्ये गेले तेव्हा त्यांच्या आईंना रडू आलं होतं. याबाबतही त्यांनी प्रतिक्रिया दिली. “मला अटक झाली तेव्हा माझ्या आईप्रमाणेच महाराष्ट्रातल्या अनेक आया अशा आहेत ज्यांच्या डोळ्यांत पाणी आलं”, असं संजय राऊत म्हणाले.

यावेळी संजय राऊत यांनी जेलमधून बाहेर पडल्यानंतर आधी कुठे जाणार याबाबत माहिती दिली. “सुनील राऊत माझ्यासोबत आहेत. त्यांच्यासोबत मी देवळात जातोय. त्यानंतर मी कदाचित शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना भेटेन. नंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी प्रथम जाणं गरजेचं आहे”, असं संजय राऊत म्हणाले.

यावेळी संजय राऊतांना शिवसेनेच्या बंडखोर आमदारांबद्दल विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी रोखठोक भूमिका मांडली. “सोडून जाऊद्या. त्यांना आज एवढं प्रेम बघून, माझं स्वागत बघून त्यांना आपण चूक केली असं वाटलं असेल “, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Follow Us
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.