मुंबई : कोविड सेंटर मुंबई आणि महाराष्ट्रात झाले का? केवळ मुंबई मनपावर त्यांचा डोळा आहे. लाखोंच्या संख्येने कोरोना झालाय. आपत्ती व्यवस्थापनानुसार, अनेक अधिकार मनपा आयुक्तांकडे होते. निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींकडेही अधिकार होते. पूर्ण टास्क फोर्स नेमला होता. सर्वोच्च न्यायालयाने कोरोनाकाळात मुंबई, धारावीतील कामाची प्रसंशा केली होती. ते भाजपला दिसत नसल्याची टीका मनीषा कायंदे (Manisha Kayande) यांनी केली. दरम्यान, किरीट सोमय्या यांना आरोप करण्याची सवय आहे. भावना गवळी यांच्यावर त्यांनी आरोप केले होते. त्याचं काय झालं? अशावेळी किरीट सोमय्या पत्रकार परिषदेतून पळ काढतात.