AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोडून गेलेल्यांना परत घेणार का? पाहा उद्धव ठाकरे काय म्हणाले

महाविकासआघाडीची आज मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत नेत्यांनी मतदारांचे आभार मानले. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपला उत्तर दिलंय. त्यांनी मोदी आणि अमित शाहांवर देखील टीका केली. जे सोडून गेलेत त्यांना परत घेणार यावर त्यांनी काय उत्तर दिलं जाणून घ्या.

सोडून गेलेल्यांना परत घेणार का? पाहा उद्धव ठाकरे काय म्हणाले
shailesh musale
shailesh musale | Updated on: Jun 15, 2024 | 3:41 PM
Share

मुंबईत आज महाविकासआघाडीची संयुक्त पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपवर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, ‘मी २२ जानेवारीला काळाराम मंदिरात गेलो होते. २३ जानेवारी रोजी नाशिकमध्ये म्हटलं होतं की, भाजप मुक्त राम पाहिजे. अयोध्येत आणि नाशिकमध्ये भाजपमुक्त राम झाला आहे. जिथे जिथे राम आहे तिथे भाजपचा पराभव झालाय. भाजपमुक्त राम झाला आहे.’

उद्धव ठाकरे यांना जेव्हा विचारण्यात आलं की, जे लोकं सोडून गेलेत त्यांना पुन्हा घेणार का? यावर उद्धव ठाकरे यांनी अजिबात नाही असं उत्तर दिलं.

‘जेव्हा तीन पक्ष एकत्र पत्रकार परिषद घेतात. तेव्हा पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं तेव्हा आमची बैठक झाली आहेत. विधानसभेत सर्वांना सोबत घेणार. इतर घटक पक्षांना सोबत घेणार. राज्यात विधानसभा होणार आहे. इतर राज्यातही विधानसभा आहे. त्यामुळे तिथेही आपल्याला ताकद लावायची आहे.’

नरेटिव्ह भाजपनेच सेट केलं – ठाकरे

उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘एक जुनं गाणं आहे. पारिजात माझ्या दारी फुले का पडती शेजारी. माणिक वर्माचं गाणं आहे. तुम्हाला माहीत नसेल, शरद पवार यांना माहीत आहे. तरीही आम्ही पारिजातकाला पाणी घालायचं सोडणार नाही. काही महिन्यांपूर्वी अमित शाह म्हणाले होते, नीतीश कुमार यांच्यासाठी दरवाजे बंद है, चंद्राबाबूंसाठी बंद आहे.’

त्यांच्याच लोकांनी सांगितलं संविधान बदलणार आहे. त्यांनीच हा नरेटिव्ह सेट केला होता. अच्छे दिनाच्या नरेटिव्हचं काय झालं. १५ लाखाचं काय झालं. २०१४ पर्यंतच्या गोष्टी काढल्या तर नरेटिव्ह कुणी सेट केलं. असा टोला देखील उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.

आमच्यात मोठा भाऊ छोटा भाऊ नाही

‘आमच्यात कोणीही मोठा भाऊ छोटा भाऊ नाही. आम्ही एकत्र चर्चा केली आहे. प्राथमिक चर्चा झाली आहे. मागच्या विधानसभेचा आधार घेऊन जागा वाटप होईल. आमच्यात कोणताही किंतू परंतु नाही. असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले.

Follow Us
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती!
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई...
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई सुरु, धक्कादायक खुलासे
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचण
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचणी वाढल्या, गेल्या 3 तासांपासून...
बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश
Girish Mahajan | बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश!
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात...
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात... त्या जागेमुळे नेत्याने खदखद बाहेर काढली!
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारी
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारीबाबत संजय राऊतांचा मोठा दावा
महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर हल्लाबोल
Mumbai Shivsena UBT Protest | महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर जोरदार हल्लाबोल
अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
Monsoon Update | अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती जागांवर चुरशीची लढत
नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत
Vidhan Parishad Election | शेवटच्या मिनिटाला मोठा ट्विस्ट! नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत