AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महावितरणमध्ये 327 कनिष्ठ अभियंत्यांच्या भरतीसाठी ओबीसी समाज आक्रमक

महावितरणमध्ये 327 कनिष्ठ अभियंत्यांच्या भरतीसाठी ओबीसी समाज आक्रमक झालाय. ओबीसी समाजाताली तरुणांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचं निवासस्थान असलेल्या प्रकाशगड इथं आंदोलन सुरु केलं आहे.

महावितरणमध्ये 327 कनिष्ठ अभियंत्यांच्या भरतीसाठी ओबीसी समाज आक्रमक
| Updated on: Dec 21, 2020 | 3:09 PM
Share

मुंबई: मराठा आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. महावितरणमध्ये 327 कनिष्ठ अभियंत्यांच्या भरतीसाठी ओबीसी समाज आक्रमक झालाय. 11 महिन्यांपूर्वी निवड झाली मात्र अद्यापही नियुक्तीपत्र मिळालं नाही. त्यामुळे ओबीसी समाजाताली तरुणांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचं निवासस्थान असलेल्या प्रकाशगड इथं आंदोलन सुरु केलं आहे. या आंदोलनात ओबीसी समाजाचे नेते प्रकाश शेंडगे यांनीही उपस्थिती लावली.(Youth agitation in OBC community against the Ministry of Energy)

मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली निघेपर्यंत सगळी भरतीप्रक्रिया थांबवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. त्याचा फटका इतर समाजालाही बसतोय, असं मत शेंडगे यांनी व्यक्त केलं आहे. त्याचबरोबर ओबीसी समाजातील तरुणांना नोकरी दिली नाही तर राज्यात फिरु देणार नाही. ओबीसीच्या साडे आठ हजार मुलांना नियुक्त्या मिळाल्या नाहीत तर त्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरणार, असा इशाराही शेंडगे यांनी दिला आहे.

परीक्षा दिली, पासही झाले पण ओबीसी समाजातील उमेदवारांना अद्याप नियुक्त्या नाहीत. आंदोलन केल्यानंतर डायरेक्टरने आश्वासन दिलं की नियुक्ती पत्र जारी करु, पण विद्युत सहाय्यकांच्या निर्णय प्रलंबित ठेवला. त्यांचा निकाल का थांबवला, असा सवालही शेंडगे यांनी विचारलाय.

समीर भुजबळांच्या भूमिकेला विरोध

राष्ट्रवादीचे नेते समीर भूजबळ यांनी केलेलं वक्तव्य चुकीचं आहे. तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. त्याला ओबीसी नेत्यांचा पाठिंबा नाही. आम्ही त्यांच्या मताशी सहमत नाही. ओबीसींच्या मागण्यांसाठी आंदोलन सुरुच राहणार, असा दावाही शेंडगे यांनी केलाय. सरकार फक्त आश्वासनावर बोळवण करण्यात मग्न आहे. हे थांबलं नाही तर आम्ही राज्यभर आंदोलन करु, असा इशाराही त्यांनी दिलाय.

औरंगाबादेतील आंदोलनाचं रुपांतंर आभार मोर्चात!

औरंगाबादमध्ये ओबीसी आरक्षण बचाव मोर्चाचे नियोजन करण्यात आले होते. माजी खासदार समीर भुजबळ मोर्चात सहभागी झाले. महात्मा फुले पुतळ्यापासून सुरु होणाऱ्या मोर्चासाठी अनेक ओबीसी बांधव उपस्थित राहिले. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. दरम्यान, ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही, असं आश्वासन सभागृहात दिल्यामुळे आम्ही आजचा ओबीसी आरक्षण बचाव मोर्चा आभार मोर्चात बदलत आहोत, असं समीर भुजबळ यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

…आणि समीर भुजबळांच्या ‘ओबीसी आरक्षण बचाव मोर्चा’चं स्वरुप बदललं

Youth agitation in OBC community against the Ministry of Energy

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.