AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईकरांनो सावधान! दिल्ली पेक्षाही हवेची गुणवत्ता घसरली, एयर क्वालिटी इंडेक्स कितीवर?

मुंबईतील हवा प्रदूषित झाली आहे, हवेत धूलिकण पसरल्याची माहिती समोर येत असून ही परिस्थिती काही दिवस अशीच राहणार असल्याने दिल्ली पेक्षाही हवा प्रदूषण मुंबईत दिसून येणार असल्याचा अंदाज आहे.

मुंबईकरांनो सावधान! दिल्ली पेक्षाही हवेची गुणवत्ता घसरली, एयर क्वालिटी इंडेक्स कितीवर?
Image Credit source: Google
Kiran Balasaheb Tajne
Kiran Balasaheb Tajne | Updated on: Jan 19, 2023 | 9:35 AM
Share

मुंबई : नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच उत्तर भारतात थंडीची लाट आली आहे. त्याचा परिणाम मुंबईसह उपनगर आणि इतर जिल्ह्यात दिसून येत आहे. मुंबईतील हवामानाची स्थिती बघता थंडीचा जोर कायम आहे. दरम्यान, भारतीय हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार आठवडाभर हा थंडीचा जोर कायम राहणार असून वायु प्रदूषण देखील वाढणार आहे. त्यातच दिल्ली पेक्षाही हवेतील प्रदूषण मुंबईत आढळून येण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. मुंबईतील प्रदूषणाच्या पातळीत वाढ झाली असून हवेची गुणवत्ता ढासळत चालली आहे. एयर क्वालिटी इंडेक्स 300 अंकाच्या वर गेला आहे. सकाळच्या सत्रात देखील मुंबईच्या हवामानात मोठा बदल झालेला दिसून आला असून धुक्याची चादर मुंबईनगरीवर पडलेली दिसून आली आहे. आयएमडीच्या अंदाजानुसार असे हवामान आठवडाभर राहण्याची शक्यता असल्याने मुंबईत आठवडाभर असाच गारवा राहणार आहे.

उत्तरेकडून येणाऱ्या शीत लहरीमुळे मुंबईतील हवामानात देखील मोठा बदल झाला आहे. मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात आणि पश्चिम महाराष्ट्रात या थंडीचा प्रादुर्भाव अधिक जाणवत होता.

परंतु मुंबई सारख्या शहरात देखील थंडीचा जोर अधिकच वाढला असून हवेतील प्रदूषण देखील वाढले आहे, मुंबईसह उपनगरात धुकं दिसून येत असून सातत्याने हवेतील प्रदूषण वाढत आहे.

सफर संस्थेच्या माध्यमातून समोर आलेल्या आकडेवारीनुसार 300 अंकांच्या वर मुंबईचा एयर क्वालिटी इंडेक्स गेला असून ही पातळी अधिक गडद होण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही.

मुंबईतील हवा प्रदूषित झाली आहे, हवेत धूलिकण पसरल्याची माहिती समोर येत असून ही परिस्थिती काही दिवस अशीच राहणार असल्याने दिल्ली पेक्षाही हवा प्रदूषण मुंबईत दिसून येणार असल्याचा अंदाज आहे.

एकूणच उत्तरेकडील राज्यात असलेल्या कडाक्याचा थंडीचा सामना महाराष्ट्रासह मुंबईला देखील करावा लागत आहे. थंडी, धुके यामुळे हवा प्रदूषण मोठ्या प्रमाणात झाले असून दिल्लीपेक्षाही मुंबईचे हवामान दूषित होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

Follow Us
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोप
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोपांनी खळबळ!
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटा
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटांच्या चर्चेत... पहिली प्रतिक्रिया समोर
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरणी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
Mayank Lohar | लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
धक्कादायक! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट
Shirdi | साईबाबांच्या नगरीत धक्कादायक खुलासा! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट पेढे...
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णय
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची चर्चा
स्वार्थासाठी गेले, जनता हिशोब चुकता करणार! नाईकांचा खासदारांना इशारा
Vaibhav Naik | स्वार्थासाठी गेले, आता जनता हिशोब चुकता करणार! वैभव नाईकांचा फुटीर खासदारांना इशारा
विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट
Beed | विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट निर्णय घेतला; लवकरच...
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं!
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं! त्या वादाला आता नवं वळण!
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता बड्या नेत्याचं विधान चर्चेत