
Municipal Corporation Election 2026 : राज्यात आज म्हणजेच 15 जानेवारी रोजी एकूण 29 महापालिकांसाठी मतदान होत आहे. राज्यभरात हजारो मतदान केंद्रांवर लोक आपल्या मतदानाचा अधिकार बजावत आहेत. या मतदानाचा निकाल 16 जानेवारी रोजी लागणार आहे. दरम्यान, आज मतदानाचा दिवस असल्याने राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. राज्यात अनेक ठिकाणी बोगस मतदान होत आहे, असा आरोप विरोधी पक्षांच्या नेते तसेच उमेदवारांकडून केला जात आहे. सोबतच अनेक ठिकाणी दुबार मतदान होत आहे, असेही म्हटले जात आहे. असे असतानाच आता विरार आणि मालेगाव येथा बोगस मतदानाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तसा आरोप उमेदवारांकडून केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार विरारमध्ये बोगस मतदान झाल्याचा आरोप केला जात आहे. येथे महेश राठोड या मतदाराच्या नावावर दुसऱ्याने अगोदरच मतदान केल आहे, असे सांगितले जात आहे. विरारमधील प्रभाग क्रमांक तीनमध्ये ही घटना असल्याचे सांगितले आहे. घडलेल्या प्रकाराबाबत खुद्द महेश राठोड याच मतदाराने सविस्तर सांगितले आहे. मी मतदान करायला गेलो होतो. पण त्यांनी मला सांगितलं की तुमचे मतदान झालेले आहे. मग मी सांगितलं की मी आताच आलो. माझे मतदान कसे झाले.पण ते मला तुमचे मतदान झालेले आहे असे सांगत होते, अशी माहिती महेश राठोड यांनी दिली आहे.
संभाजीनगर : निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार - किशोर शितोळे
ठाण्यात ईव्हीएम मशीन घेऊन जाण्यावरून वाद
BMC Election 2026 Exit Poll Prediction : जेव्हीसीच्या एक्झिट पोलनुसार मुंबईत कोणाला किती जागा?
एक्झिट पोलनुसार मुंबईत शिवसेना ठाकरे गट, मनसेला धक्का
Nashik Election Poll Percentage : नाशिक महापालिकेसाठी 4.30 वाजेपर्यंत 41 टक्के मतदान
Nanded Election Poll Percentage : नांदेड महापालिकेसाठी 3.30 वाजेपर्यंत सरासरी 41.65 टक्के मतदान
दुसरीकडे दुबार मतदान झाल्याचा आरोप मालेगावमध्ये केला जातोय. येथे बोगस मतदान झाल्याच्या संशायमुळे गोंधळ घालण्यात आला. मालेगावमधील मतदान केंद्र क्रमांक 9 वर काही मतदार हे बोगस आहेत, असा आक्षेप एका उमेदवाराने घेतला. त्यानंतर वाद निर्माण झाल्यानंतर बोगस मतदाराने तिथून पळ काढला. आधार कार्डवर नाव नसूनही बोगस मतदान केल्याचा येथे आरोप करण्यात आला. वाद वाढल्यानंतर त्या मतदान केंद्रावर पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.
दरम्यान, या महापालिकेच्या निवडणुकीत नेमकं कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. काहीही झालं तरी सर्व महापालिकांमध्ये आमचाच विजय होणार, असा दावे प्रत्येक पक्ष करत आहे. विशेष म्हणजे मुंबई महापालिकेत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.