AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

समोरचा प्रत्येक व्यक्ती कोरोनाबाधित समजून वागाल, तरच वाचाल, तुकाराम मुंढेंनी रामबाण उपाय सांगितला!

समोरच्या प्रत्येक व्यक्तीला कोरोना आहे,असं समजून आपण खबरदारी घ्या, असा रामबाण उपाय तुकाराम मुंढे यांनी सांगितलं. (Tukaram Mundhes advice to Nagpurkars)

समोरचा प्रत्येक व्यक्ती कोरोनाबाधित समजून वागाल, तरच वाचाल, तुकाराम मुंढेंनी रामबाण उपाय सांगितला!
| Updated on: Jul 22, 2020 | 2:37 PM
Share

नागपूर : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कोरोना लढ्याविरोधात रामबाण उपाय सांगितला आहे. “जर कोरोना रोखायचा असेल तर एकच रामबाण उपाय आहे, तो म्हणजे समोरच्या प्रत्येक व्यक्तीला कोरोना आहे, असं समजून आपण खबरदारी घेणे. जर तसे नियम पाळले तर आणि तरच कोरोनाला दूर ठेवू शकतो” असं तुकाराम मुंढे म्हणाले. (Tukaram Mundhes advice to Nagpurkars)

तुकाराम मुंढे यांनी नागपुरात पत्रकार परिषद घेऊन कोरोना स्थितीची माहिती दिली. “कोरोनाच्याबाबतीत नागपूरची स्थिती नियंत्रित आहे असं म्हणता येणार नाही. स्वत:ला, कुटुंबाला आणि समाजाला वाचवण्यासाठी नियम पाळणे आवश्यक आहे. कोरोना थांबण्यासाठी रामबाण उपाय म्हणजे समोरच्या प्रत्येक व्यक्तीला कोरोना आहे, असं समजूनच आता राहिलं पाहिजे”. (Tukaram Mundhes advice to Nagpurkars)

अनलॉकिंगनंतर कोरोना रुग्ण आणि मृत्यूचं प्रमाण वाढले आहे. लोक नियम पाळत नाहीत, त्यामुळे रुग्ण वाढतात. लोक आजाराची माहिती लपवतात, त्यामुळे मृत्यू वाढले. मी दोन तासांत चार लाखांचा दंड वसूल केला. वेळ आली तर मी फक्त लॉकडाऊन करणार नाही, सोबत कर्फ्यू लावेन. आजच्या स्पीडने नागपुरात कोरोना रुग्ण वाढले, तर नागपुरात 10 हजारापेक्षा जास्त रुग्ण व्हायला वेळ लागणार नाही, असं तुकाराम मुंढे म्हणाले.

नागपूरात लॉकडाऊन करायचं असल्यास 14 ते 15 दिवसांचं करणार, सोबत कर्फ्यू असेल. लॉकडाऊन करण्यापूर्वी २-३ दिवस आधी लोकांना कळवण्यात येईल. लॉकडाऊन असेल तर बाहेर पडता येणार नाही, असं तुकाराम मुंढे यांनी ठणकावलं.

तुकाराम मुंढे काय म्हणाले?

नागरिक नियम पाळत नाहीत, त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढललेली आहे. याशिवाय मृत्यूदेखील वाढला आहे. मृत्यूमागील कारण म्हणजे लोक आपल्या आजारपणाविषयी माहिती देत नाहीत. ते लपवून ठेवतात. मृत्यूदर कमी करायचा असेल तर जे कुणी आजारी असतील त्यांनी डॉक्टराला दाखवून निदान करुन घ्यायचं. मात्र, नागरिक प्रामाणिकपणे नियमांचं पालन करताना दिसत नाहीत. जे नागरिक आजारी आहेत, ज्यांना ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास होतोय त्यांनी स्वत:हून तपासून घेणं जरुरीचं आहे.

लॉकडऊनमध्ये शिथिलता ही आपल्या जीवनाश्यक वस्तूंचा विचार करुन तसेच अर्थव्यवस्थेचा विचार करुन देण्यात आली आहे. या शिथिलतेची नियमवाली आहे. नागरिकांनी ही नियमावली पाळली पाहिजे. दुकानांमध्ये फक्त पाच लोकांना परवानगी आहे. मात्र, पाच ऐवजी दहा जण असल्याचं मी स्वत: बघितलं. फुटपाथवर गर्दी होते. ऑटो रिक्षाला परवानगी नाही, पण तरीही सर्रास सुरु आहेत. दुचाकीवर एकालाच परवानगी असताना दोन ते तीन जण एकाच दुचाकीवर जातात. मास्क वापरलं जात नाही. चारचाकी गाड्यांमध्ये ड्रायव्हर वगळता दोन जणांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र पाच ते सहा लोक चारचाकीतून प्रवास करत असल्याचं दिसत आहे.

संबंधित बातम्या 

नागपूर आयुक्त तुकाराम मुंढेंपाठोपाठ महापौरही रस्त्यावर, नियम तोडणाऱ्यांचा फैसला ‘ऑन द स्पॉट’    

तुकाराम मुंढे अ‍ॅक्शन मोडमध्ये, रस्त्यावर उतरुन दुकानांवर कारवाई, पीपीई किट घालून थेट कोरोना वॉर्डात 

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.