AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नागपुरात नक्षली नेता मिलिंद तेलतुंबडेचे होते वास्तव्य, पोलिसांची संबंधितांवर नजर

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज गडचिरोली येथे भेट दिली. तत्पूर्वी त्यांनी नागपूर विमानतळावर नागपुरातील पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेत सूचना केल्या. शहरात जवळपास ३१ संवेदनशील परिसरात पोलीस तैनात करण्यात आलेत. मोर्चे आणि आंदोलनाला परवानगी नाकारण्यात आलीय. याला झुगारत भाजपने मोर्चा काढला.

नागपुरात नक्षली नेता मिलिंद तेलतुंबडेचे होते वास्तव्य, पोलिसांची संबंधितांवर नजर
Nagpur Police
| Edited By: | Updated on: Nov 15, 2021 | 5:22 PM
Share

नागपूर : अमरावती शहरातील हिंसाचार आणि गडचिरोली जंगलातील नक्षल्यांचा खात्मा या पार्श्वभूमीवर पोलीस सकर्त झालेत. या दोन्ही घटनांचे पडसाद शहरात पडू नये यासाठी पोलीस खबरदारी घेत आहेत. गडचिरोलीतील पोलीस कारवाईत ठार झालेला नक्षल नेता मिलिंद तेलतुंबडे हा काही काळ नागपुरात वास्तव्यास होता. त्याच्या संबंधित लोक येथे आहेत. त्यामुळं पोलीस शहरावरील संबंधितांवर लक्ष ठेवून आहेत.

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज गडचिरोली येथे भेट दिली. तत्पूर्वी त्यांनी नागपूर विमानतळावर नागपुरातील पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेत सूचना केल्या. शहरात जवळपास 31 संवेदनशील परिसरात पोलीस तैनात करण्यात आलेत. मोर्चे आणि आंदोलनाला परवानगी नाकारण्यात आलीय. याला झुगारत भाजपने मोर्चा काढला. त्याला शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. गुंठेवारी विकास शुल्क कमी करण्यात यावे आणि केशरी शिधापत्रिकाधारकांना रेशन देण्यात यावे, अशा आंदोलकांच्या मागण्या होत्या. विशेष म्हणजे शहरात संचारबंदी असताना हा मोर्चा काढण्यात आला. भाजपचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. तर मोर्चा नियोजित असल्याचा दावा भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय. मोर्चा काढणार असल्यानं जमावबंदीचा आदेश काढल्याचा आरोपही भाजपकडून करण्यात आला.

पोलीस घेत आहेत खबरदारी

अमरावती शहरातील हिंसाचार आणि गडचिरोली येथील जंगलात 26 नक्षलांना ठार केल्याच्या पार्श्वभूमीवर नागपूर शहरात हाय अलर्ट घोषित करण्यात आलाय. शहरात जमावबंदी लागू करण्यात आलीय. अमरावती शहरातील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर नागपूर शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस पूर्ण खबरदारी घेत आहेत.

संबंधितांच्या हालचालींना लक्ष

उपराजधानी नागपुरात हाय अलर्ट घोषित करण्यात आलाय. पोलिसांकडून धर्मगुरु यांच्याशी चर्चा सुरू असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. गडचिरोली आणि अमरावतीमधील घटनांनंतर पोलीस कुठलीही जोखीम पत्करायला तयार नाही. शहरातील कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलीस डोळ्यात तेल टाकून प्रत्येक हालचालींना लक्ष ठेवून आहे. मिलिंद तेलतुंबडे यांची पत्नी नागपुरात राहत होती, अशी माहिती आहे. त्यामुळं त्यांच्याशी संबंधित व्यक्तींवर पोलिसांची नजर राहणार आहे.

संबंधित बातम्या 

Video नागपुरात जमावबंदी असतानाही भाजपचा मोर्चा, गुंठेवारी विकास शुल्क कमी करण्याची मागणी

नागपूर शहरात जमावबंदी लागू, पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र येता येणार नाही

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.