AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नागपूर शहरात जमावबंदी लागू, पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र येता येणार नाही

नागपुरात नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी केलेय. शहरात जवळपास 31 संवेदनशील परिसरात साध्या वेशात पोलिस तैनात करण्यात आलेत. मोर्चे आणि आंदोलनाला परवानगी नाकारण्यात आली. पोलिसांकडून धर्मगुरु यांच्याशी चर्चा सुरू आहे.

नागपूर शहरात जमावबंदी लागू, पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र येता येणार नाही
पोलीस आयुक्त अमितेश कुमार
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Nov 15, 2021 | 10:59 AM
Share

नागपूर : शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याची जबाबदार पोलिसांची आहे. खबरदारीची भूमिका घेत पोलिस आयुक्तांनी शहरात जमावबंदी कायदा लागू केलीय. त्यानुसार आजपासून शहरात पाच जणांपेक्षा जास्त व्यक्ती एकत्र आल्यास कलम 144 (1) नुसार कारवाई केली जाणार आहे.

पोलिसांची धर्मगुरुंशी चर्चा सुरू

नागपुरात नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी केलेय. शहरात जवळपास 31 संवेदनशील परिसरात साध्या वेशात पोलिस तैनात करण्यात आलेत. मोर्चे आणि आंदोलनाला परवानगी नाकारण्यात आली. पोलिसांकडून धर्मगुरु यांच्याशी चर्चा सुरू आहे. धार्मिक भावना भडकवणारी अफवा पसरवली जाणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे. सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती अमितेश कुमार यांनी दिलीय.

सोशल मीडियावर लक्ष

शुक्रवारी 12 नोव्हेंबर रोजी अमरावतीमध्ये जमावाला हिंसक वळण लागून दगडफेक व तोडफोडीच्या घटना घडल्या. राज्य सरकारने या घटनांची गंभीर दखल घेत अमरावती येथे कलम 144 लागू केले. नागपुरातही याचे पडसाद उमटण्याची शक्यता बघता अमितेश कुमार यांनी रविवारी नागपूर शहरात कलम 144 लागू केली आहे. यानुसार आता 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून हा हिंसाचार नागपूर शहरातही घडू शकतो अशीही शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर पोलिसांचे लक्ष राहणार आहे. त्या अनुषंगाने नागपूर शहर आयुक्तालय अंर्तगत शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता प्रतिबंधात्मक उपाय योजनांची प्रभावी अंमलबजवणी करण्याकरिता हा मनाई आदेश लागू केला आहे.

त्रिपुरा येथील घटनेचे अमरावती, नांदेड आणि मालेगाव आदी ठिकाणी तीव्र पडसाद उमटले होते. अमरावती येथे मोठा हिंसाचार झाला. नागपुरात याचे पडसाद उमटण्याची शक्यता बघता रविवारी (ता.14 नोव्हेंबर) रात्री 12 वाजतापासून पोलिसांनी  जमावबंदी आदेश लागू केले. अमितेश कुमार यांनी हे आदेश काढले आहे. त्रिपुरा राज्यात काही संघटनांकडून एका विशिष्ट धर्माच्या धर्मगुरूबाबत आपत्तीजनक वक्तव्य केल्याच्या विरोधात 12 नोव्हेंबरला रजा अकादमी, इस्लामिक ऑर्गनायझेशन, अलहज मोहम्मद सय्यद नुरी आदी संघटनांनी महाराष्ट्र बंदचे आवाहन केले होते. नांदेड, अमरावती, मालेगाव, फुसाड, कारंजा या ठिकाणी दगडफेक व जाळपोळसारख्या अन्य तीव्र घटना समोर आल्या.

इतर बातम्या 

Weather Alert: राज्यातून थंडी गायब, अवकाळी पावसाच्या सरी, काय आहे ढगाळ वातावराणाचं कारण?

विहिंप, बजरंग दलावर बंदी का आणू नये? तारीक अन्वर यांचा सवाल

Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.