विहिंप, बजरंग दलावर बंदी का आणू नये? तारीक अन्वर यांचा सवाल

तारीक अन्वर म्हणाले, संविधानापेक्षा देशात कोणीही मोठा नाही. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांच्याकडून नेहमी समाजात तेढ निर्माण करण्याचे काम केले जाते. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशी तणावाची परिस्थिती निर्माण केली जात आहे. राजकीय लाभ मिळविण्याचा डाव आखला जात आहे.

विहिंप, बजरंग दलावर बंदी का आणू नये? तारीक अन्वर यांचा सवाल
काँग्रेसचे महासचिव तारीक अन्वर
Follow us
| Updated on: Nov 15, 2021 | 10:16 AM

नागपूर : अमरावतीतील दगडफेक प्रकरणात रजा अकॅदमीवर बंदी आणा, अशी मागणी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांच्यावतीनं केली जात आहे. यावर अखिल भारतीय काँग्रेसचे महासचिव तारीक अन्वर यांनी प्रहार केला. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल हेसुद्वा अशाप्रकारच्या  दंगली घडवितात. त्यामुळे त्यांच्यावरही बंदी का आणू नये, असा सवाल अन्वर यांनी केला. नागपुरात ते पत्रकारांशी काल बोलत होते.

राजकीय फायद्यासाठी दंगली

तारीक अन्वर म्हणाले, संविधानापेक्षा देशात कोणीही मोठा नाही. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांच्याकडून नेहमी समाजात तेढ निर्माण करण्याचे काम केले जाते. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशी तणावाची परिस्थिती निर्माण केली जात आहे. राजकीय लाभ मिळविण्याचा डाव आखला जात आहे. महाराष्ट्राला बदनाम केले जात आहे. कोरोनाकाळात गंगेत वाहणारे मृतदेह साऱ्यांनी बघीतले. अशा मुद्यांवरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. बेरोजगारांची फौज तयार होत आहे. त्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी अमरावतीसारख्या दंगली घडवून आणल्या जात आहेत, असा आरोपही अन्वर यांनी यावेळी केली.

काँग्रेसतर्फे जनजागृती अभियान

देशातील समस्यांबाबत जनजागृती करण्यासाठी काँग्रेसतर्फे 14 ते 29 नोव्हेंबरपर्यंत अभियान राबविले जात आहे. यात काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते घरोघरी जाऊन जनजागृती करणार आहेत. या अभियानाच्या प्रचारासाठी तारिक अन्वर नागपुरात आले असता त्यांनी विहिंप, बजरंग दलावर प्रहार केला. निवडणुकीच्या काळात पुलवामा सारखे प्रकरण घडवून आणण्यात आले. धार्मिक तेढ निर्माण करण्याचे काम भाजपकडून नेहमी केले जाते, असेही ते म्हणाले. नागपुरात ऑल इंडिया कौमी तंजीमच्या वतीने आयोजित कार्यक्रमात त्यांनी हजेरी लावली. या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आमदार विकास ठाकरे उपस्थित होते.

राज्याकडून इंधन करकपात करण्याचा विचार

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, देशात दंगली घडवा आणि त्याचा राजकीय फायदा करून घ्या, असा भाजपचा एकसूत्री कार्यक्रम आहे. भाजपतर्फे पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात आंदोलन सुरू आहे. केंद्राने आधी इंधनाचे दर वाढविले. नंतर पाच रुपये लीटरमागे कमी केले. राज्य सरकारही इंधनावरील दर कपातीवर विचार करत आहे. राज्याकडून इंधनावरील करकपातीचा निर्णय होऊ शकतो, असे संकेत पटोले यांनी दिले.

जिहादींचा राज्य पेटवण्याचा प्रयत्न, विश्व हिंदू परिषदेचा आरोप, दोषींवर कारवाई करण्याची मागणी

उत्तर नागपुरात चार दिवसांपासून पाणीपुरवठा नाही, ओसीडब्ल्यूने नळजोडणी कापल्याचा आरोप

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.