AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विहिंप, बजरंग दलावर बंदी का आणू नये? तारीक अन्वर यांचा सवाल

तारीक अन्वर म्हणाले, संविधानापेक्षा देशात कोणीही मोठा नाही. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांच्याकडून नेहमी समाजात तेढ निर्माण करण्याचे काम केले जाते. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशी तणावाची परिस्थिती निर्माण केली जात आहे. राजकीय लाभ मिळविण्याचा डाव आखला जात आहे.

विहिंप, बजरंग दलावर बंदी का आणू नये? तारीक अन्वर यांचा सवाल
काँग्रेसचे महासचिव तारीक अन्वर
| Edited By: | Updated on: Nov 15, 2021 | 10:16 AM
Share

नागपूर : अमरावतीतील दगडफेक प्रकरणात रजा अकॅदमीवर बंदी आणा, अशी मागणी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांच्यावतीनं केली जात आहे. यावर अखिल भारतीय काँग्रेसचे महासचिव तारीक अन्वर यांनी प्रहार केला. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल हेसुद्वा अशाप्रकारच्या  दंगली घडवितात. त्यामुळे त्यांच्यावरही बंदी का आणू नये, असा सवाल अन्वर यांनी केला. नागपुरात ते पत्रकारांशी काल बोलत होते.

राजकीय फायद्यासाठी दंगली

तारीक अन्वर म्हणाले, संविधानापेक्षा देशात कोणीही मोठा नाही. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांच्याकडून नेहमी समाजात तेढ निर्माण करण्याचे काम केले जाते. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशी तणावाची परिस्थिती निर्माण केली जात आहे. राजकीय लाभ मिळविण्याचा डाव आखला जात आहे. महाराष्ट्राला बदनाम केले जात आहे. कोरोनाकाळात गंगेत वाहणारे मृतदेह साऱ्यांनी बघीतले. अशा मुद्यांवरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. बेरोजगारांची फौज तयार होत आहे. त्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी अमरावतीसारख्या दंगली घडवून आणल्या जात आहेत, असा आरोपही अन्वर यांनी यावेळी केली.

काँग्रेसतर्फे जनजागृती अभियान

देशातील समस्यांबाबत जनजागृती करण्यासाठी काँग्रेसतर्फे 14 ते 29 नोव्हेंबरपर्यंत अभियान राबविले जात आहे. यात काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते घरोघरी जाऊन जनजागृती करणार आहेत. या अभियानाच्या प्रचारासाठी तारिक अन्वर नागपुरात आले असता त्यांनी विहिंप, बजरंग दलावर प्रहार केला. निवडणुकीच्या काळात पुलवामा सारखे प्रकरण घडवून आणण्यात आले. धार्मिक तेढ निर्माण करण्याचे काम भाजपकडून नेहमी केले जाते, असेही ते म्हणाले. नागपुरात ऑल इंडिया कौमी तंजीमच्या वतीने आयोजित कार्यक्रमात त्यांनी हजेरी लावली. या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आमदार विकास ठाकरे उपस्थित होते.

राज्याकडून इंधन करकपात करण्याचा विचार

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, देशात दंगली घडवा आणि त्याचा राजकीय फायदा करून घ्या, असा भाजपचा एकसूत्री कार्यक्रम आहे. भाजपतर्फे पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात आंदोलन सुरू आहे. केंद्राने आधी इंधनाचे दर वाढविले. नंतर पाच रुपये लीटरमागे कमी केले. राज्य सरकारही इंधनावरील दर कपातीवर विचार करत आहे. राज्याकडून इंधनावरील करकपातीचा निर्णय होऊ शकतो, असे संकेत पटोले यांनी दिले.

जिहादींचा राज्य पेटवण्याचा प्रयत्न, विश्व हिंदू परिषदेचा आरोप, दोषींवर कारवाई करण्याची मागणी

उत्तर नागपुरात चार दिवसांपासून पाणीपुरवठा नाही, ओसीडब्ल्यूने नळजोडणी कापल्याचा आरोप

अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय,प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय,प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.