Nagpur temperature : नागपुरात उष्माघाताचे 3 बळी? 43 अंंशावर तापमान असलेल्या ठिकाणी आढळले मृतदेह

नागपूर जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात बेशुद्ध अवस्थेत तिघांचे मृतदेह आढळून आले. या तिघांची उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Nagpur temperature : नागपुरात उष्माघाताचे 3 बळी? 43 अंंशावर तापमान असलेल्या ठिकाणी आढळले मृतदेह
file photoImage Credit source: google
Follow us
| Updated on: Apr 27, 2022 | 12:33 PM

नागपूर : जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात बेशुद्ध अवस्थेत तिघांचा मृतदेह आढळून आले आहेत. या तिघांचा उष्माघातामुळे (Heatstroke) मृत्यू (Death) झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कपिल नगर, जुनी कामठी आणि देवलापार परिसरात मृतदेह आढळल्याची माहिती आहे. तिन्ही प्रकरणात पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. नागपुरात (Nagpur) दुपारचे चटके असह्य होत असून मंगळवारी 43 तापमानाची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, हे तीन मृत्यू उष्माघाताने तर नाही ना, अशी चर्चा नागपुरकरांमध्ये आहे. नागरिकांनी उन्हात दुपारी 12 ते 4 या वेळेत आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये, उन्हापासून बचाव करावा अशा सूचना हवामान विभागाने दिल्यायेत. नागपूर जिल्हा प्रशासनानेही नागरिकांना उन्हापासून स्वतःचा बचाव करावा आणि सावलीचा ठिकाणी आधार घ्यावा, आवश्यक असेल तरच संपूर्ण काळजी घेत घराबाहेर पडावे असे आवाहन केलंय.

तापमान वाढण्याची शक्यता

नागपूर जिल्ह्याचा पारा 44 अंश सेल्सिअसच्या पुढे जाऊ शकतो असा अंदाज नागपूर हवामान खात्याने वर्तवलाय. विदर्भातील जवळपास सर्वच जिल्ह्यामध्ये उष्णतेची लाट पहायला मिळत आहे. चंद्रपूरचे तापमान देखील 42 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. उष्णता वाढत असल्याने नागरिक घरीच बसण्यास प्राधान्य देत असून, काही अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडताना दिसत आहेत. नागपूरप्रमाणेच मराठवाड्यात देखील सुर्य आग ओकत आहे. मराठवाड्याच्या तापमाना देखील मोठी वाढ झाली आहे. एकीकडे राज्यातील तापमान वाढत आहे, तर दुसरीकडे काही भागात पाऊस पडत असल्याचे चित्र आहे.

शक्यतोवर घराबाहेर पडू नये

दरम्यान, हे तीन मृत्यू उष्माघाताने तर नाही ना, अशी चर्चा नागपुरकरांमध्ये आहे. नागरिकांनी उन्हात दुपारी 12 ते 4 या वेळेत आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये, उन्हापासून बचाव करावा अशा सूचना हवामान विभागाने दिल्यायेत. नागपूर जिल्हा प्रशासनानेही नागरिकांना उन्हापासून स्वतःचा बचाव करावा आणि सावलीचा ठिकाणी आधार घ्यावा, आवश्यक असेल तरच संपूर्ण काळजी घेत घराबाहेर पडावे असे आवाहन केलंय. नागपूरमध्ये तापमान 44 अंश सेल्सियसपर्यंत पोहोचले आहे. पुढील पाच दिवसांत विदर्भात मोठ्या प्रमाणात उष्णता राहणार आहे. त्यानंतर पुढील तीन दिवस काही ठिकाणी हीट व्हेवची परिस्थिती असणार आहे. आता वाढत असलेले तापमान पाहून वाटत आहे की वर्धा, चंद्रपूर, अकोला आणि नागपूर या ठिकाणी तापमान वाढून हीट व्हेवची परिस्थिती निर्माण होणार आहे,” अशी माहिती नागपूर प्रादेशिक हवामान विभागाचे संचालक एम. एल. साहू यांनी दिली आहे.

Non Stop LIVE Update
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय.
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?.
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?.
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात.
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?.
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत.
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.