Nagpur tree : नागपुरात दीडशे वर्षे जुन्या वडाच्या झाडाला नवजीवन, मनपाच्या उद्यान विभागाद्वारे यशस्वी पुनर्रोपन

झाडाचे पुनर्रोपन झाल्यानंतर झाडाला जगविण्यासाठी आवश्यक घटकांची पूर्तता करण्यासाठी उद्यान विभागाद्वारे विशेष प्रयत्न करण्यात आले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे वनशेती विभागप्रमुख व्ही. एम. इल्लोरकर यांच्या सल्ल्यानुसार झाडाची मुळे विकसित करण्यासाठी औषधोपचार करण्यात आला.

Nagpur tree : नागपुरात दीडशे वर्षे जुन्या वडाच्या झाडाला नवजीवन, मनपाच्या उद्यान विभागाद्वारे यशस्वी पुनर्रोपन
नागपुरात दीडशे वर्षे जुन्या वडाच्या झाडाला नवजीवन
Follow us
| Updated on: Jul 27, 2022 | 2:29 PM

नागपूर : मे महिन्यात आलेल्या वादळामुळे दीडशे वर्षांचं जुणे वडाच्या झाड उन्मळून पडले. त्या झाडाला नवजीवन देण्यात मनपाच्या उद्यान विभागाला यश आले आहे. गोरेवाडा तलावाजवळील शासकीय क्वाटर्स परिसरात झाडाचे पुनर्रोपन करण्यात आले आहे. उद्यान विभागाच्या या कामगिरीबद्दल मनपा आयुक्त (Municipal Commissioner) तथा प्रशासक राधाकृष्णन बी. (Radhakrishnan B) यांनी विभागाच्या चमूचे अभिनंदन केले. 24 मे रोजी नागपूर शहरात जोराचे वादळ आले. या वादळामुळे शहरात अनेक ठिकाणी झाडांच्या (tree) फांद्या तुटल्याच्या घटना घडल्या. मात्र यासोबतच मंगळवारी झोनमधील गोरेवाडा तलावाजवळील क्वाटर्स परिसरात असलेले जुने विशाल वडाचे झाड मुळासकट कोलमडून पडले. सुमारे 150 वर्ष जुन्या या झाडाचा घेर 17 फुट एवढा आहे. या झाडाच्या पुनर्रोपनाचा निर्णय मनपाद्वारे घेण्यात आला. मनपा आयुक्तांच्या निर्देशानुसार उपायुक्त रवींद्र भेलावे यांच्या मार्गदर्शनात उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार व त्यांच्या चमूने झाडाच्या पुनर्रोपनाचे आव्हान स्वीकारले.

पुनर्रोपनाची प्रक्रिया सुमारे 20 ते 25 दिवस

उद्यान विभागाच्या कर्मचा-यांनी पडलेल्या झाडाच्या सर्व फांद्या छाटल्या. मुळापासून वर 20 फुटापर्यंत झाडाची उंची ठेवण्यात आली. हे करताना मनपाच्या कारखाना विभागाद्वारे जेसीबीने 25 फुट रुंद आणि 12 फुट खोल मोठा खड्डा खणण्यात आला. झाडाचे यशस्वी पुनर्रोपन करून ते पुढे जगावे यादृष्टीने पूर्ण काळजी घेण्यात आली. खणलेल्या खड्ड्याचे झाडाच्या वाढीच्या दृष्टीने निर्जंतुकीकरण करण्यात आले. माती, खत सर्व टाकण्यात आले. झाडाच्या फांद्या कापताना झाडाचा तोल हळुहळू खड्ड्याकडे झुकला जात असल्याने कुठल्याही क्रेनचा आधार न घेता झाडाचे सहजतेने पुनर्रोपन करण्यात उद्यान विभागाला यश आले. झाडाच्या पुनर्रोपनाची प्रक्रिया सुमारे 20 ते 25 दिवस चालल्याचे उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार यांनी सांगितले.

झाडाची मुळे करण्यात आली विकसित

झाडाचे पुनर्रोपन झाल्यानंतर झाडाला जगविण्यासाठी आवश्यक घटकांची पूर्तता करण्यासाठी उद्यान विभागाद्वारे विशेष प्रयत्न करण्यात आले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे वनशेती विभागप्रमुख व्ही. एम. इल्लोरकर यांच्या सल्ल्यानुसार झाडाची मुळे विकसित करण्यासाठी औषधोपचार करण्यात आला. त्यांच्या सल्ल्यानुसार झाडाच्या आजूबाजूला चार पाईप टाकण्यात आले आहेत. यामध्ये मोठ्या पाईपाद्वारे उन्हाळ्यात झाडाला पाणी दिले जाते. तर इतर तीन पाईपांद्वारे झाडाच्या वाढीसाठी आवश्यक ‘ग्रोथ हार्मोन्स’चा पुरवठा केला जातो. मे महिन्यातील वादळानंतर पुन्हा ऊन वाढली आणि पुढे जुलै महिन्यात सतत मुसळधार पाऊस सुरू होता. मात्र अशाही परिस्थितीत झाड टिकून आहे ही बाब आनंददायी आहे. आज झाडाच्या प्रत्येक फांदीवर नवीन पालवी फुटू लागली आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत 150 वर्ष जुने झाड वाचवून त्याला नवजीवन देण्यासाठी मनपाच्या उद्यान आणि इतर विभागाच्या कर्मचा-यांनी समन्वयाने एकत्रितरित्या काम केले. या सर्वांच्या कार्यामुळे झाडाला नवजीवन देता आल्याची भावना उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार यांनी व्यक्त केली.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.