AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गौरीशंकर जंगलात शेळ्यांसाठी चारा आणायला गेला; रात्री उशिरापर्यंत परतला नसल्याने कुटुंबीय चिंतित

पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात ही घटना घडली. पवनी वनपरिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या चारगाव बीटमध्ये ही घटना घडली. प्रशासनाने नियमानुसार कारवाई केली. देवलापार पोलिसांनी घटनेची नोंद घेतली आहे.

गौरीशंकर जंगलात शेळ्यांसाठी चारा आणायला गेला; रात्री उशिरापर्यंत परतला नसल्याने कुटुंबीय चिंतित
| Edited By: | Updated on: Mar 31, 2023 | 8:37 AM
Share

नागपूर : गौरीशंकर नावाचा तरुण मौदी गावात राहतो. गावाला लागून जंगल असल्याने तो जंगलात बकऱ्यांसाठी चारा आणायला गेला होता. पण, तो घरी परतला नाही. त्यामुळे घरचे लोकं चिंतित पडले. उशिरापर्यंत रात्री घरी आला नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळी धक्कादायक घटना समोर आली. जंगलात वाघाचा वावर असल्याने भीती व्यक्त करण्यात आली. आता वाघाने हल्ला केलेल्या भागात गस्त वाढवण्यात आली आहे. जलद बचाव दल, विशेष व्याघ्र संरक्षण दलाचे जवान, वनकर्मचारी आणि प्राथमिक बचाव पथकातील सदस्यांना तैनात करण्यात आले आहे. या जंगलात येणे-जाणे टाळावे, असे आवाहन वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.

वाघाचा युवकावर हल्ला

जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात वाघाच्या हल्लात 29 वर्षीय युवक ठार झालाय. पवनी राखीव वनपरिक्षेत्रातील मौदी जंगलात वाघाने युवकांवर हल्ला केला. यात युवकाचा मुत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. गुरुवारी सकाळी 7 वाजता मौदी या आपल्या गावालगतच्या वनविभाग राखीव जंगलात मौदी येथील गौरीशंकर श्रीभद्रे गेला होता.

बकऱ्यांना चारा आणायला गेला तो शेवटचाच

बकर्‍यांच्या चारा झाडांचा पाला आणण्याकरिता जंगलात गेलेल्या 29 वर्षीय गौरीशंकरवर वाघाने हल्ल्ला केला. बराच वेळपर्यंत तो घरी न आल्याने घरील लोकांनी गौरीशंकरची शोधाशोध केली. तो जंगलात मृतावस्थेत आढळला. माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी पोहचले. परिसरात वाघाचे पायाचे मार्क दिसले. मृतकावरील जखमा या वाघाने केल्याचे निष्पन्न झाले.

५० हजारांचा धनादेश मृतकाच्या पत्नीला दिला

पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात ही घटना घडली. पवनी वनपरिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या चारगाव बीटमध्ये ही घटना घडली. प्रशासनाने नियमानुसार कारवाई केली. देवलापार पोलिसांनी घटनेची नोंद घेतली आहे. गौरीशंकरची पत्नी वंदना हिला ५० हजारांचा धनादेश त्वरित देण्यात आला.

अशी करण्यात येणार कार्यवाही

पेंच व्याघ्र प्रकल्पाचे प्रकल्प क्षेत्रसंचालक ए. लक्ष्मी, उपसंचालक डॉ. प्रभूनाथ शुक्ल, सहाय्यक वनसंरक्षक अतुल देवकर यांच्या सूचनेवरून मृतकाच्या वारसाला २० लाख रुपये मदत मंजुरीची कार्यवाही करण्यात येत असल्याचे वनक्षेत्रपाल जयेश तायडे यांनी सांगितलं.

५० हजार रुपयांचा धनादेश देताना वनक्षेत्रपाल जयेश तायडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक बोरकुटे, पूर्व पेंचचे वनपरिक्षेत्र अधिकारी मंगेश ताटे, रामटेक पंचायत समितीचे सभापती संजय नेवारे, पवनीचे सरपंच डॉ.सुधीर नाखले उपस्थित होते.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.