AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विद्यार्थ्यांच्या असुरक्षित वाहतुकीचा गंभीर प्रश्न, पोलीस आयुक्तांनी घेतला प्राचार्यांचा क्लास

नागपूर शहरात शाळेत जाण्यासाठी स्कूलबस, व्हॅन, ऑटो यांचा वापर केला जातो. परंतु, या वाहनांचे काही चालक नियमांचे पालन करत नाहीत. काही वाहनांमध्ये विद्यार्थ्यांना कोंबून वाहतूक केली जाते.

विद्यार्थ्यांच्या असुरक्षित वाहतुकीचा गंभीर प्रश्न, पोलीस आयुक्तांनी घेतला प्राचार्यांचा क्लास
| Edited By: | Updated on: Jul 15, 2023 | 4:15 PM
Share

नागपूर : नागपुरात विद्यार्थ्यांच्या असुरक्षित वाहतुकीचा गंभीर प्रश्न आहे. त्यामुळेच नागपूर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी प्राचार्यांचा क्लास घेतला. अमितेश कुमार यांनी प्राचार्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्यात. नागपुरात बऱ्याच शाळांमध्ये स्कुलबस, स्कुल व्हॅन आणि ॲाटोरिक्षात येणाऱ्या विद्यार्थ्यांना अक्षरशा कोंबून भरलं जातं. यामुळे अपघाताची भीती असते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी मुलांना रस्ता सुरक्षेचे धडे द्यावे. क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करावी. अशा सूचना पोलीस विभागाकडून देण्यात आल्यात.

कारवाईची धडक मोहीम घेणार

नियमांचं पालन झालं नाही, तर लवकरंच नागपूर पोलीस नियमबाह्य वाहतूक करणाऱ्या स्कुलबस, स्कुल व्हॅन आणि ॲाटोरिक्षावर कारवाईची धडक मोहीम हाती घेणार आहेत, अशी माहिती नागपूर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलीय.

पोलीस आयुक्तांनी घेतला पुढाकार

नागपूर शहरात शाळेत जाण्यासाठी स्कूलबस, व्हॅन, ऑटो यांचा वापर केला जातो. परंतु, या वाहनांचे काही चालक नियमांचे पालन करत नाहीत. काही वाहनांमध्ये विद्यार्थ्यांना कोंबून वाहतूक केली जाते. यामुळे अपघाताची शक्यता वाढते, यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस आयुक्तांनी पुढाकार घेतला.

कारवाईचा इशारा देण्यात आला

नियमानुसार वाहतूक केली पाहिजे, असा आग्रह पोलीस आयुक्तांनी केला. यासाठी त्यांनी नागपूर शहरातील महत्त्वाच्या शाळांच्या प्राचार्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या. या सूचनांचे पालन केले गेले नाही. तर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

विद्यार्थी शाळेत जात असताना सुरक्षित घरी आले पाहिजे. अशी पालकांची अपेक्षा असते. विद्यार्थ्यांना घरी येण्यास उशीर झाल्यास पालकांच्या ह्रदयाचा ठोका चुकचुकतो. आपला पाल्य सुरक्षित घरी यावा, अशी त्यांनी अपेक्षा असते.

परंतु, काही वाहन चालक गैरजबाबदारीने वाहन चालवतात. त्यामुळे काही ठिकाणी अपघात होतात. अशा घटना घडू नये, यासाठी आता पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुढाकार घेतला. त्यामुळे चालकांना वाहन चालवताना सांभाळून चालवावे लागणार आहे. वाहतूक नियमांचे पालन करावे लागणार आहे.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.