AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विद्यार्थ्यांच्या असुरक्षित वाहतुकीचा गंभीर प्रश्न, पोलीस आयुक्तांनी घेतला प्राचार्यांचा क्लास

नागपूर शहरात शाळेत जाण्यासाठी स्कूलबस, व्हॅन, ऑटो यांचा वापर केला जातो. परंतु, या वाहनांचे काही चालक नियमांचे पालन करत नाहीत. काही वाहनांमध्ये विद्यार्थ्यांना कोंबून वाहतूक केली जाते.

विद्यार्थ्यांच्या असुरक्षित वाहतुकीचा गंभीर प्रश्न, पोलीस आयुक्तांनी घेतला प्राचार्यांचा क्लास
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Jul 15, 2023 | 4:15 PM
Share

नागपूर : नागपुरात विद्यार्थ्यांच्या असुरक्षित वाहतुकीचा गंभीर प्रश्न आहे. त्यामुळेच नागपूर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी प्राचार्यांचा क्लास घेतला. अमितेश कुमार यांनी प्राचार्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्यात. नागपुरात बऱ्याच शाळांमध्ये स्कुलबस, स्कुल व्हॅन आणि ॲाटोरिक्षात येणाऱ्या विद्यार्थ्यांना अक्षरशा कोंबून भरलं जातं. यामुळे अपघाताची भीती असते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी मुलांना रस्ता सुरक्षेचे धडे द्यावे. क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करावी. अशा सूचना पोलीस विभागाकडून देण्यात आल्यात.

कारवाईची धडक मोहीम घेणार

नियमांचं पालन झालं नाही, तर लवकरंच नागपूर पोलीस नियमबाह्य वाहतूक करणाऱ्या स्कुलबस, स्कुल व्हॅन आणि ॲाटोरिक्षावर कारवाईची धडक मोहीम हाती घेणार आहेत, अशी माहिती नागपूर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलीय.

पोलीस आयुक्तांनी घेतला पुढाकार

नागपूर शहरात शाळेत जाण्यासाठी स्कूलबस, व्हॅन, ऑटो यांचा वापर केला जातो. परंतु, या वाहनांचे काही चालक नियमांचे पालन करत नाहीत. काही वाहनांमध्ये विद्यार्थ्यांना कोंबून वाहतूक केली जाते. यामुळे अपघाताची शक्यता वाढते, यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस आयुक्तांनी पुढाकार घेतला.

कारवाईचा इशारा देण्यात आला

नियमानुसार वाहतूक केली पाहिजे, असा आग्रह पोलीस आयुक्तांनी केला. यासाठी त्यांनी नागपूर शहरातील महत्त्वाच्या शाळांच्या प्राचार्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या. या सूचनांचे पालन केले गेले नाही. तर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

विद्यार्थी शाळेत जात असताना सुरक्षित घरी आले पाहिजे. अशी पालकांची अपेक्षा असते. विद्यार्थ्यांना घरी येण्यास उशीर झाल्यास पालकांच्या ह्रदयाचा ठोका चुकचुकतो. आपला पाल्य सुरक्षित घरी यावा, अशी त्यांनी अपेक्षा असते.

परंतु, काही वाहन चालक गैरजबाबदारीने वाहन चालवतात. त्यामुळे काही ठिकाणी अपघात होतात. अशा घटना घडू नये, यासाठी आता पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुढाकार घेतला. त्यामुळे चालकांना वाहन चालवताना सांभाळून चालवावे लागणार आहे. वाहतूक नियमांचे पालन करावे लागणार आहे.

Follow Us
जळगावात ड्रग्जविरोधात मोठी कारवाई! 5 किलो MD पावडर जप्त, किंमत तब्बल..
Jalgaon | जळगावात ड्रग्जविरोधात मोठी कारवाई! 5 किलो MD पावडर जप्त, किंमत तब्बल 1.25 कोटी
MPSC पेपरफुटीत मोठा खुलासा! 5 लाखांचा व्यवहार अन् प्रकरण आलं समोर
MPSC पेपरफुटीत मोठा खुलासा! माजी विद्यार्थ्याच्या माध्यमातून फोडला पेपर? 5 लाखांचा व्यवहार अन् प्रकरण आलं समोर
जो ठाकरेंचा होऊ शकला नाही, तो जरांगेंचा कसा होणार?
Sanjay Raut UNCUT | जो ठाकरेंचा होऊ शकला नाही, तो जरांगेंचा कसा होणार?; बंडू जाधवांवर संजय राऊतांचा घणाघात
भागवतांचं ते विधान म्हणजे RSSच्या प्लेबुकमधली जुनी खेळी!
Asaduddin Owaisi | भागवतांचं ते विधान म्हणजे RSSच्या प्लेबुकमधली जुनी खेळी! असदुद्दीन ओवैसींचा थेट हल्लाबोल
मोबाईलवर बोलत कार चालवणं जीवावर बेतलं! वांद्र्यात भरधाव कारची...
Bandra Accident | मोबाईलवर बोलत कार चालवणं जीवावर बेतलं! वांद्र्यात भरधाव कारची चिमुरड्याला धडक; अंशचा दुर्दैवी मृत्यू
पुण्यामध्ये मद्यपी कार चालकाचा हायव्होल्टेज ड्रामा; पोलिसांना शिवीगाळ
Pune | पुण्याच्या वाकडमध्ये मद्यपी कार चालकाचा हायव्होल्टेज ड्रामा; पोलिसांना शिवीगाळ करत दमदाटी
ठाणे बँकेनंतर शिंदे गटाची नजर मुंबई बँकेवर; भाजपाला थेट टक्कर देणार?
Mumbai Bank | ठाणे बँकेनंतर शिंदे गटाची नजर मुंबई बँकेवर; भाजपाला थेट टक्कर देणार?
नादी लागू नका, सगळी यादी बाहेर काढू!; राजू पाटलांचा नेमका कोणाला इशारा
Raju Patil | नादी लागू नका, सगळी यादी बाहेर काढू!; राजू पाटलांचा नेमका कोणाला इशारा? VIDEO होतोय व्हायरल
पुण्यात भाजपची महत्त्वाची बैठक; फडणवीस-रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत
Pune | पुण्यात भाजपची महत्त्वाची बैठक; फडणवीस-रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत आगामी निवडणुकांची रणनीती ठरणार?
मेळावा रद्द करा, नाहीतर मी येतोच! जरांगेंचा थेट इशारा...
tv9 Marathi Special Report | मेळावा रद्द करा, नाहीतर मी येतोच! जरांगेंचा थेट इशारा; शिंदेंच्या सभेत काळे झेंडे अन् घोषणाबाजी, नेमकं काय घडलं?