AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नागपूर गडावर वर्चस्व राखण्यात काँग्रेसला मोठं यश, आतापर्यंत 53 ग्रामपंचायती खिशात

नागपुरात ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस सर्वात पुढे असल्याचं चित्र दिसत आहे (Congress win 53 seats in Nagpur Gram Panchayat Election 2021)

नागपूर गडावर वर्चस्व राखण्यात काँग्रेसला मोठं यश, आतापर्यंत 53 ग्रामपंचायती खिशात
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Jan 18, 2021 | 4:07 PM
Share

नागपूर : नागपुरात ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस सर्वात पुढे असल्याचं चित्र दिसत आहे. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार नागपुरात काँग्रेसला 53 ग्रामपंचायतींवर विजय मिळाला आहे. त्यामुळे नागपूर गडावरील वर्चस्व राखण्यात काँग्रेसला यश आलं आहे. काँग्रेस पाठोपाठ राष्ट्रवादीला 21 ग्रामपंचायतींवर विजय मिळाला आहे. मात्र, आतापर्यंत समोर आलेल्या निकालानुसार शिवसेनेला फक्त दोन ग्रामपंचायतींवर विजय मिळाला आहे. तर भाजपला 29 ग्रामपंचायतींवर विजय मिळाला आहे (Congress win 53 seats in Nagpur Gram Panchayat Election 2021).

90 जागा जिकंणार, काँग्रेसचा दावा

नागपुरात काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्याने काँग्रेसच्या गोटात आनंदाचं वातावरण आहे. काँग्रेस नेते आणि राज्याचे माजी मंत्री राजेंद्र मुळक यांनी ‘टीव्ही 9 मराठी’सोबत बातचित केली. यावेळी त्यांनी काँग्रेस 90 जागांवर विजयी होणार, असा दावा केला. त्यांच्या दावा कितपत खरा ठरतो हे पुढच्या काही तासांमध्ये स्पष्ट होईल. मात्र, सध्या तरी नागपुरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरताना दिसत आहे (Congress win 53 seats in Nagpur Gram Panchayat Election 2021).

“काँग्रेस पक्षाची चांगली घोडदौड सुरु आहे. गेल्या वर्षभरापासून जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमध्ये एकतर्फी आणि एकहाती सत्ता काँग्रेस पक्षाने प्राप्त केली. नुकत्याच झालेल्या पदवीधर निवडणुकीत काँग्रेस उमेदवार अभिजित वंजारी बहुमताने विजयी झाले”, अशी प्रतिक्रिया राजेंद्र मुळक यांनी दिली.

“आता ग्रामपंचायतींचा निकाल आपण सगळ्यांनी पाहिला आहे. प्रचंड चांगला प्रतिसाद काँग्रेस आणि महाविकास आघाडीला मिळाला आहे. कारण काँग्रेस नेत्याचे सर्व नेते, मंत्री ते कार्यकर्ते सर्वजण एकत्रित आले. सर्व एकत्रित आल्याने ही ताकद निर्माण झाली. भाजपला विजयापासून आम्ही थांबवलं. आम्ही जवळपास 90 टक्के जागांवर विजयी झालो आहोत”, असा दावा त्यांनी केला.

नागपुरात आतापर्यंत समोर आलेल्या मतमोजनीनुसार काँग्रेसने 53 ग्रामपंचायतींवर वर्चस्व राखण्यात विजय मिळवला आहे. तर 21 ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीने विजय मिळवला आहे. नागुरात भाजप 29 पंचायतींवर विजयी झाले. तर शिवसेनेचा 2 ग्रामपंचायतींमध्ये विजय झाला आहे.

संबंधित बामत्या :

Gram Panchayat Election Results 2021 : जाऊबाई जोरात, काट्याची लढत घरात, जाऊबाईंच्या लढतीत कोण जिंकलं?

महाराष्ट्र ग्रामपंचायत निकाल 2021 : अवघ्या चार मतांनी विजय, सासू-सूनेच्या लढतीत चाव्या कोणाकडे?

सरपंचपद गेल्यावेळी निम्मं-निम्मं वाटून घेतलं, आता सासूबाईंविरोधात सूनेचा शड्डू

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली