AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यसभेची निवडणूक बिनविरोध करणार का? काँग्रेसच्या प्रस्तावावर फडणवीसांचं पहिल्यांदाच उत्तर

काँग्रेसच्या याच भूमिकेवर बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचे भाष्य केले आहे. निवडणूक बिनविरोध व्हावी का ? याबाबत भाजपच्या कोअर कमिटीमध्ये चर्चा करु. त्यानंतर त्यांना कळवू, अशी माहिती फडणवीस यांनी दिली आहे.

राज्यसभेची निवडणूक बिनविरोध करणार का? काँग्रेसच्या प्रस्तावावर फडणवीसांचं पहिल्यांदाच उत्तर
DEVENDRA FADNAVIS
| Edited By: | Updated on: Sep 23, 2021 | 6:40 PM
Share

नागपूर : काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या निधनानंतर राज्यसभेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न सुरु आहेत. काँग्रेसच्या याच भूमिकेवर बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र पडणवीस यांनी महत्त्वाचे भाष्य केले आहे. निवडणूक बिनविरोध व्हावी का ? याबाबत भाजपच्या कोअर कमिटीमध्ये चर्चा करु. त्यानंतर काँग्रेसला कळवण्यात येईल, अशी माहिती फडणवीस यांनी दिली आहे. (devendra fadnavis comment on congress demand of unopposed election of rajya sabha said our bjp core committee will think on it)

कोअर कमिटीमध्ये आम्ही चर्चा करू त्यानंतर कळवू

राज्यसभेची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर भाजप काय भूमिका घेणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली होती. त्यानंतर आता भाजपची भूमिका काय असेल याबाबत फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. “आज बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले मला भेटले. त्यांनी राज्यसभेची निवडणूक बिनविरोध व्हावी अशी विनंती केली आहे. या संदर्भात भाजपच्या कोअर कमिटीमध्ये आम्ही चर्चा करू. त्यानंतर त्यांना कळवू असं सांगितलं आहे,” अशी माहिती फडणवीस यांनी दिलीय.

आम्ही सौदेबाजी करणारे नाही, तर संघर्ष करणारे लोक

तसेच काँग्रेसने निवडणूक बिनविरोध करावी अशी विनंती केल्यानंतर 12 आमदारांच्या निलंबनाची कारवाई रद्द करण्यात यावी अशी मागणी फडणवीस यांनी केली होती, असे सांगण्यात येत होते. या चर्चेवरदेखील फडणवीस यांनी सविस्तर भाष्य केले आहे. “बारा आमदारांचे निलंबन मागे घ्यावं असा विषय याठिकाणी नाही. भाजप अशा पद्धतीने सौदेबाजी करत नाही. या उडवलेल्या पतंगी आहेत. बारा आमदार जे निलंबित झाले आहेत, ते नियमबाह्य आहे. त्या संदर्भात आम्ही न्यायालयीन लढाई लढत आहोत. आम्ही सौदेबाजी करणारे नाही, तर संघर्ष करणारे लोक आहोत,” असं फडणवीस यांनी म्हटलंय.

शिवसेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेसवर विश्वास नाही का ?

दरम्यान, निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी काँग्रेसने भाजपला विनंती केल्यामुळे अनेक चर्चा रंगल्या आहेत. काँग्रेसला महाविकास आघाडीतील शिवसेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेसवर विश्वास नाही का ? असा प्रश्न विचारला जात आहे. तर या सर्व चर्चांच्या पलीकडे जाऊन काँग्रेसच्या विनंतीनंतर भाजप काय निर्णय घेणार याची सर्वांना उत्सुकता लगली आहे.

इतर बातम्या :

काँग्रेसकडून राज्यसभेसाठी रजनी पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल, महाविकास आघाडी नेत्यांना विजयाचा विश्वास

मुख्यमंत्र्यांचा अजित पवार, काँग्रेसला धक्का? प्रभाग रचनेवर कॅबिनेटमध्ये मतभेद? नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर

(devendra fadnavis comment on congress demand of unopposed election of rajya sabha said our bjp core committee will think on it)

Follow Us
राऊत हे दलालांचे नेते: नवनाथ बन यांचा जोरदार पलटवार
संजय राऊत हे दलालांचे नेते: नवनाथ बन यांचा जोरदार पलटवार
मांसाहारींना घर नाकारल्याने ब्रोकर भावेश कावरेवर टीकेची झोड, मनसे...
ताडदेव गृहप्रकल्प वाद; मांसाहारींना घर नाकारल्याने ब्रोकर भावेश कावरेवर टीकेची झोड, मनसे नेते थेट...
अमित शाह यांचा चर्चेचा प्रस्ताव, खरगे यांचा विलंबावर पलटवार
संसदीय वादंग: अमित शाह यांचा चर्चेचा प्रस्ताव, खरगे यांचा १९ दिवसांच्या विलंबावर पलटवार
मनोज जरांगेंचा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर उपोषणाचा कडक इशारा
Manoj Jarange | मनोज जरांगेंचा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर उपोषणाचा कडक इशारा; मुंबईत मराठ्यांना येण्याचे आवाहन
असीम सरोदे यांचे सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवर विश्लेषण
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा वाद अंतिम टप्प्यात. असीम सरोदे यांचे सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवर विश्लेषण
धनुष्यबाण गोठवून पक्ष ठाकरेंना देणार, सरोदे यांचा दावा
शिवसेना पक्षचिन्ह सुनावणी: धनुष्यबाण गोठवून पक्ष ठाकरेंना देणार, सरोदे यांचा दावा
मांसाहार करणाऱ्यांना घर नाही म्हणण्यावर टीकेची झोड
भावेश कावरेच्या वादग्रस्त जाहिरातीवरून राज्यात संताप: मांसाहार करणाऱ्यांना घर नाही म्हणण्यावर टीकेची झोड
तामिळनाडूच्या निर्णयावरून अमित ठाकरेंनी केला सरकारवर प्रहार
नीट परीक्षा आणि तामिळनाडूच्या निर्णयावरून अमित ठाकरेंनी केला सरकारवर प्रहार
दिल्लीच्या रस्त्यावर माकडं जशी उड्या मारतात... गांधींवर मस्केंची टीका
Naresh Maske | दिल्लीच्या रस्त्यावर माकडं जशी उड्या मारतात... राहुल गांधींवर नरेश मस्केंची बोचरी टीका!
देवेंद्र फडणवीस यांच्या मागणीनुसार मुंबईसाठी २३८ एसी लोकल मंजूर
मुंबईला मिळणार २३८ एसी लोकल; फडणवीसांनी मानले केंद्र सरकारचे आभार