नागपूर : नागपूरमधून महत्त्वाची बातमी समोर येत आहे. नागपूरमध्ये भाज्याचे (vegetable) भाव चांगलेच कडाडले आहेत. वाढलेल्या भाज्यांच्या भावामुळे किचन बजेट (Budget) कोलमडलं आहे. पाले भाज्यापासून ते फळभाज्यापर्यंत सर्वच भाज्यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. चवळीचा भाव 320 रुपयांवर पोहोचला आहे. तर टोमॅटो (tomato) 80 रुपये किलो झाले आहेत. बटाटे, कांदा, लसून, फ्लॉवर, भेंडी, पालक अशा सर्वच भाज्यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. यंदा राज्याच्या अनेक भागात अतिवृष्टी झाली. अतिवृष्टीचा मोठा फटका हा पिकांना बसला. पालेभाज्या आणि फळभाज्यांचे पिक देखील पावसाच्या तडाक्यातून सुटू शकले नाही. अतिवृष्टीमुळे पिक खराब झाले. परिणामी मार्केटमधील भाज्याची आवक कमी झाली. मार्केटमधील आवक कमी झाल्याने भाज्याचे दर गगनाला भिडले आहेत. चवळीच्या भाजीचा भाव प्रति किलो तब्बल 320 रुपये एवढा झाला आहे. चवळीच नाही तर प्रत्येत भाज्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. भाजीचे दर वाढल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडल्याचं पहायला मिळत आहे.