AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpur Thalassemia | नागपुरातील थॅलेसेमियाग्रस्त मुलांना एचआयव्हीची लागण, एकाचा मृत्यू, राज्याच्या मुख्य सचिवांना नोटीस

एनएचआरसीने स्वत:हून गंभीर दखल घेतली. सहा आठवड्यांत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. तसेच चौकशीअंती दोषी आढळणार्‍यावर कारवाई होईल. मृत बालकाच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई संदर्भात काय कारवाई केली? याबाबतही एचएचआरसीने खुलासा मागितला आहे. या प्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नागपूरला आले असताना दिले होते.

Nagpur Thalassemia | नागपुरातील थॅलेसेमियाग्रस्त मुलांना एचआयव्हीची लागण, एकाचा मृत्यू, राज्याच्या मुख्य सचिवांना नोटीस
नागपुरातील थॅलेसेमियाग्रस्त मुलांना एचआयव्हीची लागण, एकाचा मृत्यू,
| Edited By: | Updated on: May 28, 2022 | 4:34 PM
Share

नागपूर : नागपुरातील थॅलेसेमियाग्रस्त मुलांना एचआयव्हीची लागण झाल्याप्रकरणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं (National Human Rights Commission) राज्याच्या मुख्य सचिवांना नोटीस पाठविली. नागपुरातील चार थॅलेसेमियाग्रस्त मुलांना एचआयव्हीची लागण झाली. यापैकी एकाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मुख्य सचिव आणि अन्न व औषध प्रशासन (Food and Drug Administration) विभागाच्या सचिवाला नोटीस बजावली. सहा आठवड्यांत चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. मुलांना दूषित रक्तातून एचआयव्ही ते संक्रमण झाल्याची शक्यता आहे. नागपूरमध्ये चार थैलेसेमिया मुलांना रक्तसंक्रमणानंतर एचआयव्हीची बाधा झाली. यामध्ये चारपैकी एकाचा मृत्यू झाला आहे. ही सर्व बालके दहा वर्षे वयोगटाच्या आतील आहेत. नागपुरातील डॉ. विंकी रुग्वानी ( Dr. Vinky Rugwani) यांच्याकडे या बालकांचे नियमित रक्त बदलविले जात होते. या बालकांना नेमक्या कोणत्या रक्तपेढीतून रक्त चढवण्यात आले, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. त्यामुळं शहरातील कोणत्या रक्तपेढीत एचआयव्हीबाधित रक्त पुरवठा झाला याची स्पष्टता नाही.

चौकशीसाठी समितीची स्थापना

नागपुरातील एचआयव्हीबाधित चार बालकांपैकी एकाचा मृत्यू झाला. या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. याप्रकरणी राज्याचे आरोग्य विभागाचे सहाय्यक उपसंचालक आर. के. धकाते यांनी गुरुवारी 26 मे रोजी समिती स्थापन करण्यात आली. या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. नागपुरातील अनेक रक्तपेढ्यांमध्ये न्यूक्लिक अॅसिड चाचणी (नॅट) होत नाही. त्यामुळे एचआयव्ही किंवा त्याप्रकारच्या संक्रमणाबाबत माहिती कळू शकत नाही.

एनएचआरसीकडून गंभीर दखल

आधी थॅलेसेमियाने ग्रस्त असलेल्या पाच बालकांना हिपॅटायटीस सीची लागण झाली. दोन बालकांना हेपेटायटीस बीची लागण झाल्याचेही समोर आले. त्यामुळं या संपूर्ण प्रकरणाची एनएचआरसीने स्वत:हून गंभीर दखल घेतली. सहा आठवड्यांत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. तसेच चौकशीअंती दोषी आढळणार्‍यावर कारवाई होईल. मृत बालकाच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई संदर्भात काय कारवाई केली? याबाबतही एचएचआरसीने खुलासा मागितला आहे. या प्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नागपूरला आले असताना दिले होते.

Follow Us
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?.
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह..
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह...
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी.
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला.
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?.
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?.
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप.
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?.
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले.
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा.