AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RSS meeting : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मोठी बैठक, देशभरातून पदाधिकारी नागपुरात, कोणती रणनीती ठरणार?

देशातील सध्याची राजकीय स्थिती, आगामी निवडणुका, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील कार्यकारिणी अशा विविध विषयांवर मंथन या बैठकीत अपेक्षित आहे. त्यासाठीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे केंद्रीय स्तरावरचे विविध विभागाचे पदाधिकारी या बैठकीला येणार आहेत.

RSS meeting : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मोठी बैठक, देशभरातून पदाधिकारी नागपुरात, कोणती रणनीती ठरणार?
RSS
| Edited By: | Updated on: Sep 01, 2021 | 1:53 PM
Share

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) समन्वय बैठकीचं आयोजन केलं आहे. नागपुरात (Nagpur) ही बैठक होत आहे. येत्या 2 ते 7 सप्टेंबर दरम्यान, या बैठकीत विविध विषयांवर चर्चा होणार आहे. देशभरातील पदाधिकारी या बैठकीसाठी येणार आहेत. हे पदाधिकारी आज रात्रीपर्यंत नागपुरात दाखल होणार आहेत.

देशातील सध्याची राजकीय स्थिती, आगामी निवडणुका, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील कार्यकारिणी अशा विविध विषयांवर मंथन या बैठकीत अपेक्षित आहे. त्यासाठीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे केंद्रीय स्तरावरचे विविध विभागाचे पदाधिकारी या बैठकीला येणार आहेत.

सरसंघचालक मोहन भागवत, सर कार्यवाहक दतात्रय होसबळे या बैठकीला उपस्थित असतील. संघाच्या पुढील कार्यक्रमावर चिंतन होणार असून, वर्षभराच्या कामाची रुपरेषा या बैठकीत ठरणार आहे.

सरसंघचालकांचा 10 लाख तरुणांशी संवाद

दरम्यान सरसंघचालक मोहन भागवत यांनी नुकतंच स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त 35 देशातल्या जवळपास 10 लाख तरुण-तरुणींना ऑनलाईन संबोधीत केलं होतं. या कार्यक्रमाला देशविदेशातील अनेक तरुणांनी हजेरी लावली होती. यामध्ये 40 विद्यार्थी नेते, काही मार्गदर्शक, अजय पीरामल, जनरल व्ही.पी. मलिक, पी.टी. उषा यांनीही सहभाग नोंदवला होता.

जगभरात धार्मिक मुद्यांच्या आधारावर फूट पाडण्याचा प्रयत्न केला जातोय. त्याच पार्श्वभूमीवर मोहन भागवत यांनी भारत हा विविधतेला स्वीकारणारा देश असल्याचं म्हटलं होतं. भारताला एक व्हायचंय. कारण जग हे एकच आहे. जगात एक होण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. एक प्रकार असाही आहे की, जे फिट आहे त्याला ठेवायचं आणि जे अनफिट आहे त्याला काढून टाकायचं. पण तो आपला मार्ग नाही. याला युनाईट होणं म्हणत नाहीत. भारत हा सर्व प्रकारच्या विविधतांना स्वीकारतो आणि एखाद्या गोष्टीत फरक असेल तर तो न मिटवता एकत्र चालत रहातो.

संबंधित बातम्या  

RSS प्रमुखांचं पुन्हा वक्तव्य-भारत विविधतेला स्वीकारतो, 35 देशांच्या 10 लाख तरुणांना संबोधन

Follow Us
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान.
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा.
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.