AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Babasaheb Ambedkar | बाबासाहेब आंबेडकरांच्या वस्तूंचे संग्रहालय अर्धवट! नागपुरातील संग्रहालय रखडल्याचे कारण काय?

शासनाच्या उदासीन धोरणामुळे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नागपुरातल्या चिचोलीतील संग्रहालय अर्धवट राहीलंय. बाबासाहेबांच्या अमूल्य वस्तू पेटीबंद करण्यात आल्यात. निधी न मिळाल्याने बाबासाहेबांच्या वस्तूंचे संग्रहालय रखडले असल्याचा आरोप शांतीवन प्रमुख संजय पाटील यांनी केलाय.

Babasaheb Ambedkar | बाबासाहेब आंबेडकरांच्या वस्तूंचे संग्रहालय अर्धवट! नागपुरातील संग्रहालय रखडल्याचे कारण काय?
नागपूर जिल्ह्यातील चिचोलीतील शांतीवनातील या वस्तू संग्रहालयाचे रखडलेले काम.Image Credit source: tv 9
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Apr 14, 2022 | 10:56 AM
Share

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Babasaheb Ambedkar) यांच्या अमूल्य अशा वस्तू शासनाच्या उदासीन धोरणामुळे पेटीबंद आहेत. नागपूरच्या चिंचोली येथील शांतीवनात या वस्तू आज जागा नसल्याने पेटीबंद आहेत. शासनाने निधी न उपलब्ध करून न दिल्यानं संग्रहालयाचे काम रखडलेले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वापरलेल्या जवळपास 500 अमूल्य वस्तू नागपुरात आहेत. बाबासाहेब यांच्यानंतर त्यांच्या वस्तू त्यांचे स्वीय सहायक नानकचंद रात्तु यांनी वामनराव गोडबोले यांच्याकडे दिल्या. वामनराव गोडबोले हे पहिल्या धम्मचक्र प्रवर्तन सोहळ्याचे सचिव होते. बाबासाहेबांनंतर रात्तु त्यांनी वामनराव गोडबोले (Vamanrao Godbole) यांच्याकडे या वस्तू दिल्या. नागपूर जिल्ह्यातील चिचोली येथे येथील शांतीवनात (Shantivan) या सर्व वस्तू जतन करून ठेवल्या आहेत.

7.5 कोटी रुपये थांबविले

मधल्या काळात यातील काही वस्तू खराब होत असल्याचं लक्षात आलं. त्यामुळं त्यावर रासायनिक प्रक्रिया करण्यात आली. 2011 मध्ये याठिकाणी यासर्व वस्तू सुरक्षित ठेवण्यासाठी मोठं संग्रहालय व्हावं या हेतूने 2011 मध्ये विदर्भ विकास पॅकेज अंतर्गत 40 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. यातील 32.5 कोटी रुपये शांतीवनाला मिळाले. त्यातून संग्रहालय, वसतिगृह, उपासना कक्ष यांचं काम सुरू झालं. मात्र, आता राज्य सरकार ही जागा आणि वस्तू सामाजिक न्याय विभागाने देण्याचा आग्रह करत आहे. उर्वरित 7.5 कोटी रुपये थांबविले आहे. त्यामुळं सर्व काम अर्धवट अवस्थेत आहेत. परिणामी बाबासाहेबांच्या वस्तू पेटीबंद ठेवण्यात आल्या आहेत, अशी माहिती शांतीवन प्रमुख संजय पाटील यांनी दिली.

उदासीन धोरणामुळं वस्तू पेटीबंद

ज्या बाबासाहेबांनी कोट्यवधी दलित, शोषित, पीडितांना न्याय मिळवून दिला, या देशाला संविधान दिलं त्याच बाबासाहेबांच्या अमूल्य वस्तू ठेवण्यासाठी आज संग्रहालय नाही, ही शोकांतिका आहे. बाबासाहेबांच्या वस्तूंच्या रुपानं नव्या पिढीला अनुभवता येईल. मात्र, शासनाच्या उदासीन धोरणामुळं या वस्तू पेटीबंद आहेत. त्यामुळं संग्रहालयासाठी उर्वरित निधी वळता करून बाबासाहेबांच्या वस्तू कशा लोकांना बघता येईल, यासाठी शासनानं प्रयत्न करावे, अशी मागणी जोर धरू लागलीय.

Photo : Babasaheb Ambedkar Jayanti | नागपुरातील चिचोलीत बाबासाहेबांच्या वस्तूंचा संग्रह; ऐतिहासिक वस्तूंवर रासायनिक प्रक्रिया

Nagpur Education | मनपाच्या 6 इंग्रजी शाळा कार्यरत, मनपा आयुक्तांची शाळांना भेट; विद्यार्थ्यांशी साधला संवाद

Chandrapur Education | एसटी बंदमुळं मामला येथील विद्यार्थ्यांची चंद्रपुरातील शाळा बंद; शिक्षिकेचं शाळा संपल्यानंतर गावात जाऊन ज्ञानदान

Follow Us
पुन्हा चर्चा रंगल्या! सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीने...
पुन्हा चर्चा रंगल्या! सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीने प्रवास, भाजप नेता म्हणाला...
शिंदेंच्या अनुपस्थितीमुळे एमएमआरडीएच्या कार्यक्रमावर चर्चांना उधाण
मुंबईतील एमएमआरडीएच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अनुपस्थित
आमसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष
सिंधुदुर्गातील दोडामार्ग आमसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष
विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर आश्रमशाळा व्यवस्थापनावर उईके संतापले
साप चावल्याने विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर आश्रमशाळा व्यवस्थापनावर मंत्री उईके संतापले
मांसाहार करत असाल तर... भावेश कावरे यांच्या व्हिडिओने मुंबईत खळबळ
Tardeo Estate Agent | मांसाहार करत असाल तर... भावेश कावरे यांच्या व्हिडिओने मुंबईत खळबळ, नेमकं प्रकरण काय?
'बावनकुळेंना चांगलं म्हणायचो, पण आता ते मनातून उतरले'
बावनकुळेंना चांगलं म्हणायचो, पण आता ते मनातून उतरले - जरांगे पाटलांचे खळबळजनक विधान.
पतीला गमावलं, महिनाभरात पत्नीनेही आयुष्य संपवलं; नेमकं काय घडलं?
पतीला गमावलं, महिनाभरात पत्नीनेही आयुष्य संपवलं; दोन मुलींवरून आई-वडिलांचं छत्र हरपलं, नेमकं काय घडलं?
विद्यार्थिनींचा अभिजीत दिपके यांनी शेअर केलेला व्हिडिओ व्हायरल
नागपूरमधील विद्यार्थिनींचा संघर्ष: बस सेवेच्या मागणीचा अभिजीत दिपके यांनी शेअर केलेला व्हिडिओ व्हायरल
मुंबईकडे येणाऱ्या लोकल 25 ते 30 मिनिटे उशिराने
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत: मुंबईकडे येणाऱ्या लोकल 25 ते 30 मिनिटे उशिराने
राज ठाकरंनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली अन् अचानक रद्द केली, काय घडलं?
राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली अन् अचानक रद्द केली, असं काय घडलं?