AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महायुतीसोबत की महाविकास आघाडीसोबत जायचं…; बच्चू कडूंनी बोलावली पदाधिकाऱ्यांची बैठक

Bachhu Kadu on Prahar Meeting for Vidhansabha Election : आदार बच्चू कडू यांनी एक महत्वाची बैठक बोलावली आहे. ही बैठक आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुशंगाने आहे. याबाबत बच्चू कडू यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना महत्वाचं विधान केलं आहे. वाचा सविस्तर...

महायुतीसोबत की महाविकास आघाडीसोबत जायचं...; बच्चू कडूंनी बोलावली पदाधिकाऱ्यांची बैठक
बच्चू कडूImage Credit source: Facebook
| Edited By: | Updated on: Jun 12, 2024 | 8:27 PM
Share

नुकतंच लोकसभा निवडणूक पार पडली आहे. या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात चर्चा होतेय ती विधानसभा निवडणुकीची… प्रादेशिक पक्ष विधानसभेला आघाडीसोबत असणार की युतीसोबत याचीही महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चा होतेय. अशातच प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक बोलावली आहे. विधानसभा लढविण्या संदर्भात उद्या आमची मुंबईला मिटींग आहे. वीस ठिकाणच्या लोकांना आम्ही बोलावलेलं आहे. सगळ्यांसोबत चर्चा करून व्ह्यूव रचना आखली जाणार आहे. युतीसोबत किंवा आघाडी सोबत कसं जाता येईल किंवा व्यक्तिगत रित्या कसं लढता येईल? यावर आम्ही चर्चा करणार आहोत, असं बच्चू कडू म्हणाले.

आम्ही महायुतीसोबत आहोत याचा अर्थ असा नाही की आम्ही लढू नये. युतीसोबत असलो तरी आम्हाला लढणं गरजेचं आहे. आमची पार्टी आहे. आम्हाला हातपाय हलवणे गरजेचे आहे. आम्हाला राजकारण करावं लागेल. जागा लढवाव्या लागेल राजकीय पार्टीचा हा गुणधर्म असतो. या जागा संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही लढणार आहोत. पहिले आम्ही कसं लढणार काय लढणार हे ठरवू आणि आमचा अजेंडा सामान्य माणसाचा राहील, असं बच्चू कडू म्हणाले.

राज्यमंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होत आहे. यावर बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मंत्रिमंडळ विस्तार झाला तर मला तर देणार नाहीत आणि दिलं तरी मी घेणार नाही. आलंच वाट्याला तर आमचे राजकुमार पटले यांना देऊ…आदिवासी आमदार आहे. आम्ही दोनच आमदार असताना मजबुतीने सोबत राहून काम केलं. राजकुमारने आमचा पक्ष मजबूत ठेवला त्यांना देऊ. फुटीचं कारण काय ते दोन दिवस वेळ द्यावा लागेल मी सगळ सांगेन, असं बच्चू कडू म्हणाले.

मी वाट पाहिली नाही. एनडीएकडून एक एक पाऊल पडत आहे. ते माझ्या सोईचं पडत आहे. एकूण विचार केला तर एनडीने सांभाळून घ्यायला हवं होतं. आम्ही ज्या पद्धतीने सोबत राहून मदत केली. एका वर्षात ते दिसून गेले आणि त्याचे परिणाम आम्हाला भोगावं लागलं, असं म्हणत बच्चू कडू यांनी एनडीएच्या शपथविधी सोहळ्याच्या निमंत्रणावर प्रतिक्रिया दिली आहे.

निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.