AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘त्या’ दिवशी महाराष्ट्रातील सरकार पडेल…; नाना पटोले यांचं सर्वात मोठं विधान

Congress Leader Nana Patole on Maharashtra Politics : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर भाष्य केलं आहे. लवकरत सरकार पडणार आहे, असं विधान नाना पटोले यांनी केलं आहे. नाना पटोले नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर......

'त्या' दिवशी महाराष्ट्रातील सरकार पडेल...; नाना पटोले यांचं सर्वात मोठं विधान
| Updated on: May 09, 2024 | 5:46 PM
Share

निवडणुकीच्या तोंडावर काही गोष्टी अंगावर येऊ नये. म्हणून मराठा आरक्षणासंदर्भात सत्तेचा उपयोग करत पोलीस रिपोर्ट अशा पद्धतीचा आणला गेला. निवडणुकीच्या तोंडावर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. ही घटना सहा सात महिन्यापूर्वीची असताना निवडणुकीच्या तोंडावर हा विषय काढला हे संशयास्पद आहे. विधानसभेचे अधिवेशन होऊ घातलं होत ते होणार की नाही होणार? कारण 4 जूनला निकाल आल्यानंतर महाराष्ट्रातील सरकार पडेल. पण या प्रश्नाची फेर तपासणी व्हावी अशी मागणी काँग्रेसच्या वतीने करत आहे, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे. ते नागपुरात माध्यमांशी बोलत होते.

पटोलेंचे भाजपवर गंभीर आरोप

भाजप निवडणूक हरत असल्यामुळे बूथ कॅपचर चे प्रमाण देशात मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. भाजपच्या नेत्याच्या पोरांनी गुजरातमध्ये सरकार असल्यामुळे बूथ कॅप्चरिंग करून स्वतः इन्स्टाग्रामवर टाकलं. लोकशाहीचा गळा घोटण्याचा काम भाजप करत आहे. निवडणूक आयोगाने तात्काळ याची दखल घ्यावी. अशी मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे, असं नाना पटोलेंनी सांगितलं.

नाना पटोलेंचं आश्वासन काय?

देशातील वातावरण राहुल गांधींच्या नेतृत्वात गॅरेंटी वॉरंटी सहित दिली आहे. भाजप विरोधात प्रचंड चीड लोकांमध्ये आहे. बदलाचे वारे देशभरामध्ये सध्या पाहायला मिळत आहे. आज जगात भारत हा युवकांचा देश म्हणून नावलौकिक आहे. बेरोजगार करण्याचा पाप नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारने केलं. त्यामुळे युवकांना न्याय देण्याची भूमिका ही काँग्रेसची प्राथमिकता असणार आहे. अग्नि योजना बंद करून रेगुलर मिल्ट्रीची भरती करून देशातील तरुण आणि तरुणींना लढण्याचा आणि संधी देण्याचे काम काँग्रेस करणार आहोत. पेपर लीक होण्याचा जे प्रमाण आहे, त्याला रोखण्यासाठी जन्मठेप करण्याची शिक्षा कायद्याचं रूपांतर करून आमच्या सरकार आल्यावर करू, असं म्हणत पटोलेंनी लोकांना आश्वस्त केलं.

महाराष्ट्रात 108 नंबरची ॲम्बुलन्स रुग्णांसाठी चालवली जाते. याची सुरुवात काँग्रेसने केली होती. त्याला एक्सटेन्शन देण्यासाठी दहा हजार कोटीचा भ्रष्टाचार महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे आणि फडणवीस सरकारने केलेला आहे. सामान्य रुग्णांना वेळेवर उपचार मिळू नये आणि ते तडफडत मरावे. ब्लॅक लिस्ट कंपन्यांना सरकारने काम दिलं आहे, असंही नाना पटोले म्हणाले.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.