AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरकार म्हणजे विषकन्या, सरकारची सावली पडली तरी प्रकल्प नष्ट होतो; नितीन गडकरी यांचं धक्कादायक विधान

शरद जोशी नेहमी म्हणायचे क्रॉप पॅटर्नचा अभ्यास करा. संशोधन करा. आज ते कठिण नाहीये, असं केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं. ते कृषी पुरस्कार सोहळ्यात बोलत होते.

सरकार म्हणजे विषकन्या, सरकारची सावली पडली तरी प्रकल्प नष्ट होतो; नितीन गडकरी यांचं धक्कादायक विधान
nitin gadkariImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 16, 2023 | 9:20 AM
Share

नागपूर, दिनांक 16 जुलै 2023 : गॉड आणि गव्हर्नमेंट या दोघांवर आपला विश्वास असतो. सरकारचा हस्तक्षेप, सरकारचा सहभाग आणि सरकारची सावली जरी ज्या प्रकल्पावर पडते, तो प्रकल्प नष्ट होतो, या थिअरीवर माझा विश्वास आहे. सरकार म्हणजे विषकन्येसारखं असतं. त्यामुळे सरकारपासून जो दूर राहील तोच प्रगती करू शकतो, असं मोठं आणि धक्कादायक विधान केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. सरकारमधील अडचणी ज्या आहेत, त्या वेगळ्या आहेत. आता मांडलेल्या अनेक गोष्टी कटू सत्य आहेत, असंही नितीन गडकरी म्हणाले.

नागपूरमध्ये एका कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी यांनी हे धक्कादायक विधान केलं. देशाचं कृषी उत्पन्न 22 टक्क्यावर नेण्याचं आज आपल्यासमोर सगळ्यात मोठे टार्गेट आहे. आणि हे ज्या दिवशी नेऊ, त्या दिवशी शेतकऱ्यांचे मजुरी 1500 रुपये होईल. याचं सगळ्यात मोठा कारण असं आहे की, हे करण्याकरता काही ग्रास रूट रियालिटी आहेत. माझं हे मत आजही नाही, मी विरोधी पक्षात होतो तेव्हाही माझं हेच मत होतं. आजही आहे. त्या बाबतीत मी नेहमी म्हणतो की, गॉड आणि गव्हर्मेंट या दोघांवर आपल्या सगळ्यांचा विश्वास असतो. त्यामुळे मी पहिल्यांदा या थेरीचा समर्थक आहे, असं गडकरी म्हणाले.

परमेश्वराला माहिती

यावर्षी एमएसपी जी दिली त्यामध्ये अडचणी आहेत. मार्केट प्राईज आणि एमएसपी यामध्ये मार्केट प्राइस कमी आणि एमएसपी जास्त आहे. त्याचा बॅलन्स करण्याकरता दीड लाख कोटी द्यावे लागले. जे घेतलेल अन्न आहे ते ठेवायला, स्टोरेज करायला गोडाऊन बरोबर नाही. त्यातून किती सडलं? काय झालं? ते परमेश्वराला माहिती, असंही ते म्हणाले. मी काही त्यावर बोलत नाही. मी मंत्री असल्यामुळे मलाही बोलण्याच्या मर्यादा आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सरकारने काय केले पाहिजे, यावर शरद जोशींनी पॅटर्न ठरवला पाहिजे, हा पर्याय दिला आहे, असंही त्यांनी सांगितलं.

तोपर्यंत स्थिरता नाही

जोपर्यंत एका एकरात 20 क्विंटल कापूस होत नाही, जोपर्यंत एका एकरात कमीत कमी 15 क्विंटल सोयाबीन होत नाही, आणि कमीत कमी एका एकरात 30 टन संत्रा होत नाही. तोपर्यंत काही होणार नाही. त्यामुळेच उत्पादन वाढवलं पाहिजे. तरच शेतकऱ्यांना स्थिरता येईल, असंही त्यांनी सांगितलं. कोणत्याही देशातील बाजारात मागणी आणि पुरवठ्यावरच भाव आधारीत असतो, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

व्हिजन तयार केलं पाहिजे

दुधाचा धंदा चांगला झाला तर त्याला गायी पाहिजे. पण आपल्याकडे गायी चांगल्या नाही. पुढल्या पाच वर्षात आपल्याला 25 लिटर दूध देणाऱ्या 25 हजार गायी तयार करायच्या आहेत. गायींसाठी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल तयार करण्यात येणार आहोत. तंत्राचा वापर करून दूधाचं उत्पादन वाढवलं तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. त्याबाबतचं व्हिजन तयार केलं पाहिजे, असंही त्यांनी म्हटलंय.

तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.
अजितदादांचा अंत्यविधी सुरु असताना... तटकरेंच्या विधानाने चर्चांना उधाण
अजितदादांचा अंत्यविधी सुरु असताना... तटकरेंच्या विधानाने चर्चांना उधाण.
सुनेत्रा पवारांच्या पाठीशी केंद्राची ताकद; तटकरे यांचे मोठे विधान
सुनेत्रा पवारांच्या पाठीशी केंद्राची ताकद; तटकरे यांचे मोठे विधान.
राज ठाकरेंनी घाबरू नये, भगतसिंह कोश्यारींच्या विधानाची चर्चा!
राज ठाकरेंनी घाबरू नये, भगतसिंह कोश्यारींच्या विधानाची चर्चा!.
रोहित पवारांच्या घातपाताच्या दाव्यानंतर मोठ्या घडामोडी, DGCA चे पथक...
रोहित पवारांच्या घातपाताच्या दाव्यानंतर मोठ्या घडामोडी, DGCA चे पथक....