AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी ! जातीय जनगणनेवर संघाची भूमिका जाहीर; भाजपची कोंडी होणार?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने यंदाही भाजप आमदार आणि मंत्र्यांसाठी बौद्घिक वर्गाचं आयोजन केलं आहे. या बौद्धिक वर्गाला भाजपसह शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री आले होते. पण अजितदादा गटाचा एकही आमदार बौद्धिक वर्गाकडे फिरकला नाही. यावेळी आमदारांना संघाने पंचसूत्री कार्यक्रम दिला आहे. त्यात जनगणनेच्या मुद्द्यावर बोट ठेवण्यात आलं आहे. संघाने जनगणनेच्या मुद्द्यावर भूमिका स्पष्ट केल्याने भाजपची कोंडी होण्याची शक्यता आहे.

मोठी बातमी ! जातीय जनगणनेवर संघाची भूमिका जाहीर; भाजपची कोंडी होणार?
rssImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Dec 19, 2023 | 1:17 PM
Share

गजानन उमाटे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, नागपूर | 19 डिसेंबर 2023 : बिहारमध्ये जातीय जनगणना झाल्यानंतर महाराष्ट्रातही जातीय जनगणनेच्या मागणीने जोर धरला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी जातीय जनगणना करण्याची मागणी केली आहे. भाजपही जातीय जनगणनेच्या बाजूने आहे. त्यामुळे राज्यात जातीय जनगणना होणार असल्याची चर्चा जोर धरत आहे. ओबीसी आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा तापल्याने या मागणीने अधिकच जोर धरला आहे. ही चर्चा सुरू असतानाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मात्र जातीय जनगणनेवरून वेगळी भूमिका घेतली आहे. त्यामुळे येत्या काळात जातीय जनगणनेच्या मुद्द्यावरून भाजपची चांगलीच कोंडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने रेशीमबागेत भाजप आणि शिंदे गटाच्या आमदार आणि मंत्र्यांसाठी बौद्धिक वर्गाचं आयोजन केलं होतं. संघाचे विदर्भ सरसंघचालक श्रीधर घाडगे यांनी यावेळी आमदारांना मार्गदर्शन केलं. यावेळी घाडगे यांनी जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका स्पष्ट केली. संघाचं शताब्दी वर्ष येत आहे. या निमित्ताने संघाला समाजात पाच प्रकारचे बदल व्हावे हे अपेक्षित आहे. ती पंचसूत्री आज आमदारांना सांगितली आहे. एकीकडे आपण जातीय विषमता नष्ट व्हावी म्हणतो तर दुसऱ्या बाजूला काही लोक जातीय गणनेची मागणी करतात. जर जातीय विषमता नष्ट करायची असेल तर जातीय गणना करण्याची गरज नाही असं संघाला वाटतंय. काही राजकीय पक्ष जातीय जनगणनेची मागणी करत असले तरी जातीगणना व्हायला नको असं संघाला वाटतंय. संघाच्या या भूमिकेची भाजपला अडचण नाही, असं श्रीधर घाडगे यांनी स्पष्ट केलं.

पंतप्रधान इथेच घडले

आपल्या देशाचे पंतप्रधान इथेच घडले. कारण तृतीय संघशिक्षावर्ग इथेच होते. आणि पंतप्रधानांनी तृतीय संघशिक्षावर्ग केलंय. कठीण परिस्थितीत देशाचं काम करायला तयार करणे हे या भूमीनं साधलंय. संघ काही करणार नाही, पण स्वयंसेवक काही सोडणार नाही. आपले स्वयंसेवक सर्व क्षेत्रात गेले आणि चांगलं काम केलंय. मग ते राजकीय क्षेत्र असो की कोणतंही स्वयंसेवकांनी चांगलं काम केलंय, असं श्रीधर घाडगे म्हणाले.

विचार टिकून राहणं इतकं…

राजकीय आयुष्यात आपण अनेक चढउतार पाहिले. आपण दोम वरून 183 वर गेलाय. विचार घेऊन टिकून राहणं सोप्पं नसतं. शताब्दीचा वर्षाचा विचार होतो, तेव्हा स्वयंसेवकांचा विचार होतो. समन्वयाच्या बैठकीत पुढील दोन वर्षांचं नियोजन करण्यात आलंय. देशात कशा प्रकारचं परिवर्तन पाहिजे हे पाच कामं सरसंघचालक सांगत असते, असं घाडगे यांनी सांगितलं.

संघाचा आमदारांसाठीचा पंचसूत्री कार्यक्रम

1) एकीकडे जातीभेद मानायचा नाही. दुसरीकडे जातीय जणगणनेची मागणी करायची. समरस भाजप उभा रहावा अशी आमची भावना

2) भारताची कुटुंब व्यवस्था आणखी मजबूत करणे

3) पर्यावरणाचं संतुलन साधणे

4) आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीसाठी आपली भूमिका. स्वाधीनतेपासून स्वातंत्र्याकडे… स्वदेशी, स्वावलंबन

5) संविधानाचं पालन करताना अधिकार असताना कर्तव्य बजावने गरजेचं. नागरी कर्तव्य

चंद्रपूरमध्ये भाजपची ठाकरेंच्या सेनेला ऑफर? महापौर कोणाचा; चर्चा सुरु
चंद्रपूरमध्ये भाजपची ठाकरेंच्या सेनेला ऑफर? महापौर कोणाचा; चर्चा सुरु.
बारामतीत होणारी पोटनिवडणूक एकतर्फी? संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?
बारामतीत होणारी पोटनिवडणूक एकतर्फी? संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?.
PF Withdrawal Update : खोटं बोलून PF काढताय? लगेच थांबा
PF Withdrawal Update : खोटं बोलून PF काढताय? लगेच थांबा.
नवी मुंबईत मद्यधुंद इनोवा चालकाची वाहनांना धडक | VIDEO
नवी मुंबईत मद्यधुंद इनोवा चालकाची वाहनांना धडक | VIDEO.
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील पनवेल टोल नाक्यावर गोंधळ
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील पनवेल टोल नाक्यावर गोंधळ.
रहेजाच्या ऑफिसची तोडफोड; वंचितचे कार्यकर्ते अटकेत
रहेजाच्या ऑफिसची तोडफोड; वंचितचे कार्यकर्ते अटकेत.
संघाच्या शाखेत राजकारण होत नाही! मोहन भागवतांनी स्पष्टच सांगित
संघाच्या शाखेत राजकारण होत नाही! मोहन भागवतांनी स्पष्टच सांगित.
फडणवीसांकडून मेक इन इंडिया व औद्योगिक विकासावर भर
फडणवीसांकडून मेक इन इंडिया व औद्योगिक विकासावर भर.
भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर जाणार! फडणवीसांनी व्यक्त केला
भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर जाणार! फडणवीसांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाला सलमान खान आला म्हणून काय बिघडलं? संजय शिरसाट यांचा प्रश्न
कार्यक्रमाला सलमान खान आला म्हणून काय बिघडलं? संजय शिरसाट यांचा प्रश्न.