AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेवटच्या माणसापर्यंत योजना पोहोचत नाहीत, युवकांनी स्वयंरोजगाराकडे वळावे : देवेंद्र फडणवीस

नोकरी मागायला सगळे येतात मात्र स्वयं रोजगार करण्याकडे कोणी वळत नाही. युवकांनी आता स्वयंरोजगाराकडे वळावे, असं मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं.

शेवटच्या माणसापर्यंत योजना पोहोचत नाहीत, युवकांनी स्वयंरोजगाराकडे वळावे : देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते
| Edited By: | Updated on: Aug 16, 2021 | 9:42 PM
Share

नागपूर : नोकरी मागायला सगळे येतात मात्र स्वयंरोजगार करण्याकडे कोणी वळत नाही. युवकांनी आता स्वयंरोजगाराकडे वळावे, असं मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांनी व्यक्त केलं. पंतप्रधान रोजगार सर्जन कार्यक्रमासंदर्भात नागपुरात एका विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात फडणवीस बोलत होते. (schemes do not reach to last man youngsters have to think about self employment said Devendra fadnavis)

ट्रेनिंग इन्स्टिट्यूट नागपूरला व्हावं ही अपेक्षा

खादी व ग्रामोद्योग आयोगाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. विविध रोजगार निर्माण करणाऱ्या क्षेत्रासंदर्भात गरजू तरुणांना माहिती देण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना “या ठिकाणी छोटे छोटे स्टॉल्स लागले आहेत. त्यावरून दिसून येतं की रोजगार कसे निर्माण होतात. या उद्योगांना बळ ध्यायचं महत्वाचं काम आहे. कोरोनानंतर या उद्योगांना मदत केली तर ते चांगले होऊ शकतात. ट्रेनिंग इन्स्टिट्यूट नागपूरला व्हावं ही अपेक्षा आहे. ते पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू,” असे फडणवीस म्हणाले.

योजना शेवटच्या माणसापर्यंत पोहोचत नाहीत

तसेच पुढे बोलताना हा कार्यक्रम सामान्य माणसांपर्यंत पोहचविण्यासाठी सगळे प्रतिनिधी काम करतील. खादी ग्रामोद्योगच्या माध्यमातून चांगला कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यातून रोजगार निर्मिती होईल. योजना सुलभ करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काम केलं. योजना अनेक तयार होतात पण त्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचत नाहीत, अशी खंतही फडणवीस यांनी बोलवून दाखवली.

इतर बातम्या :

सेल्फी काढताना दादा पाण्यात पडला, धाकट्याचीही धरणात उडी, दोन सख्खे भाऊ बुडाले

राणेंच्या सात पिढ्या आल्या तरी कोकणातील सेना संपणार नाही, विनायक राऊतांचा हल्ला; आता निलेश राणेंचं जोरदार प्रत्युत्तर

आदिवासी समाजाच्या विकासासाठी मोदी सरकार कटिबध्द, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांची ग्वाही

(schemes do not reach to last man youngsters have to think about self employment said Devendra fadnavis)

Follow Us
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त...
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी.....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी......
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद.
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह...
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की.....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की......
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,.
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू.
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश...
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश....
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर...
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर....
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री...
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री....