दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकही शब्द शेतकऱ्यांबद्दल बोलले नाही, आर्यन खानसाठी कोर्टात जाणारा नेता उद्धव ठाकरेंवर बरसला!

दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकही शब्द शेतकऱ्यांबद्दल बोलले नाही. मुख्यमंत्री शेतकऱ्यांबद्दल बोलले असते तर बरं वाटलं असतं, अशी शेतकऱ्यांची भावना होती, असं किशोर तिवारी म्हणाले.

दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकही शब्द शेतकऱ्यांबद्दल बोलले नाही, आर्यन खानसाठी कोर्टात जाणारा नेता उद्धव ठाकरेंवर बरसला!
cm uddhav thackeray
Follow us
| Updated on: Oct 20, 2021 | 11:20 AM

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दसऱ्या मेळाव्यातील भाषणाची संबंध राज्यभर चर्चा झाली. या भाषणात भाजपवर तुटून पडताना येणाऱ्या काळातील शिवसेनेच्या राजकारणाची दिशा त्यांनी स्पष्ट केली. शिवसैनिकांमध्ये नेहमीप्रमाणे उर्जा जागवली. मात्र या भाषणात शेतकऱ्यांबद्दल मुख्यमंत्री बोलले नाहीत, बोलले असते तर बरं वाटलं असतं, अशी खंत व्यक्त करत शिवसेना नेते किशोर तिवारी यांनी घरचा आहेर दिलाय. हे तेच किशोर तिवारी आहेत, ज्यांनी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान निर्दोष असल्याचं म्हणत त्याच्या जामीनासाठी हायकोर्टात धाव घेतली आहे.

दसरा मेळाव्यात मुख्यमंत्र्यांच्या तोंड शेतकऱ्यांबद्दल एक शब्द नाही

दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकही शब्द शेतकऱ्यांबद्दल बोलले नाही. मुख्यमंत्री शेतकऱ्यांबद्दल बोलले असते तर बरं वाटलं असतं, अशी शेतकऱ्यांची भावना होती, असं किशोर तिवारी म्हणाले. पण त्याच वेळी मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचं मी शेतकऱ्यांना सांगितलं, असंही सांगायला किशोर तिवारी विसरले नाहीत.

जिल्हाधिकारी माजले आहेत, सरकारची प्रशासनाला भिती नाही

पाठोपाठ येणाऱ्या आपत्तीने शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. या नुकसानभरपाईबाबत बोलताना किशोर तिवारींची जीभ मात्र घसरली. मागच्या वर्षाचीही नुकसानभरपाई मिळाली नाही, यंदा तर पंचनामेच नाहीत. जिल्हाधिकारी माजले आहेत, असं किशोर तिवारी म्हणाले.

विदर्भात वाढत्या शेतकरी आत्महत्येला सरकार-प्रशासन जबाबदार

मंत्र्यांनी आपल्या कामाबाबत विचार करावा, मंत्र्यांना ग्रामीण जनता निवडणूक देते. विदर्भातील हजार शेतकरी आत्महत्यांची नैतिक जबाबदारी विदर्भातील मंत्र्यांनी घ्यावी. विदर्भात वर्षभरात हजारच्या वर शेतकरी आत्महत्या झाल्यात. विदर्भात शेतकरी आत्महत्या वाढण्यास प्रशासन आणि सरकार जबाबदार, असंही किशोरी तिवारी म्हणाले.

सरकारने शेतकऱ्यांकडे लक्ष देण्याची गरज

शेतकऱ्यांना पतपुरवठा धोरण चुकीचं होतंय, नापिकीमुळेही शेतकऱ्यांमध्ये निराशा आहे. सरकारने याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचं मतंही किशोर तिवारी यांनी व्यक्त केलं.

योजना आखण्यात आणि अंमलबजावणी करण्यात राज्य-केंद्र अपयशी

कोरोना काळात अधिकारी गावात जात नाही. नोकरशाहीच्या उदासीनतेचा हा परिणाम आहे. योजना आखण्यात आणि अंमलबजावणी करण्यात राज्य सरकार आणि केंद्राचंही अपयश आहे. लोकप्रतिनिधी आणि मंत्री याचा आढावा घेतात की नाही माहित नाही. पण जिल्हाधिकारी आणि प्रशासन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही, असंही किशोरी तिवारी म्हणाले.

आर्यन खानच्या जामीनासाठी किशोरी तिवारी मैदानात

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानला जामीन मिळावा, यासाठी शाहरुखकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान, याच मुद्द्यावर शिवसेना नेते किशोर तिवारी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आर्यन खान निर्दोष आहे म्हणत त्याच्या जामीनासाठी किशोर तिवारी मैदानात उतरले आहेत.

(Shivsena leader kishor Tiwari Slam Cm Uddhav thackeray over Dasara Melava Speech)

हे ही वाचा :

अजितदादांना म्हटलं परवानगी द्या, त्या सोमय्याला बघून घेतो, साताऱ्यातल्या सभेत शशिकांत शिंदे आक्रमक

भावना गवळींना चिकनगुनियाची लागण; ईडीच्या समोर हजर राहणार नाही

Non Stop LIVE Update
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.