AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Irrigation | पाणी अडवा, पाणी जिरवा! नागपूर जिल्ह्यात लक्ष्य 500 वनराई बंधाऱ्यांचे; 379 बंधार्‍यांचे काम पूर्ण

लोकसहभागातून 500 वनराई बंधारे बांधण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलंय. त्यापैकी 379 बंधारे बांधून पूर्ण झालेत. यातून पाण्याची पातळी वाढली असून बंधाऱ्या शेजारील शेतीला फायदा होत आहे.

Irrigation | पाणी अडवा, पाणी जिरवा! नागपूर जिल्ह्यात लक्ष्य 500 वनराई बंधाऱ्यांचे; 379 बंधार्‍यांचे काम पूर्ण
संग्रहित फोटो
| Edited By: | Updated on: Dec 23, 2021 | 2:11 PM
Share

नागपूर : उन्हाळ्यात पाण्याची प्रचंड कमतरता. पावसाळ्यात पाणी वाहून जाते. बेसुमार उपसा नि सिंचनाच्या अभावामुळं हे सार सुरू होतं. यावर उपाय म्हणून कृषी विभागाच्या पुढाकारातून वनराई बंधारे बांधण्याचे निश्चित करण्यात आले. लोकसहभागातून 500 वनराई बंधारे बांधण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलंय. त्यापैकी 379 बंधारे बांधून पूर्ण झालेत. यातून पाण्याची पातळी वाढली असून बंधाऱ्या शेजारील शेतीला फायदा होत आहे.

भूजल पातळीत वाढ

सिमेंटची रिकामी पोती, माती, वाळू यांचा वापर करून वनराई बंधारे बांधले जातात. या बंधाऱ्यातून रबी शेतीला पाणी मिळतो. शिवाय पाणी जमिनीत मुरल्यानं भूजल पातळीत वाढ होते. विहीर तसेच बोअरवेल यांची पाणी पातळी या माध्यमातून वाढते. जनावरांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध होत असल्याचं जिल्हा कृषी अधिकारी मिलिंद शेंडे यांनी सांगितलं.

नागपुरात सर्वाधिक 47 बंधारे

कृषी विभागानं 2021-22 साठी जिल्ह्यात 500 वनराई बंधारे बांधण्याचे लक्ष्य ठेवलंय. श्रमदानातून नागरिकांचा सहभाग मिळत आहे. आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत जिल्ह्यात 379 बंधार्‍यांचे काम पूर्ण झाले आहे. सावनेर – 37 बंधारे, हिंगण्यात – 23, कामठीत – 20, कळमेश्‍वरमध्ये – 22, उमरेडमध्ये – 55, पारशिवनी – 21, काटोल – 31, नरखेड – 23, नागपुरात – 47, भिवापूरमध्ये -25, कुहीमध्ये – 26, रामटेक -27 व मौदा तालुक्यात 22 असे वनराई बंधारे बांधण्यात आले.

संरक्षित सिंचनासाठी वापर

वन्यप्राण्यांना पाणी टंचाईचे दाहक चटके बसत असतात. अवेळी पडणार्‍या पावसाचे पाणी नाला किंवा ओढ्यातून वाहून जाते. भूजल पातळीही खालावत चालल्याने अशात रब्बी हंगामातील पिकांना उपयुक्त पाणी मिळत नाही. त्यामुळे पाणी अडवा, पाणी जिरवा, या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यात कृषी विभागाच्या पुढाकारानं श्रमदानातून वनराई बंधार्‍यांची निर्मिती होतेय. शेतकर्‍यांच्या हजारो हेक्टरवरील शेती पिकांसाठी संरक्षित सिंचनासाठीही या पाण्याचा वापर होत आहे.

Nagpur Crime | अनैतिक संबंधाचा संशय, खून करून अपघाताचा बनाव; 14 वर्षांनंतर उकलले गूढ

Video – Nagpur | रिलायन्सच्या गोदामाला आग, कोट्यवधींचे नुकसान; आगीचे कारण काय?

Gadchiroli | हत्तींची विदर्भात दस्तक! शेतकऱ्यांचे नुकसान; हत्तींनी स्वीकारला अधिवास

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.