AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpur Medical | अखेर भेट झाली! महिनाभरापासून सुरू होते उपचार; घरच्यांना पाहिल्यावर झाले स्मरण

एक अनोळखी व्यक्ती मेडिकलमध्ये भरती झाला. पण, त्याला स्वतःबद्दल माहिती आठवत नव्हती. एका संस्थेच्या माध्यमातून त्याची ओळख पटली. शेवटी महिन्याभरानं हा व्यक्ती आपल्या घरी परतला.

Nagpur Medical | अखेर भेट झाली! महिनाभरापासून सुरू होते उपचार; घरच्यांना पाहिल्यावर झाले स्मरण
मेडिकलचे संग्रहित छायाचित्र
| Edited By: | Updated on: Jan 12, 2022 | 12:49 PM
Share

नागपूर : एक महिन्यांपूर्वीची गोष्ट. पोलिसांनी एका चाळीस वर्षीय जखमी व्यक्तीला मेडिकलमध्ये (Medical) भरती केले. त्याच्यावर वॉर्ड क्रमांक अठ्ठावीसमध्ये उपचार सुरू झाला. त्याच्या डोक्याला जबर इजा झाली होती. उपचारादरम्यान संबंधित व्यक्ती मानसिक रुग्ण असल्याचे लक्षात आले. मेडिकलच्या डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केले. तो चार जानेवारीला बरा झाला. पण, आपले नाव सांगू शकत नव्हता. त्याला आपला घरचा पत्ता लक्षात येत नव्हता. हा व्यक्ती मूळचा धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील रहिवासी. त्याचे नाव वकील जगन्नाथ साबळे असे आहे. या रुग्णाची देखभाल सेवा फाऊंडेशनव्दारे सुरू होती. डॉक्टरांनीही चांगले उपचार केले. त्यानंतर डॉक्टर व फाऊंडेशनच्या सदस्यांनी त्याचा रहिवासी पत्ता जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांना यश आले नाही. फाउंडेशनच्या सदस्यांनी त्या व्यक्तीचे फोटो समाज माध्यमांच्या ग्रृपवर व्हायरल केले. पाच जानेवारीला या पोस्टला धुळे येथील विनय नावाच्या व्यक्तीने पाहिले.

फाउंडेशनच्या मदतीने साधला संपर्क

विनय या व्यक्तीच्या कुटुंबीयांना ओळखत होते. त्यामुळे त्यांनी त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना याची माहिती दिली. कुटुंबीयांना माहिती मिळताच वकील यांचे मोठे भाऊ अमृत साबळे यांनी फाउंडेशनचे सदस्य पुरुषोत्तम भोसले यांच्याशी संपर्क साधला. संपर्क झाल्यानंतर सात जानेवारीला अमृत व त्यांचा एक मित्र नागपुरात पोहचले. ते भाऊ वकीलला घेऊन साक्रीला परतलेत. वकील यांच्या कुटुंबात आई, वडील, मोठ्या भावाचे कुटुंब व त्यांच्या दोन मुली व एक मुलगा आहे. त्यांच्या मोठ्या मुलीचा पुढील महिन्यात विवाह होणार आहे. वकील साबळे हे दोन महिन्यांपूर्वी अचानक शेतात काम करतानाच कुठेतरी निघून गेला. तेव्हापासून तो घरी परतलाच नाही. याची तक्रार कुटुंबीयांनी स्थानिक पोलिसांकडेही केली.

ट्रेनमध्ये बसून बाहेर निघून गेले

काही महिन्यांपासून त्यांचा भाऊ वकील साबळे हा असामान्य व्यवहार करीत होता. त्यांचे वागणे हे गतिमंदासारखे झाली होती. परंतु त्याचा कुठेही उपचार केला नाही. ते कुठल्यातरी ट्रेनमध्ये बसून नागपूरला आहे. मेडिकलमध्ये भरती झाल्यानंतर त्यांचा पूर्ण परिचय झाला. आता वकील साबळे पूर्णपणे बरे आहेत. कुटुंबीयांशी भेटताच त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले.

cold wave | विदर्भात पाऊस, गारपीट आणि नुकसान; थंडीची लाट आजही कायम?

Bhandara Yatra | कुंभलीतील दुर्गाबाईची यात्रा रद्द; तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे काय पाठविला प्रस्ताव?

Nagpur ZP | आरोग्य कर्मचारी नाही हे तर लोकसेवक; जि. प. सीईओंनी शोधलेले रोल मॉडल काय?

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.