AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाषण सुरु होताच सभागृहात गोंधळ, उद्धव ठाकरे संतापले, म्हणाले, “माझ्या आणि कार्यकर्त्यांच्यामध्ये…”

ठाकरे गटाच्या नागपुरातील कार्यकर्ता मेळाव्यात आज एक अनपेक्षित घटना घडली. उद्धव ठाकरे यांचं भाषण सुरु झाल्यानंतर अचानक सभागृहात गोंधळ सुरु झाला. त्यानंतर उद्धव ठाकरे प्रचंड कडक शब्दांमध्ये बरसले.

भाषण सुरु होताच सभागृहात गोंधळ, उद्धव ठाकरे संतापले, म्हणाले, माझ्या आणि कार्यकर्त्यांच्यामध्ये...
| Updated on: Jul 10, 2023 | 7:42 PM
Share

नागपूर : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज नागपुरात सभा पार पडली. पण या बैठकीत एक अनपेक्षित घटना घडली. ठाकरे गटाचा नागपुरात कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी उद्धव ठाकरे यांचं भाषण सुरु झाल्यानंतर अचानक गोंधळ उडाला. त्यानंतर उद्धव ठाकरे आक्रमकपणे म्हणाले की, “माझ्या आणि माझ्या कार्यकर्त्यांच्यामध्ये येऊ नका.” यावेळी खासदार विनायक राऊत यांनी उद्धव ठाकरे यांच्याजवळ येवून संबंधित व्यक्ती कोण आहे, याबाबत माहिती दिली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आपलं भाषण पुन्हा सुरु केलं. यावेळी उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर सडकून टीका केली.

नेमकं काय घडलं?

“अरे कोण म्हणतं विदर्भात शिवसेनेची ताकद नाही? मी आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो की, अजूनही पाऊस रुसलेला आहे. माझ्या शेतकऱ्यांनी पेरणी केलेली आहे. पाहिजे तसा पाऊस येऊ दे, नाहीतर त्याची मेहनत वाया जाईल. पुन्हा तेच दृष्टचक्र सुरु झालं. म्हणून मी आई जगदंबेला प्रार्थना करतो की, लवकरात लवकर पाऊस पडू दे आणि बळीराजाच्या चेहऱ्यावर हास्य येऊ दे माझ्या तुमच्या भेटीचा एकच अर्थ आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले. त्यानंतर सभागृहात अचानक गोंधळ उडू लागला.

…आणि उद्धव ठाकरे भडकले

यावेळी उद्धव ठाकरे चांगलेच भडकले. “जरा थांबा. वाद घालायचा असेल तर बाहेर जा. कोण आहेत ते? त्यांना बाहेर घेऊन जा. बसून घ्या. बाहेर जा दादा आपण, प्लीज बाहेर जा. प्लीज बाहेर जा. मग, बसा तुम्ही खाली. माझ्या आणि माझ्या लोकांच्या मध्ये येऊ नका. प्लीज बाहरेजा. चला बसा सगळ्यांनी. ठीक आहे, चला बसा”, अशा शब्दांत उद्धव ठाकरे म्हणाले.

यावेळी खासदार विनायक राऊत उद्धव ठाकरे यांच्याजवळ आले. त्यांनी उद्धव ठाकरे यांना संबंधित व्यक्ती हा एका वृत्तपत्राचा पत्रकार आहे, असं सांगितलं. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, “असूदे, लोकांच्या आणि माझ्या मध्ये येऊ नका. माझ्या आणि माझ्या कार्यकर्त्यांच्यामध्ये येऊ नका. सगळ्यांनी बसा”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरे यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा

उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. फडणवीस यांची अवस्था सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला. कारण त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेससोबत आपण कधीच युती करणार नाही, असं वक्तव्य काही वर्षांपूर्वी केलं होतं. पण आता पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार राष्ट्रवादीसोबत भाजपने युती केली आहे. याच मुद्द्यावरुन उद्धव ठाकरे यांनी टीका केली.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.