AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpur bird | तलावातील प्लास्टिक पक्ष्यांच्या जीवावर, नागपुरातील पक्ष्यांना नेमका धोका काय?

तलावात प्लास्टिकचा कचरा पडलेला दिसून येतो. पक्षी जमिनीवर सुरक्षित ठिकाणी अंडी देतात. खाली प्लास्टिक असल्यास अंडी आणि पिल्लांनाही प्लास्टिकचा धोका संभवतो.

Nagpur bird | तलावातील प्लास्टिक पक्ष्यांच्या जीवावर, नागपुरातील पक्ष्यांना नेमका धोका काय?
प्रातिनिधीक फोटो
| Edited By: | Updated on: Jan 25, 2022 | 8:37 AM
Share

नागपूर : थंडी सुरू झाली की, परदेशी पक्षी विदर्भातील तलावांवर (lakes) येतात. पक्ष्यांच्या ( birds) प्रजननासाठी हा काळ चांगला असतो. पक्षी विदर्भातील महत्त्वाच्या तलावांवर येतात. परदेशी पाहुणे असल्यानं तलावही त्यांचे स्वागत करतात. पण, शिकारीसाठी काही तलावांवर जाळे मांडले जातात. तर काही तलावांवर मासेमारीसाठी जाळे मांडले जातात. या जाळ्यात अडकलेले पक्षी शिकार ठरतात. तसेच प्लास्टिकचा (plastics) होणारा अतिरेकी वापर या पक्ष्यांच्या जीवावर उठला आहे. पक्षी अभ्यासकांनी तलावांचे निरीक्षण केले. पक्ष्यांच्या किलबिलाटाने तलाव फुललेली त्यांनी दिसली. पण, तलाव परिसरात पसरलेला प्लास्टिकचा कचरा तसेच मांडलेले जाळे हे या परदेशी पाहुण्यांच्या जीवावर उठले आहेत.

तलावांच्या जिल्ह्यात अडकतात जाळ्यात

नागपूर जिल्ह्यात तीनशेच्या जवळपास तलावं आहेत. तर तलावांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंदियात आठशे आणि भंडाऱ्यात सातशे तलाव आहेत. या तलावांवर मोठ्या प्रमाणात मासेमारी केली जाते. तसेच काही पानथळ जागा आहेत. या पानथळ जागेवर मासे, किडे खाण्यासाठी किडे गर्दी करतात. हे पक्षी जाळ्यांमध्ये अलगत अडकतात. कारण मासे पकडल्यानंतर जाळे तसेच काठावर फेकून दिले जाते. शिवाय तुटलेले जाळेही असेच फेकले जाते. या ठिकाणी परदेशी पाहुणे अडकतात. मग, अडकेल्या पक्ष्यांना खाणारे शौकीन कापून खातात.

कसा होता पक्ष्यांवर प्लास्टिकचा परिणाम

पर्यटनासाठी तलावाशेजारी जाणारे प्लास्टिक पॉलिथीन, रॅपर्स, प्लास्टिक पिशव्या तशाच फेकून देतात. तसेच रस्त्यावर फेकलेली प्लास्टिक पावसाळ्यात तलावात वाहून जाते. त्यामुळं तलावात प्लास्टिकचा कचरा पडलेला दिसून येतो. पक्षी जमिनीवर सुरक्षित ठिकाणी अंडी देतात. खाली प्लास्टिक असल्यास अंडी आणि पिल्लांनाही प्लास्टिकचा धोका संभवतो.

तलावांची स्वच्छता होणे गरजेचे

वनविभागाच्या तलावात मासेमारी करू दिली जात नाही. तलाव स्वच्छ केले जातात. त्यामुळं वनविभागाच्या तलावात पक्षी सुरक्षित असतात. तलावांचे नियंत्रण हे पाटबंधारे विभाग आणि जिल्हा प्रशासनाकडं असते. तलाव परिसरात प्लास्टिक राहता कामा नये, याची खबरदारी मासेमारांनी घेतली पाहिजे. म्हणजे तलावांची स्वच्छता होईल. नागपूर जिल्ह्यात दरवर्षी हजाराच्या वर पक्षी मरतात. अशा अनुचित घटना होणार नाही, असं पक्षीनिरीक्षकांना वाटते.

Russell’s Viper : शेपटीच्या सहाय्यानं कसा भिंतीवर चढाई करतोय घोणस! ओळखा आणि सावध व्हा

Budget 2022 : अर्थसंकल्पात शेती आणि शेतकऱ्यांना काय मिळणार? खाद्यतेलाच्या आत्मनिर्भरतेचं धोरण राहण्याची शक्यता

भाजप आमदाराच्या मुलाचा कार अपघातात मृत्यू, विजय रहांगदळेंच्या मुलाचा वर्ध्यातील कार अपघातात दुर्दैवी अंत

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.