AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ग्रीन हायड्रोजन गाडी केव्हा लॉन्च करणार? नितीन गडकरींनी सांगितली तारीख, टुरिझमला होणार फायदा

नितीन गडकरींचा आणखी एक नवा प्रयोग करणार आहेत. 16 मार्च रोजी ते आता ग्रीन हायड्रोजन गाडी लॉन्च करणार आहेत. याची माहिती त्यांनी आज नागपुरात दिली.

ग्रीन हायड्रोजन गाडी केव्हा लॉन्च करणार? नितीन गडकरींनी सांगितली तारीख, टुरिझमला होणार फायदा
नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी. Image Credit source: tv 9
| Edited By: | Updated on: Mar 06, 2022 | 4:14 PM
Share

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) म्हणाले, पाण्यातून ग्रीन हायड्रोजन निर्माण केलं जाईल. त्यात विदर्भ हा सेंटर असेल. टुरिझम वाढविण्यासाठी आता सफारीसाठी इलेक्ट्रिक गाड्या (Electric Trains for Safari) वापरल्या जातील. त्यामुळे प्रदूषण आणि आवाज होणार नाही. त्यामुळे गाड्या वाढतील. त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था वाढेल. त्यातून रोजगारसुद्धा निर्मिती होईल. संपूर्ण विदर्भात औद्योगिक विकासाच चित्र तयार होण्यासाठी हा औद्योगिक महोत्सव घेतला जात आहे. त्याचा मोठा फायदा होईल, असंही गडकरी यांनी सांगितलं. नितीन गडकरींचा आणखी एक नवा प्रयोग करणार आहेत. 16 मार्च रोजी ते आता ग्रीन हायड्रोजन गाडी लॉन्च (Green hydrogen car launch) करणार आहेत. याची माहिती त्यांनी आज नागपुरात दिली.

रोजगार उपलब्ध झाला पाहिजे

विदर्भाचा विकास आमचा अजेंडा आहे. विदर्भासोबत महाराष्ट्र आणि महाराष्ट्रासोबत देशाचा विकास होईल. हायट्रोजनवर जगात रेल्वे चालली. काही देशात कार चालत आहे. आता देशातील हायट्रोजनवर पहिली कार दिल्लीत चालणार आहे. विजेच्या बास्केटमध्ये 33 टक्के सोलर आहे. आता प्रत्येक उद्योगाने आपलं सोलर लावायचं. पण त्याला राज्यसरकारकडून पाहिजे त्या प्रमाणात सहकार्य मिळाले नाही. आता 38 टक्के सोलरवर आलं. कोणाचा रोजगार जाता कामा नये आणि सुधारही झाला पाहिजे, असंही गडकरी यांनी यावेळी सांगितलं.

भंडारा, गोंदियात मॅग्निजचे साठे

रोजगार वाढविण्यासाठी पुढील दहा वर्षांचा विचार करावा लागेल. त्यानुसार योजना बनवाव्या लागतील. त्यामधून उद्योग येतील आणि रोजगार निर्मिती होईल. महाराष्ट्रातील 75 टक्के मिनरल्स विदर्भात आहेत. 80 टक्के जंगल विदर्भात आहे. गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात स्टील इंडस्ट्रीची मोठी शक्यता आहे. देशात 55 लाख टन मॅग्निजची गरज आहे. पण, देशात फक्त 25 लाख टन मॅग्निज तयार होतो. त्यामुळं 30 लाख टन मॅग्निज परदेशातून आयात करावा लागतो. भंडारा, गोंदिया, बालाघाटमध्ये मॅग्निज उपलब्ध आहे. अॅल्युमिनीअयमवर संशोधन करणारे संस्था नागपूरमध्ये असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

Nagpur Crime | कारने बसस्थानकावर यायच्या, बसमध्ये बसून चोरी करायच्या, पोलिसांनी आवळल्या मुसक्या

वडिलांना सोडून परतत होता युवक, गोंदियाकडे येताना टिप्परखाली आला, शरीराच्या चिंधळ्याच उडाल्या!

रेल्वे सुरक्षा बलाची मोठी कारवाई, 3 किलो सोने, 27 किलो चांदी जप्त! बिहारच्या आरोपींना चंद्रपुरात अटक

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.