AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रेल्वे सुरक्षा बलाची मोठी कारवाई, 3 किलो सोने, 27 किलो चांदी जप्त! बिहारच्या आरोपींना चंद्रपुरात अटक

तामिळनाडू पोलिसांशी संपर्क साधण्यात आला आहे. ते आल्यानंतर आरोपी आणि जप्त केलेला मुद्देमाल पुढील कारवाईसाठी ताब्यात देण्यात येईल, अशी माहिती आरपीएफ निरीक्षक नवीन प्रताप सिंह यांनी दिली आहेत.

रेल्वे सुरक्षा बलाची मोठी कारवाई, 3 किलो सोने, 27 किलो चांदी जप्त! बिहारच्या आरोपींना चंद्रपुरात अटक
रेल्वे सुरक्षा बलाने मोठी कारवाई करून सोने, चांदी जप्त करून आरोपींना अटक केली.Image Credit source: tv 9
| Edited By: | Updated on: Mar 06, 2022 | 9:42 AM
Share

नागपूर : तामिळनाडूमध्ये दरोडा (Robbery in Tamil Nadu) टाकणाऱ्या बिहारच्या आरोपींना अटक (Bihar accused arrested) करण्यात आली. रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी ही अटक केली. तीन किलो सोने, 27 किलो चांदीसह सव्वादोन कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूरजवळ ही कारवाई करण्यात आली. चार आरोपींना अटक केली असून हे चारही आरोपी बिहारचे आहेत. त्रिपुरा ते चेन्नईच्या दिशेने जाणारी गाडी क्र. 12578 बागमती एक्स्प्रेसमध्ये चार युवक सोने-चांदीचे दागिने नेत होते. दरोडा टाकून मुद्देमालासह बिहारला पळून जाण्याच्या तयारीत असताना रेल्वे सुरक्षा बलाने (Railway Security Force) गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली. बल्लारशहा स्थानकावर गाडीची तपासणी करण्यात आली. दोन प्लास्टिक पिशव्यांमध्ये सोने-चांदीची दागिने आणि इतर मौल्यवान वस्तू आढळल्या. या दागिन्यांची किंमत दोन कोटी दहा लाख आहे. विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिली असल्याची माहिती स्थानिक आरपीएफ विभागाच्या वतीने सांगण्यात आली आहेत.

तपासणीत सापडले काय

रेल्वे सुरक्षा बलाने केलेल्या तपासणीत चोरट्यांकडून बॅग व गोणी जप्त करण्यात आली. नवीन व जुने कपडे, तीन काळ्या रंगाच्या पिशव्या व निळ्या रंगाची एक छोटी पिशवी, हिरव्या रंगाची मोठी पिशवी व निळ्या रंगाच्या गोणीमध्ये सापडले. यामध्ये सोने, चांदी आढळले. दोन्ही पिशव्यांमधील माल रिकामा करून गोणी, सोने, चांदी व पैसे वेगळे केले. त्या पिशवीत सापडलेले सोने, चांदी व पैसे प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये भरून त्यांचे वजन केले. यामध्ये ३ किलो ३0६ ग्रॅम सोने सापडले. याची किंमत अंदाजे 1 कोटी 76 लाख 57 हजार रुपये आहे. 27 किलो 972 ग्रॅम चांदी सारपडली. याची अंदाजे किंमत 1 कोटी 95 लाख 8 हजार रुपये आहे. याशिवाय 14 लाख 52 हजार रुपये रोख सापडली.

चार आरोपींना अटक करणारे कोण

या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. बिहारमधील महताब आलम (वय 37) जहाँगीर खान (वय 20), अब्दुल वाहिब (वय 30), आरिफ (वय 20), अशी आरोपींची नावे आहेत. पंचनामानंतर मुद्देमाल जप्त करून आरोपींना अटक करण्यात आली आहेत. ही कारवाई आरपीएफ निरीक्षक नवीन प्रताप सिंग यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक प्रवीण महाजन, उपनिरीक्षक प्रवीण गाडवे, सहायक उपनिरीक्षक डी. गौतम, उपनिरीक्षक राम लखन, प्र. कॉन्स्टेबल रामवीर सिंग, प्र. कॉन्स्टेबल डी. एच. डबल, प्र. कॉन्स्टेबल जितेंदर पाटील, हवालदार पवनकुमार, हवालदार शिवाजी कन्नोजिया, हवालदार देशराज मीना, आर. मोहम्मद अन्सारी, आर. हरेंद्र कुमार, आर. रूपेश यांच्या वतीने करण्यात आली आहेत.

चोरीचे दागिने विकण्यासाठी आला आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकला, कल्याण क्राईम ब्रांचची कारवाई

Solapur Scam : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पिंपळनेर शाखेत मोठा अपहार, बँकेतील चौघांवर कुर्डूवाडी पोलिसांत गुन्हा दाखल

Pune Crime | देवेंद्र फडणीविसांच्या सांगण्यावरून रश्मी शुक्लानी फोन टॅपिंग केल्याचा वकिलांचा आरोप

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.