AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पावसाळ्यात फ्रिजमधून येतेय दुर्गंधी? मिठाने भरलेली वाटी करेल वास दूर, जाणून घ्या महत्त्वाच्या टिप्स

मिठ फक्त स्वयंपाकासाठीच नाही तर, इतर गोष्टींसाठी कामाची गोष्ट आहे. पावळ्यात अनेक वस्तूंना वास येतो. फ्रिजमधून देखील दुर्गंधी येत असते. अशात मिठाची वाटी फ्रिजमध्ये ठेवल्यास वास येणार नाही. तर जाणून फ्रिजमधील वास घालवण्यासाठी मिठ कसं काम करतं...

पावसाळ्यात फ्रिजमधून येतेय दुर्गंधी? मिठाने भरलेली वाटी करेल वास दूर, जाणून घ्या महत्त्वाच्या टिप्स
| Updated on: Jul 02, 2026 | 4:18 PM
Share

पावसाळ्याची प्रतिक्षा सर्वांना असते. पण पावसाळा आल्यानंतर अनेक समस्या देखील उद्भवतात. सर्वात मोठी समस्या म्हणजे फ्रिजमधून येणारा वास. सांगायचं झालं तर, पावसाळ्यात हवामान खूप थंड असतं. हवेत आर्द्रताही खूप असते आणि याच आर्द्रतेमुळे इलेक्ट्रॉनिक उपकरणांमधील, विशेषतः फ्रिजमधील आर्द्रतेची पातळी वाढते , ज्यामुळे फ्रिजमध्ये ठेवलेल्या भाज्या, फळे आणि इतर पदार्थ लवकर खराब होतात. याशिवाय, जिवाणूंच्या वाढीची शक्यताही वाढते, ज्यामुळे फ्रिजमधून दुर्गंधी येऊ लागते. यामुळे संपूर्ण स्वयंपाकघराचं वातावरण बिघडतं. अशा परिस्थितीत, या सर्व समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही फ्रिजमध्ये मिठाची वाटी ठेवू शकता. या किचन हॅकबद्दल थोडक्यात जाणून घ्या…

फ्रिजमध्ये मिठाची वाटी ठेवल्याने आर्द्रता शोषण्यास मदत होते. जेव्हा तुम्ही फ्रिजमध्ये एका लहान वाटीत 100 ते 150 ग्रॅम मीठ ठेवता, तेव्हा ते हवेतील अतिरिक्त आर्द्रता हळूहळू शोषून घेतं. मिठामध्ये नैसर्गिकरित्या आर्द्रता शोषण्याचे गुणधर्म असतात, ज्यामुळे फ्रिजमधील आर्द्रता कमी होते आणि फ्रिज जिवाणूमुक्त राहतो. याचे इतरही काही फायदे आहेत.

मीठ ओलावा शोषून घेते: पावसाळ्यात जेव्हा फ्रिजटर वारंवार उघडला जातो, तेव्हा आतमध्ये ओलावा साचतो. अशात ओलावा वाढल्यास भाज्या लवकर खराब होतात आणि जिवाणूंची वाढही सुरू होते. पण मिठामध्ये ओलावा शोषून घेण्याची शक्ती असते. त्यामुळे, फ्रिडजमध्ये मीठ ठेवल्याने ओलावा शोषून घेण्यास मदत होते.

जेव्हा भाज्या, फळे, शिजवलेले अन्न आणि दुग्धजन्य पदार्थ रेफ्रिजरेटरमध्ये जास्त काळ ठेवले जातात, तेव्हा त्यातून वायू बाहेर पडू लागतात. हा वायू संपूर्ण रेफ्रिजरेटरमध्ये पसरतो, ज्यामुळे दुर्गंधी येते. मीठामध्ये ओलावा आणि दुर्गंधी शोषून घेण्याची क्षमता असल्यामुळे, तुम्ही फ्रिजमध्ये मिठाची वाटी ठेवू शकता. या उपायामुळे फ्रिजची दुर्गंधी कमी होते आणि आर्द्रता नियंत्रणात राहिल्याने रेफ्रिजरेटरमधील अतिरिक्त दाब टाळला जातो.

फ्रिजमध्ये मीठ कसं ठेवाल?

तुमच्या फ्रिजमधील दुर्गंधी आणि ओलावा दूर करण्यासाठी, एका लहान वाटीत किंवा उघड्या भांड्यात 100 ते 150 ग्रॅम किंवा 3 ते 4 मोठे चमचे मीठ ठेवा आणि ते फ्रिजच्या एका कोपऱ्यात ठेवा. खडे मीठ असेल तर अधिक प्रभावी ठरेल.. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मीठ दर 15 ते २० दिवसांनी बदललं पाहिजे. मिठाऐवजी तुम्ही फ्रिजमध्ये बेकिंग सोडा ठेऊ शकता.

Follow Us
खाडकन उघडले धरणाचे 4 दरवाजे, तापी नदीपात्रात भयंकर विसर्ग सुरू, काळजी
खाडकन उघडले धरणाचे 4 दरवाजे, तापी नदीपात्रात भयंकर विसर्ग सुरू, काळजी घेण्याचे आवाहन!
राजकारणात मोठा ट्विस्ट! ठाकरे सेना-शिंदे सेना-भाजप एकाच मंचावर
राजकारणात मोठा ट्विस्ट! ठाकरे सेना-शिंदे सेना-भाजप एकाच मंचावर; औरंगाबादमध्ये नवं समीकरण
एकच खळबळ! माणूस मॅनहोलमध्ये कसा काय पडला? CCTV तून धक्कादायक माहिती
एकच खळबळ! माणूस मॅनहोलमध्ये कसा काय पडला? CCTV तून धक्कादायक माहिती समोर
मुंबईत धुवाधार पावसात पुन्हा भयंकर घडलं! एक व्यक्ती थेट 20 ते 25 फुट
मुंबईत धुवाधार पावसात पुन्हा भयंकर घडलं! एक व्यक्ती थेट 20 ते 25 फुट खोल मॅनहोलमध्ये...
आता ऑपरेशन तुतारी! कोल्हेंच्या वक्तव्यावर शिरसाटांचा मोठा राजकीय स्फोट
Sanjay Shirsat On Amol Kolhe | ऑपरेशन टायगरनंतर आता ऑपरेशन तुतारी! अमोल कोल्हेंच्या वक्तव्यावर शिरसाटांचा मोठा राजकीय स्फोट, म्हणाले...
तीन ठिकाणी पंचनामे, मोबाईल, कपडे अन् सगळंच... पोलिसांचं पथक
तीन ठिकाणी पंचनामे, मोबाईल, कपडे अन् सगळंच... पोलिसांचं पथक सियाच्या घरी पोहोचलं, पुढे काय घडलं?
आधी मला तर स्कोअर करू दे, बाकीची टीम... बच्चू कडूंच्या दाव्यावर सचिन
आधी मला तर स्कोअर करू दे, बाकीची टीम... बच्चू कडूंच्या दाव्यावर सचिन अहिर असं काय म्हणाले?
सचिन आला तर त्याची टीमही येणारच...त्या बड्या नेत्याने केला मोठा खुलासा
सचिन आला तर त्याची टीमही येणारच...त्या बड्या नेत्याने केला मोठा खुलासा; ऑपरेशन टायगर पुन्हा अॅक्टिव्ह!
धक्कादायक! नवजात मुलांच्या विक्रीचं रॅकेट, बड्या पक्षातील 2 नेत्यांना
धक्कादायक! नवजात मुलांच्या विक्रीचं रॅकेट, बड्या पक्षातील 2 नेत्यांना अटक
शरद पवार सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण...
शरद पवार सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण... अमोल कोल्हेंचं मोठं विधान; चर्चांना मिळाला पूर्णविराम!