AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तो मुंबईच्या मॅनहोलमध्ये पडला, 100 मीटर लांब आढळला, जीव वाचवण्यासाठी झगडणाऱ्या असलम शेख यांचा मृत्यू कसा झाला?

साकिनका परिसरात एका मॅनहोलमध्ये 55 वर्षीय असलम शेख नावाची व्यक्ती अचानक पडली. ही घटना घडताच तिथे असलेल्या लोकांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. तत्काळ मुंबई महापालिकेच्या लोकांनाही पाचारण करण्यात आले

तो मुंबईच्या मॅनहोलमध्ये पडला, 100 मीटर लांब आढळला, जीव वाचवण्यासाठी झगडणाऱ्या असलम शेख यांचा मृत्यू कसा झाला?
mumbai manhole deathImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 02, 2026 | 4:21 PM
Share

Mumbai Rain Manhole Death : मुंबईमध्ये सध्या तुफान पाऊस चालू आहे. पुढच्या काही दिवस पावसाचा हा जोर असाच कायम राहण्याची शक्यता आहे. या पावसामुळे मुंबई तसेच उपनगरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचले आहे. काही ठिकाणी तर पाणी तुंबले आहे. दरम्यान, मुंबईच्या या पावसाने पहिला बळी घेतला आहे. साकिनाका परिसरात मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना घडल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. मुंबई महापालिकेच्या हलगर्जीपणावर बोट ठेवलं जातंय. मॅनहोलमध्ये पडलेल्या व्यक्तीला वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु यात यश आले नाही. बचाव मोहिमेदरम्यान नेमकं काय घडलं, याची माहिती समोर आली आहे.

दोन तास चालले बचावकार्य

मिळालेल्या माहितीनुसार आज (2 जुलै) साकिनका परिसरात एका मॅनहोलमध्ये 55 वर्षीय असलम शेख नावाची व्यक्ती अचानक पडली. ही घटना घडताच तिथे असलेल्या लोकांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. तत्काळ मुंबई महापालिकेच्या लोकांनाही पाचारण करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या बीएमसी, अग्निशमन दल आणि पोलिसांनी सुमारे दोन तास बचावकार्य केले. परंतु संबंधित व्यक्ती 20 ते 25 फूट खोल असलेल्या मॅनहोलमध्ये पडली होती. मॅनहोलमध्ये पावसाचे पाणी प्रचंड वेगाने वाहात होते. तर दुसरीकडे संबंधित व्यक्तीला वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली जात होती. मात्र या प्रयत्नांना यश आले नाही. मॅनहोलमध्ये पडलेल्या असलम शेख यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

100 मीटर अंतरावरील मॅनहोलमधून काढले बाहेर

मॅनहोलमध्ये पडलेल्या असलम शेख यांना दोन तासांच्या प्रयत्नानंतर बाहेर काढण्यात आले. याबाबत फायर ऑफिसर ए. व्ही. सोनवणे यांनी सविस्तर माहिती दिली. पाण्याचा प्रवाह जोरात होता. संबंधित व्यक्ती ज्या ठिकाणी पडली होती, तिथून साधारण 100 मीटर अंतरावर असलेल्या दुसऱ्या मॅनहोलमधून त्या व्यक्तीला बाहेर काढण्यात आले. असलम शेक यांना बाहेर काढले तेव्हा ते बेशुद्ध अवस्थेत होते.

बीएमसी आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी

दरम्यान या घटनेनंतर आता राजकारण तापले आहे. उपमहापौर संजय घाडी यांनी या घटनेला बीएमसी आयुक्तांना जबाबदार धरत राजीनाम्याची मागणी केली, तर माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. त्यामुळे नेमके काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
मुंबईकरांनो सावधान! 4 हजारहुन अधिक... मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोस
मुंबईकरांनो सावधान! 4 हजारहुन अधिक... मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस रुग्णसंख्येत चिंताजनक वाढ
अध्यक्षांच्या गोंधळलेल्या भूमिकेमुळे... सुनावणीनंतर ठाकरे गटातील...
अध्यक्षांच्या गोंधळलेल्या भूमिकेमुळे... सुनावणीनंतर ठाकरे गटातील बड्या नेत्याची सुचक प्रतिक्रिया
शिवसेना कुणाची? आजची सुनावणी संपली, उद्या पुन्हा कपिल सिब्बल...
शिवसेना कुणाची? आजची सुनावणी संपली, उद्या पुन्हा कपिल सिब्बल... नेमकं काय घडणार?
ज्या घटनेनुसार आमदार, मंत्री झाले, त्याच घटनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित
ज्या घटनेनुसार आमदार, मंत्री झाले, त्याच घटनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करता - कपिल सिब्बल
ठाकरेंची शिंदेंना सर्व पदं...कपिल सिब्बल यांचा कोर्टात 'सुप्रीम'...
ठाकरेंची शिंदेंना सर्व पदं...कपिल सिब्बल यांचा कोर्टात 'सुप्रीम' युक्तिवाद; सुनावणीत काय दाखला दिला?
ठाकरेंची शिवसेना हाच राजकीय पक्ष, सिब्बल यांचा कोर्टात सर्वात मोठा...
ठाकरेंची शिवसेना हाच राजकीय पक्ष, सिब्बल यांचा कोर्टात सर्वात मोठा युक्तिवाद!
शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत मोठा ट्वीस्ट, निवडणुक आयोगाने...
शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत मोठा ट्वीस्ट, आमदारांच्या अपात्रतेची वाट पाहयला... कोर्टात नेमका युक्तीवाद काय?
मी आमदारांच्या अपात्रतेबाबत... शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत...
मी आमदारांच्या अपात्रतेबाबत... शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीच्या सुरुवातीलाच कपिल सिब्बल यांनी मांडला महत्त्वाचा मुद्दा
फडणवीसांना दिल्लीत... CM देवेंद्र फडणवीसांच्या केंद्रात जाण्याबाबत...
फडणवीसांना दिल्लीत... CM देवेंद्र फडणवीसांच्या केंद्रात जाण्याबाबत अमृता फडणवीसांच सर्वात मोठं विधान
हिंजवडीच्या वाहतूक समस्येवर आदित्य ठाकरेंचे लक्ष
आदित्य ठाकरे यांनी केली हिंजवडीतील वाहतूक कोंडी आणि मेट्रो कामाची पाहणी