AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जातीपातीचं राजकारण करणाऱ्यांना… नाना पाटेकरांच्या पुढाऱ्यांना कानपिचक्या, नेमकं काय म्हणाले?

Nana Patekar : छत्रपती संभाजीनगरमधील एका कार्यमक्रमात बोलताना नाना पाटेकर यांनी राजकारणी लोकांचे कान टोचले आहेत. खासकरून जातीपातीच राजकारण्यांवर त्यांनी भाष्य केले आहे.

जातीपातीचं राजकारण करणाऱ्यांना... नाना पाटेकरांच्या पुढाऱ्यांना कानपिचक्या, नेमकं काय म्हणाले?
Nana Patekar
| Updated on: Nov 25, 2025 | 9:47 PM
Share

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर हे आपल्या बेधडक आणि स्पष्ट वक्तव्यासाठी ओळखले जातात. आज छत्रपती संभाजीनगरमधील एका कार्यमक्रमात बोलताना नाना पाटेकर यांनी राजकारणी लोकांचे कान टोचले आहेत. खासकरून जातीपातीच राजकारण्यांना जागा दाखवण्याचे आवाहन नाना पाटेकर यांनी मतदारांना केले आहे. तसेच देशातील सैनिकांना हवा तेवढा मान-सन्मान मिळत नाही याची खंत वाटते असंही त्यांनी म्हटले आहे. नाना पाटेकर यांनी आपल्या भाषणात नेमकं काय म्हटले याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

आत्ताची सामाजिक राजकीय परिस्थिती पाहून दम गुदमरतो

छत्रपती संभाजीनगरमधील एमजीएम विद्यापीठात आयोजित असोशिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीजच्या 39 व्या आंतर विद्यापीठीय सेंट्रल झोन युवा महोत्सव कार्यक्रमात बोलताना नाना पाटेकर म्हणाले की, आत्ताची सामाजिक राजकीय परिस्थिती पाहून दम गुदमरल्या सारखे होत आहे, आपल्या अभिनयातून त्यावर आपण व्यक्त होऊ शकतो. प्रहार सिनेमावेळी मी 3 वर्ष मी सीमेवर राहिलो, तरुण मुलं सीमेवर निधड्या छातीने उभी असतात, हातात 147 असते.

सैनिकांचा सन्मान होत नाही याची खंत वाटते

पुढे बोलताना नाना पाटेकर यांनी, आपल्या देशात सैनिकांचा सन्मान होत नाही याची खंत वाटत आहे. आमच्यासाठी ते मरत आहेत, त्यांना जो सन्मान हवा तो आमच्याकडून मिळत नाही. परदेशात सैनिक आल्यावर प्रेसिडेंट उभं राहून सॅल्युट करतो, पण आपल्याकडे असे होत नाही असं म्हणत खंत व्यक्त केली.

जे जातीपतीचे राजकारण करतात त्यांना…

राजकारण्यांवर बोलताना नाना पाटेकर यांनी, ‘काही राजकरणी आहेत जे जातीपतीचे राजकारण करतात, तू हा आहे, तू तो आहे असे म्हणून भेद करतात. मी कधी जातपात मानली नाही, पण आपल्याकडे जातीचे राजकारण होत आहे. कोण करतोय आणि कसे करत आहे हे सर्वांना माहीत आहे. यांना उत्तर मतदानातून द्यायचे. बदलाव तरुण आणू शकतात आणि तुम्ही सतर्क राहिलं पाहिजे. फक्त गर्दीचा भाग होऊ नका’ असं विधान केलं आहे.

Follow Us
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.
भाजप मोर्चामुळे वाहतूक कोंडी; संतप्त महिलेचा मंत्री महाजनांना थेट जाब
भाजप मोर्चामुळे वाहतूक कोंडी; संतप्त महिलेचा मंत्री महाजनांना थेट जाब.
मोठी बातमी! नाशिकनंतर पुण्यातही कॉर्पोरेट जिहाद? ऑफिसच्या रेस्टरूमध्ये
मोठी बातमी! नाशिकनंतर पुण्यातही कॉर्पोरेट जिहाद? ऑफिसच्या रेस्टरूमध्ये.