AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जातीपातीचं राजकारण करणाऱ्यांना… नाना पाटेकरांच्या पुढाऱ्यांना कानपिचक्या, नेमकं काय म्हणाले?

Nana Patekar : छत्रपती संभाजीनगरमधील एका कार्यमक्रमात बोलताना नाना पाटेकर यांनी राजकारणी लोकांचे कान टोचले आहेत. खासकरून जातीपातीच राजकारण्यांवर त्यांनी भाष्य केले आहे.

जातीपातीचं राजकारण करणाऱ्यांना... नाना पाटेकरांच्या पुढाऱ्यांना कानपिचक्या, नेमकं काय म्हणाले?
Nana Patekar
| Updated on: Nov 25, 2025 | 9:47 PM
Share

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर हे आपल्या बेधडक आणि स्पष्ट वक्तव्यासाठी ओळखले जातात. आज छत्रपती संभाजीनगरमधील एका कार्यमक्रमात बोलताना नाना पाटेकर यांनी राजकारणी लोकांचे कान टोचले आहेत. खासकरून जातीपातीच राजकारण्यांना जागा दाखवण्याचे आवाहन नाना पाटेकर यांनी मतदारांना केले आहे. तसेच देशातील सैनिकांना हवा तेवढा मान-सन्मान मिळत नाही याची खंत वाटते असंही त्यांनी म्हटले आहे. नाना पाटेकर यांनी आपल्या भाषणात नेमकं काय म्हटले याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

आत्ताची सामाजिक राजकीय परिस्थिती पाहून दम गुदमरतो

छत्रपती संभाजीनगरमधील एमजीएम विद्यापीठात आयोजित असोशिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीजच्या 39 व्या आंतर विद्यापीठीय सेंट्रल झोन युवा महोत्सव कार्यक्रमात बोलताना नाना पाटेकर म्हणाले की, आत्ताची सामाजिक राजकीय परिस्थिती पाहून दम गुदमरल्या सारखे होत आहे, आपल्या अभिनयातून त्यावर आपण व्यक्त होऊ शकतो. प्रहार सिनेमावेळी मी 3 वर्ष मी सीमेवर राहिलो, तरुण मुलं सीमेवर निधड्या छातीने उभी असतात, हातात 147 असते.

सैनिकांचा सन्मान होत नाही याची खंत वाटते

पुढे बोलताना नाना पाटेकर यांनी, आपल्या देशात सैनिकांचा सन्मान होत नाही याची खंत वाटत आहे. आमच्यासाठी ते मरत आहेत, त्यांना जो सन्मान हवा तो आमच्याकडून मिळत नाही. परदेशात सैनिक आल्यावर प्रेसिडेंट उभं राहून सॅल्युट करतो, पण आपल्याकडे असे होत नाही असं म्हणत खंत व्यक्त केली.

जे जातीपतीचे राजकारण करतात त्यांना…

राजकारण्यांवर बोलताना नाना पाटेकर यांनी, ‘काही राजकरणी आहेत जे जातीपतीचे राजकारण करतात, तू हा आहे, तू तो आहे असे म्हणून भेद करतात. मी कधी जातपात मानली नाही, पण आपल्याकडे जातीचे राजकारण होत आहे. कोण करतोय आणि कसे करत आहे हे सर्वांना माहीत आहे. यांना उत्तर मतदानातून द्यायचे. बदलाव तरुण आणू शकतात आणि तुम्ही सतर्क राहिलं पाहिजे. फक्त गर्दीचा भाग होऊ नका’ असं विधान केलं आहे.

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक