AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केंद्र सरकारने कृषी कायदे रद्द करावेत, अन्यथा आंदोलनात सहभागी होणार: नाना पटोले

१७ डिसेंबर पर्यंत केंद्र सरकारने हे कायदे रद्द केले नाही तर आम्ही सुद्धा या आंदोलनात सहभागी होऊ, असा इशारा नाना पटोलेंनी दिला आहे. (Nana Patole Modi Govt)

केंद्र सरकारने कृषी कायदे रद्द करावेत, अन्यथा आंदोलनात सहभागी होणार: नाना पटोले
Yuvraj Jadhav
Yuvraj Jadhav | Updated on: Dec 10, 2020 | 6:51 PM
Share

गोंदिया: देशात शेतकऱ्यांचं कृषी कायद्याविरोधात आंदोलन सुरु आहे. केंद्र सरकारनं केलेले तीन कायदे रद्द करावेत, यासाठी मागील १५ दिवसापासून देशातील शेतकरी दिल्लीत धडकले आहेत. त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी मोदींना पात्र पाठवून हा कायदा रद्द करावा, अशी मागणी केली केली आहे. (Nana Patole demanded to Modi Govt cancelled agriculture)

नाना पटोले यांनी संविधानिक खुर्चीवर जरी बसलो असलो तरी तरी मी शेतकरी आहे, असा उल्लेख केला आहे. तर, २०१७ मध्ये शेतकऱ्यांच्या विषयाला घेऊन नाना पटोले यांनी खासदारकीचा राजीनामा दिला होता. मात्र, आता पुन्हा १७ डिसेंबर पर्यंत केंद्र सरकारने हे कायदे रद्द केले नाही तर आम्ही सुद्धा या आंदोलनात सहभागी होऊ, असा इशारा नाना पटोलेंनी दिला आहे.

पटोलेंचे नरेंद्र मोदींना पत्र

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी गोंदिया येथे बोलताना,”मी पहिल्यांदा शेतकरी आहे. केंद्र सरकारनं शेतकऱ्यांवर अन्याय करणारे काळे कायदे आणले आहेत. जिथं शेतकऱ्यांवर अन्याय होत असेल त्याविरोधी आंदोलनात सहभागी होऊन त्यांना पाठिंबा देणे माझे कर्तव्य आहे, असेही ते म्हणाले. (Nana Patole demanded to Modi Govt cancelled agriculture)

दिल्लीत केंद्र सरकारच्या विरोधात कोट्यावधी शेतकरी आंदोलन करत आहेत.नरेंद्र मोदी यांनी यामध्ये लक्ष घालावे. मात्र, त्यांनी अजूनही या प्रकरणी लक्ष घातले नाही. टिकरी बॉर्डरवर शेतकरी मृत्यू पावला. संविधानिक पदावर असलो तरी मी पहिल्यांदा शेतकरी आहे. काळे कायदे रद्द केले नाही तर आंदोलनात सहभागी होऊ, असा इशारा विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे.

केंद्र सरकारचे चर्चेचे आवाहन

दरम्यान, कृषी कायद्याच्या मुद्द्यावरून गेल्या 15 दिवसांपासून शेतकरी आणि केंद्र सरकारमध्ये जोरबैठका सुरू असून त्यातून काहीही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे केंद्र सरकारने पुन्हा एकदा आंदोलक शेतकऱ्यांना चर्चेची नवी तारीख देण्यास सांगितलं आहे. आम्हाला ईगो नाही. आम्ही चर्चेला तयार आहोत, असं केंद्र सरकारकडून सांगण्यात आलं आहे.

केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी पत्रकार परिषद घेऊन हे आवाहन केलं आहे. शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जोखडातून मुक्त करण्याची आमची इच्छा आहे. शेतकऱ्यांच्या मालाच्या खरेदी-विक्रीवर टॅक्स लागू नये त्यासाठी आमचा प्रयत्न आहे, असं तोमर यांनी सांगितलं. तसेच शेतकरी संघटनांनी चर्चेची तारीख सांगावी, आम्ही त्यांचे संपूर्ण समाधान होईपर्यंत चर्चा करण्यास तयार आहोत, असंही ते म्हणाले.(Nana Patole demanded to Modi Govt cancelled agriculture)

संबंधित बातम्या:

BHARAT BAND | शेतकऱ्यांच्या ‘भारत बंद’चा देशभरात परिणाम, कुठे परिक्षा रद्द, रेल्वे अडवल्या, तर कुठे नवदाम्पत्य फसलं!

‘आजच्या आंदोलनात फूट पाडण्याचेही प्रयत्न करायचे असेच सत्ताधाऱ्यांचे मनसुबे’

(Nana Patole demanded to Modi Govt cancelled agriculture)

Follow Us
आधी मला तर स्कोअर करू दे, बाकीची टीम... बच्चू कडूंच्या दाव्यावर सचिन
आधी मला तर स्कोअर करू दे, बाकीची टीम... बच्चू कडूंच्या दाव्यावर सचिन अहिर असं काय म्हणाले?
सचिन आला तर त्याची टीमही येणारच...त्या बड्या नेत्याने केला मोठा खुलासा
सचिन आला तर त्याची टीमही येणारच...त्या बड्या नेत्याने केला मोठा खुलासा; ऑपरेशन टायगर पुन्हा अॅक्टिव्ह!
धक्कादायक! नवजात मुलांच्या विक्रीचं रॅकेट, बड्या पक्षातील 2 नेत्यांना
धक्कादायक! नवजात मुलांच्या विक्रीचं रॅकेट, बड्या पक्षातील 2 नेत्यांना अटक
शरद पवार सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण...
शरद पवार सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण... अमोल कोल्हेंचं मोठं विधान; चर्चांना मिळाला पूर्णविराम!
मुंबईकरांनो सावधान! पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन अलर्ट
Rain Alert | मुंबईकरांनो सावधान! पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन अलर्ट मोडवर
ठाकरेंच्या सेनेत मोठ्या घडमोडी! 130 ज्येष्ठ शिवसैनीकांचं मोठं पाऊल;
ठाकरेंच्या सेनेत मोठ्या घडमोडी! 130 ज्येष्ठ शिवसैनीकांचं मोठं पाऊल; पक्षातील...
'मविआ'ला आणखी मोठा धक्का! निकटवर्तीय आमदाराने पुन्हा उडवली झोप.. राज्य
'मविआ'ला आणखी मोठा धक्का! निकटवर्तीय आमदाराने पुन्हा उडवली झोप.. राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप?
ऑपरेशन कमळ होणारच!; संजय राऊतांचा भाजपला थेट इशारा, राजकारण तापलं
Sanjay Raut | ऑपरेशन कमळ होणारच!; संजय राऊतांचा भाजपला थेट इशारा, राजकारण तापलं
थलपती विजय यांचं सरकार पाडण्याचा कट? 15 आमदारांना कोट्यवधींचं आमिष!
Vijay Thalapathy | थलपती विजय यांचं सरकार पाडण्याचा कट? 15 आमदारांना कोट्यवधींचं आमिष!
मुंबई हळहळली! महिला ट्रेनखाली चिरडली गेली अगदी... धो धो पावसादरम्यान
मुंबई हळहळली! महिला ट्रेनखाली चिरडली गेली अगदी... धो धो पावसादरम्यान धक्कादायक घटना