AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nanar Refinery Project : राज्याने लोकांच्या रोजगाराचा विचार करावा, श्रीपाद नाईक यांची रिफायनरीबाबत भूमिका

काही लोकांनी या रिफायनरीली विरोध केला आहे. तर काहींनी हा प्रकल्प व्हावा अशी भूमिका घेतली आहे. त्यासाठी कोकणातील काही मंडळींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांनाही निवेदन दिले आहे. आता केद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनीही याबात आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Nanar Refinery Project : राज्याने लोकांच्या रोजगाराचा विचार करावा, श्रीपाद नाईक यांची रिफायनरीबाबत भूमिका
लोकांच्या रोजगाराचा विचार करावा-श्रीपाद नाईकImage Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Apr 17, 2022 | 4:48 PM
Share

रत्नागिरी : गेल्या अनेक वर्षांपासून कोकणात रिफायनरीची (Nanar Refinery Project) मुद्दा गाजत आहे. त्यावरून अनेकदा भाजप आणि शिवसेना आमनेसामनेही आले आहेत. आधी शिवसेनेने (Shivsena) या प्रकल्पाला विरोध केला. त्यानंतर या प्रकल्पासाठी प्रस्तावित जागेत बदल करण्यात आला. शिवसेने दुसऱ्या जागेच्या पर्यायाचा विचार करण्याची केंद्रला विनंती केली. तर कोकणातूनही या रिफायनरीबाबत संमिश्र प्रतिक्रिया मिळताना दिसत आहेत. काही लोकांनी या रिफायनरीली विरोध केला आहे. तर काहींनी हा प्रकल्प व्हावा अशी भूमिका घेतली आहे. त्यासाठी कोकणातील काही मंडळींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांनाही निवेदन दिले आहे. आता केद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनीही याबात आपली प्रतिक्रिया दिली आहे. रिफायनरीबाबत सरकारने व लोकांनी समन्वय साधला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

श्रीपाद नाईक काय म्हणाले?

तसेच रोजगारच्या दृष्टीने लोकांनी सुध्दा सखोल विचार करावा. कोणाच्या राजकीय भूमिका असतात. कोणाची वेगळी भूमिका असते आणि शासनाने लोकांना रोजगार कसा मिळेल, यासाठी सरकारने विचार करावा. तसेच सर्वच प्रकल्प येतात ते प्रदूषणकारी असतात असे नाही. केंद्र सरकार बेरोजगारी हटविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे, अशी प्रतिक्रिया केंद्रीय पर्यटन मंत्री श्रीपाद नाईक यांनी रिफायनरी प्रकल्पाबाबत व्यक्त केले, आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे.

स्थानिकांच्या विरोधामुळे प्रकल्प रखडला

वेगवेगळ्या राजकीय भूमिका आणि सुरूवातील स्थानिक लोकांनी केलेल्या विरोधामुळे हा प्रकल्प अनेक दिवसांपासून रखडला आहे. यावरून भाजप आणि शिवसेनेत अनेकदा आरोप प्रत्यारोप झाले आहेत. शिवसेना या प्रकल्पाच्या विरोधात भूमिका घेऊन कोकणातील लोकांचा रोजगार हिरावून घेत आहे. तसेच कोकणाच्या विकासात अडथळ निर्माण करत आहे, असा सतत आरोप भाजप नेत्यांकडून करण्यात येत आहे. तसेच शिवसेना नेतेही भाजपला जोरदार प्रत्युत्तर देत आहे. रिफायनरी प्रकल्पावरुन रत्नागिरीत घमासान झाल्याचेही अनेकदा दिसून आले आहे, बारसु सोलगाव परिसरातील ग्रामस्थ आक्रमक होत मोर्चेही निघाल्याच्या घटना घडल्या आहेत.

Raj Thackeray : ‘बाळासाहेबांचं रेकॉर्ड कुणीही मोडू शकत नाही’, चंद्रकांत खैरेंचा राज ठाकरेंना टोला; तर औरंगाबादेत राज यांच्या सभेची जोरदार तयारी

भाजप-मनसे मिळून शिवसेनेला घेरणार; महाराष्ट्र दिनी फडणवीसांची मुंबईत सभा तर औरंगाबादेत राज ठाकरेंची तोफ धडाडणार

Ayodhya Hindutva Politics : राज ठाकरेंच्या हिंदुत्वाचा धसका? आदित्य ठाकरे मे महिन्यात अयोध्येला जाण्याच्या तयारीत

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.