AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पिसाळलेला कुत्रा म्हशीला चावला, कोण मेलं असेल? अन् नांदेडमध्ये रेबीजचं इंजेक्शन घेण्यासाठी लोकांनी का केलीय गर्दी?

नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात असलेल्या बिल्लाळी गावात एका पिसाळलेल्या कुत्र्याच्या चाव्यामुळे एका दुभत्या म्हशीचा मृत्यू झाला. या म्हशीचे दूध सुमारे 171 नागरिकांनी सेवन केल्याने गावात भीतीचे वातावरण आहे.

पिसाळलेला कुत्रा म्हशीला चावला, कोण मेलं असेल? अन् नांदेडमध्ये रेबीजचं इंजेक्शन घेण्यासाठी लोकांनी का केलीय गर्दी?
Nanded News
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Aug 08, 2025 | 8:00 PM
Share

नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात असलेल्या बिल्लाळी गावात एका पिसाळलेल्या कुत्र्याच्या चाव्यामुळे एका दुभत्या म्हशीचा मृत्यू झाला. कुत्रा चावल्यानंतर म्हैस एक महिनाभर जिवंत होती. या म्हशीचे दूध सुमारे 171 नागरिकांनी सेवन केल्याने गावात भीतीचे वातावरण आहे. खबरदारी म्हणून आरोग्य विभागाने तात्काळ या सर्व नागरिकांना अँटी-रेबीजची प्रतिबंधात्मक लस देण्यास सुरुवात केली आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता लसीकरण करून घेण्याचे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आकाश देशमुख यांनी केले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

समोर आलेल्या माहितीनुसार, मुखेड तालुक्यातील बिल्लाळी गावात किशन दशरथ इंगळे यांच्याकडे असणाऱ्या एका म्हशीला पिसाळलेला कुत्रा चावला होता. सुरुवातीचे काही दिवस ही म्हैस सामान्य होती, मात्र काही दिवसांनंतर ती आजारी पडली, मात्र तिला वेळेत उपचार न मिळाल्याने तिचा 5 ऑगस्टला मृत्यू झाला. या म्हशीचे दूध विकले जात होते, त्यामुळे जवळपास 5 गावातील 171 लोकांनी या म्हशीच्या दुधाचे सेवन केल्याचे समोर आले आहे.

म्हशीचा रेबीजमुळे मृत्यू झाल्याने हे सर्व लोक घाबरले आहेत. यातील अनेकांनी तातडीने आरोग्य केंद्रात धाव घेतली आणि रेबीज प्रतिबंधक लस टोचून घेतली. सध्या या गावात आरोग्य विभागाचे पथक दाखल झालेले आहे. अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत अशी माहिती समोर आली आहे.

रेबीज आजाराची माहिती

रेबीज हा एक अतिशय घातक आजार आहे. संक्रमित प्राण्याच्या चाव्यामुळे हा आजार होतो. कुत्रे, मांजरे, कोल्हे, वटवाघळ यांच्याकडून रेबीजचा प्रसार मानवात होतो. या आजाराची लागण झाल्यानंतर रेबीज विषाणू मेंदूपर्यंत पोहोचतो आणि मेंदूला दाह होऊन रुग्णाला झटके येणे, Hydrophobia, आक्रमकता वाढणे अशा लक्षणांचा सामना करावा लागतो. अशी लक्षणे दिसू लागल्यावर रुग्णाचा मृत्यू होतो.

त्यामुळे तुम्हाला प्राणी चावल्यास, एकदे लक्षणे दिसल्यास त्वरित उपचार घेणे गरजेचे आहे. प्राणी चावल्यानंतर लगेच जखम साबणाने धुवा, रेबीज लस घ्या. तसेच पाळीव कुत्र्यांचे लसीकरण करा मात्र वेळेवर वैद्यकीय मदत घेणे हे या आजारापासून बचाव करण्याचे मार्ग आहेत. या सर्व गोष्टींची योग्य काळजी घेतल्यास रेबीज टाळता येतो, मात्र याकडे दुर्लक्ष झाल्यास तो प्राणघातक ठरू शकतो.

Follow Us
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा, आत्मलिंग...
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा आणि आत्मलिंग कथा
खासगी रुग्णालयांतील सलाईन नळीच्या विक्रीत... FDA आयुक्तांची धडक कारवाई
खासगी रुग्णालयांतील सलाईन नळीच्या विक्रीत... FDA आयुक्तांची धडक कारवाई पुन्हा राज्यभर चर्चेत
आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला
Ganeshotsav | आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला महत्त्वाचा संदेश
कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा!
Radhakrishna Vikhepatil | कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा! राधाकृष्ण विखे पाटलांचं मनोज जरांगेंना आवाहन
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला
Nitin Nabin | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला, राजकीय कारण काय?
जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती
ChandrakantPatil | जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती; पुढे म्हणाले...
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी फडणवीस-नबीन; सिद्धिविनायक मंदिरात...
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी CM फडणवीस- नितीन नबीन; सिद्धिविनायक मंदिरात घेतले बप्पांचे दर्शन!
जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल
Vijay Wadettiwar | जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल, म्हणाले...
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?