AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पिसाळलेला कुत्रा म्हशीला चावला, कोण मेलं असेल? अन् नांदेडमध्ये रेबीजचं इंजेक्शन घेण्यासाठी लोकांनी का केलीय गर्दी?

नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात असलेल्या बिल्लाळी गावात एका पिसाळलेल्या कुत्र्याच्या चाव्यामुळे एका दुभत्या म्हशीचा मृत्यू झाला. या म्हशीचे दूध सुमारे 171 नागरिकांनी सेवन केल्याने गावात भीतीचे वातावरण आहे.

पिसाळलेला कुत्रा म्हशीला चावला, कोण मेलं असेल? अन् नांदेडमध्ये रेबीजचं इंजेक्शन घेण्यासाठी लोकांनी का केलीय गर्दी?
Nanded News
| Updated on: Aug 08, 2025 | 8:00 PM
Share

नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात असलेल्या बिल्लाळी गावात एका पिसाळलेल्या कुत्र्याच्या चाव्यामुळे एका दुभत्या म्हशीचा मृत्यू झाला. कुत्रा चावल्यानंतर म्हैस एक महिनाभर जिवंत होती. या म्हशीचे दूध सुमारे 171 नागरिकांनी सेवन केल्याने गावात भीतीचे वातावरण आहे. खबरदारी म्हणून आरोग्य विभागाने तात्काळ या सर्व नागरिकांना अँटी-रेबीजची प्रतिबंधात्मक लस देण्यास सुरुवात केली आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता लसीकरण करून घेण्याचे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आकाश देशमुख यांनी केले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

समोर आलेल्या माहितीनुसार, मुखेड तालुक्यातील बिल्लाळी गावात किशन दशरथ इंगळे यांच्याकडे असणाऱ्या एका म्हशीला पिसाळलेला कुत्रा चावला होता. सुरुवातीचे काही दिवस ही म्हैस सामान्य होती, मात्र काही दिवसांनंतर ती आजारी पडली, मात्र तिला वेळेत उपचार न मिळाल्याने तिचा 5 ऑगस्टला मृत्यू झाला. या म्हशीचे दूध विकले जात होते, त्यामुळे जवळपास 5 गावातील 171 लोकांनी या म्हशीच्या दुधाचे सेवन केल्याचे समोर आले आहे.

म्हशीचा रेबीजमुळे मृत्यू झाल्याने हे सर्व लोक घाबरले आहेत. यातील अनेकांनी तातडीने आरोग्य केंद्रात धाव घेतली आणि रेबीज प्रतिबंधक लस टोचून घेतली. सध्या या गावात आरोग्य विभागाचे पथक दाखल झालेले आहे. अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत अशी माहिती समोर आली आहे.

रेबीज आजाराची माहिती

रेबीज हा एक अतिशय घातक आजार आहे. संक्रमित प्राण्याच्या चाव्यामुळे हा आजार होतो. कुत्रे, मांजरे, कोल्हे, वटवाघळ यांच्याकडून रेबीजचा प्रसार मानवात होतो. या आजाराची लागण झाल्यानंतर रेबीज विषाणू मेंदूपर्यंत पोहोचतो आणि मेंदूला दाह होऊन रुग्णाला झटके येणे, Hydrophobia, आक्रमकता वाढणे अशा लक्षणांचा सामना करावा लागतो. अशी लक्षणे दिसू लागल्यावर रुग्णाचा मृत्यू होतो.

त्यामुळे तुम्हाला प्राणी चावल्यास, एकदे लक्षणे दिसल्यास त्वरित उपचार घेणे गरजेचे आहे. प्राणी चावल्यानंतर लगेच जखम साबणाने धुवा, रेबीज लस घ्या. तसेच पाळीव कुत्र्यांचे लसीकरण करा मात्र वेळेवर वैद्यकीय मदत घेणे हे या आजारापासून बचाव करण्याचे मार्ग आहेत. या सर्व गोष्टींची योग्य काळजी घेतल्यास रेबीज टाळता येतो, मात्र याकडे दुर्लक्ष झाल्यास तो प्राणघातक ठरू शकतो.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.