AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ग्रामीण भागातील रुग्णांसाठी सिव्हिलचा महत्वाचा निर्णय, ओपीडीच्या वेळेत असा आहे बदल…

नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयाने ओपिडीच्या वेळेत बदल केला असून यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांची गैरसोय टळणार आहे.

ग्रामीण भागातील रुग्णांसाठी सिव्हिलचा महत्वाचा निर्णय, ओपीडीच्या वेळेत असा आहे बदल...
Image Credit source: Google
| Updated on: Nov 02, 2022 | 4:01 PM
Share

नाशिक : नाशिकच्या जिल्हा रुग्णालय प्रशासनाने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णांची होणारी हेळसांड बघता ओपीडीच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. नाशिकच्या जिल्हा रुग्णालयाच्या बाह्य रुग्ण विभागाच्या वेळेत बदल केला गेला आहे. आजपासून बाह्यरुग्ण विभाग सकाळी 09 ते दुपारी 03 या वेळेत सुरू राहणार आहे. या वेळेत ग्रामीणभागासह शहरी भागातील नागरिकांची होणारी गैरसोय टळणार असल्याचा अंदाज बांधला गेला आहे., या आधी सकाळी 08.30 ते दुपारी 12.30 पर्यन्त आणि दुपारी 04 ते सायंकाळी 06 पर्यन्त ओपिडी सुरू असायची. त्यात आता जेवणाचा वेळ देखील कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय या वेळेत पूर्णवेळ डॉक्टर उपलब्ध राहणार असून या वेळेत तपासणी केली जाणार आहे. याशिवाय शहरातील आणि ग्रामीण भागातील नागरिकांना या निर्णयाचा मोठा दिलासा मिळणार आहे.

नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयाने ओपिडीच्या वेळेत बदल केला असून यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांची गैरसोय टळणार आहे.

ग्रामीण भागासह शहरातील रुग्णांना आता सकाळी 9 ते दुपारी 3 पर्यन्त बाह्य रुग्ण सेवा उपलब्ध राहणार असून या काळात पूर्ण वेळ डॉक्टर उपलब्ध राहणार आहे.

या पूर्वी सकाळी 8.30 ते दुपारी 12.30 आणि त्यानंतर दुपारी 4 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत बाह्य रुग्ण सेवा होती.

ग्रामीण भागातून आलेल्या रुग्णांना अनेकदा ताटकळत बसावे लागत होते, त्यांना या नव्या वेळेच्यानुसार उपचार आणि तपासणी करता करण्यास मदत होणार आहे.

पूर्वीच्या वेळेबाबत अनेकदा तक्रारी देखील आलेल्या होत्या, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी याबाबत ओपीडीच्या वेळेत बदल केला नव्हता.

ग्रामीण भागातील बहुतांशी रुग्ण सकाळी रुग्णालयात येतात. या रुग्णांना आता वेळेत तपासणी करून आपल्या घरी जाता येणार आहे.

Follow Us
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले.
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने.
WITT 2026 समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; 'जग संघर्षात, पण..
WITT 2026 समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; 'जग संघर्षात, पण...
जागतिक उलथापालथीच्या काळात मोदींच्या नेतृत्वात भारताची प्रगती....
जागतिक उलथापालथीच्या काळात मोदींच्या नेतृत्वात भारताची प्रगती.....
राऊत यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल पंतप्रधान मोदींबाबत मोठी भविष्यवाणी
राऊत यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल पंतप्रधान मोदींबाबत मोठी भविष्यवाणी.
शिवनिका ट्रस्ट प्रकरणी SIT स्थापन; ट्रस्टींवरही येणार तपासाचा फेरा
शिवनिका ट्रस्ट प्रकरणी SIT स्थापन; ट्रस्टींवरही येणार तपासाचा फेरा.
इराण-अमेरिका युद्धाचा भारतावर काय परिणाम?मोदींनी लोकसभेत सगळं सांगितलं
इराण-अमेरिका युद्धाचा भारतावर काय परिणाम?मोदींनी लोकसभेत सगळं सांगितलं.
भोंदूबाबा खरातने सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरलं... मोठा कारनामा समोर
भोंदूबाबा खरातने सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरलं... मोठा कारनामा समोर.
आताच सोनं खरेदी करा बरं... गेल्या 40 वर्षात झालं नव्हतं एवढं स्वस्त...
आताच सोनं खरेदी करा बरं... गेल्या 40 वर्षात झालं नव्हतं एवढं स्वस्त....
शिवसेना- भाजपमध्ये तणाव, एकनाथ शिंदे यांची तातडीने मंत्र्यांसोबत बैठक
शिवसेना- भाजपमध्ये तणाव, एकनाथ शिंदे यांची तातडीने मंत्र्यांसोबत बैठक.