AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हालचाली वाढल्या, नमामि गोदा प्रकल्पाच्या माध्यमातून होणार मोठे बदल, जाणून घ्या

वाराणसीच्या धर्तीवर नाशिकमध्येही नमामि गोदा प्रकल्प राबविला जाणार आहे. त्यासाठी प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी महानगर पालिकेने कंबर कसली आहे.

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हालचाली वाढल्या, नमामि गोदा प्रकल्पाच्या माध्यमातून होणार मोठे बदल, जाणून घ्या
Image Credit source: Google
| Updated on: Apr 21, 2023 | 4:57 PM
Share

नाशिक : दर बारा वर्षांनी कुंभमेळा नाशिकमध्ये होत असतो. त्यानिमित्ताने दक्षिन गंगा म्हणून ओळख असलेल्या गोदावरी नदी स्वच्छ करण्यासाठी नमामि गोदा हा प्रकल्प जाहीर करण्यात आला होता. त्यासाठी केंद्रासह राज्य सरकार आर्थिक हातभार लावणार आहे. गोदावरी नदी स्वच्छ करण्यासाठी या प्रकल्पा मोठा वाटा असणार आहे. ज्यामध्ये गोदावरी नदीत जाणारे दूषित पाणी रोखले जाणार आहे. वाराणसी येथील गंगा नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी राबविण्यात आलेला प्रकल्प नाशिक येथे राबविला जाणार आहे. त्याच धर्तीवर गोदावरी प्रदूषण मुक्त करण्यासाठी हालचाली वाढल्या आहेत. याबाबतचा अहवाल तयार करण्यासाठी पालिकेने कंबर कसली असून ऑगस्ट महिन्याच्या अखेर पर्यन्त हा प्रकल्प राबविण्यात आला आहे.

सिंहस्थ कुंभमेळयाच्या पार्श्वभूमीवर गोदावरी नदी आणि तिला जोडेलल्या उपनद्या प्रदूषण मुक्त करण्यावर भर दिला जात आहे. नमामि गोदा योजनेचा प्रकल्प अहवाल ऑगस्ट महिन्या अखेर सादर केला जाणार आहे.

नाशिक महानगर पालिकेचे अधीक्षक अभियंता शिवाजी चव्हाणके हे याबाबत आढावा घेत आहे. यामध्ये शहरातील मलवाहिकांची क्षमतावाढ आणि सुधारणा करून नदीत जाणारे मलवाहिका अडवून तिथे केंद्र उभारले जाणार आहे.

यामध्ये सर्वात महत्वाची बाब म्हणजे नव्याने रहिवासी भाग तयार होत आहे तिथेही मलवाहिका निर्माण केल्या जाणार आहे. यामध्ये नाशिक शहरात दोन ठिकाणी मलजल प्रक्रिया केंद्र उभारले जाणार आहे. त्यात मखमलाबाड आणि कामटवाडे येथे होण्याची शक्यता आहे.

नमामि गोदा म्हणजे घाट परिसराचे सुशोभीकरणही केले जाणार आहे. जुन्या घाटांचे संवर्धन करत असतांना नव्या घाटाची निर्मितीही केली जाणार आहे. यामध्ये दूषित पाणी प्रक्रियाकरून नदीत सोडण्याची प्रक्रियेवर भर दिला जाणार आहे.

रामकुंड परिसरात येणारे पाणी स्वच्छ कसे येईल आणि ते कसे स्वच्छ राहील यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हा प्रकल्प कसा पूर्ण करता येईल यासाठीचे प्रयत्न सुरू असून सल्लागार नेमण्यात आले आहे. हा प्रकल्प आगामी काळात पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकार निधी उपलब्ध करून देणार आहे.

हा प्रकल्प करत असतांना नाशिक महानगर पालिकेच्या माध्यमातून पूर्ण केला जाणार आहे. त्यामध्ये नाशिक महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी अहवाल तयार करण्यासाठी यंत्रणा राबवत कंबर कसली असून आगामी काळातील सिंहस्थ कुंभमेळा कसा उत्तम होईल यासाठी प्रयत्न केले जात आहे.

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.