AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nitesh Rane : अयोध्येत लहान मुलांना परवानगी आहे? नितेश राणेंनी उडवली आदित्य ठाकरेंची खिल्ली, तर ज्ञानवापीवर भूमिका स्पष्ट करण्याचं आव्हान

आता दौऱ्यावरून भाजपने आदित्य ठाकरे यांची खिल्ली उडवायला सुरू केली आहे. आज भाजप आमदार नितेश राणे हे नाशिकमध्ये बोलत होते. त्यांनी हिंदुत्वावरून शिवसेनेवर सडकडून टीका केली आहे.

Nitesh Rane : अयोध्येत लहान मुलांना परवानगी आहे? नितेश राणेंनी उडवली आदित्य ठाकरेंची खिल्ली, तर ज्ञानवापीवर भूमिका स्पष्ट करण्याचं आव्हान
अयोध्येत लहान मुलांना परवानगी आहे? नितेश राणेंनी उडवली आदित्य ठाकरेंची खिल्ली, तर ज्ञानवापीवर भूमिका स्पष्ट करण्याचं आव्हानImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 07, 2022 | 4:05 PM
Share

नाशिक : गेल्या अनेक दिवासांपासून आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचा अयोध्या दौरा (Ayodhya Visit) गाजतोय. राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या अयोध्या दौऱ्याच्या घोषणेनेही बराच काळ राजकारण तापवलं, मात्र भाजप खासदार बृजभूषण सिंह यांच्या प्रखर विरोधानंतर राज ठाकरे यांनी हा दौरा स्थगित करण्याचा निर्णय घेतला. तर राज्यसभेच्या निवडणुकीमुळे आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याच्या तारखेतही बदल करण्यात आला. आता येत्या 15 जूनला हा दौरा पार पडत आहे. या दौऱ्याआधी शिवसेनेकडूनही जोरदार तयारी करण्यात आली आहे. मात्र आता दौऱ्यावरून भाजपने आदित्य ठाकरे यांची खिल्ली उडवायला सुरू केली आहे. आज भाजप आमदार नितेश राणे हे नाशिकमध्ये बोलत होते. त्यांनी हिंदुत्वावरून शिवसेनेवर सडकडून टीका केली आहे. तर लहान मुलांना अयोध्यात परवानगी आहे का? असा सवाल करत आदित्य ठाकरे यांना खोचक टोला लगावला आहे.

ज्ञानवापीबाबत भूमिका स्पष्ट करा

गेल्या अनेक दिवसांपासून देशाच्या राजकारणात ज्ञानवापी मशीदीचा मुद्दाही चांगलाच गाजत आहे. ज्ञानव्यापी वर शिवसेनेनं आजवर भूमिका स्पष्ट केली नाही. त्यामुळे ज्ञानव्यापीवर भूमिका अयोध्येत भूमिका स्पष्ट करावी, असे आव्हानही राणे यांनी दिलं आहे. तर या दौऱ्यासाठी शिवसेनेने जोरदार तयारी केली आहे.

शिवसेना नेत्यांकडून अयोध्येत पाहणी

दोन दिवसांपूर्वीच शिवसेना नेत्यांनी अयोध्येत जाऊन पाहणी केली आहे. आदित्य ठाकरे अयोध्येत दर्शन घेऊन शरयू नदीवर महाआरती करणार असल्याचेही शिवसेनेकडून सांगण्यात आले आहे. तसेच आमचा हा दौरा राजकीय नाही हा आमचा धार्मिक दौरा आहे, असेही शिवसेना नेते सध्या सांगत आहेत. तर भाजपकडून पुन्हा पुन्हा शिवसेनेच्या हिंदुत्वावरून सवाल उपस्थित केले जात आहेत, आता राणे यांना शिवसेना काय उत्तर देणार, तसेच ज्ञानवापीबाबत काय भूमिका घेणार, हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

संजय राऊत पुन्हा राणेंच्या टार्गेटवर

तसेच कडवट शिवसैनिक संजय पवार आहेत संजय राऊत नाही, संजय राऊत बाहेरून आले आहेत, त्यांचा काय संबध, संजय राऊत निर्लज्ज आहेक, त्यांनी मा साहेब आणि बाळासाहेब यांच्यावर लेख लिहिला होता त्यांच्यात वाद आहे असा, त्याला शिवसेनेचे आमदार मतं देतीला का? असा सवालही राणे यांनी यावेळी केला आहे. तर सेफ मत संजय पवार यांना द्यावी संजय राऊतांना उर्वरित मत द्यावी, तसेच संजय राऊतांना लीलावतीला पाठविण्याची वेळ आली आहे, असे म्हणत राणे यांनी यावेळी पुन्हा राऊतांनही टार्गेट केलं आहे.

Follow Us
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?.
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह..
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह...
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी.
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला.
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?.
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?.
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप.
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?.
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले.
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा.