AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik : दुष्काळात तेरावा, आगीच्या दुर्घटनेत जनावरांचा चारा जळून खाक, कांद्यालाही झळ

यंदाच्या उन्हाळ्यामध्ये शेत शिवारात आगीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या. यापूर्वी ऊसाच्या फडाला आग लागल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. तर आता साठवलेल्या चाऱ्याचे नुकसान होत आहे. या सर्व घटनांचे कारण शॉर्टसर्किटच आहे. त्यामुळे निसर्गाच्या लहरीपणाबरोबर महावितरणच्या मनमानी कारभाराचाही सामना करावा लागला आहे.

Nashik : दुष्काळात तेरावा, आगीच्या दुर्घटनेत जनावरांचा चारा जळून खाक, कांद्यालाही झळ
| Edited By: | Updated on: May 23, 2022 | 11:49 AM
Share

नाशिक : यंदा (Summer Season) उन्हाच्या झळा अधिक तीव्र झाल्याने चारा टंचाई निर्माण झाली आहे. शिवाय (Green Fodder) हिरवा चारा दुरापस्त झाल्यानंतर नाशिकमधील द्याने गावच्या (Farmer) शेतकऱ्यासमोर दुष्काळात तेरावा अशी काहीशी स्थिती निर्माण झाली आहे, द्याने शिवारात संजय कापडणीस यांनी काढणी झालेल्या चारा पिकांची गंज लावण्यात आली होती. असे असताना चारा गंजीला आग लागल्याची दुर्दैवी घटना घडलीय. यामध्ये चारा पिकाचे तर नुकसान झालेच आहे पण साठवणूक केलेल्या कांद्यालाही याची झळ पोहचली आहे. शेतकरी उत्पादन वाढवून खर्च कमी करण्यासाठी एक ना अनेक उपाययोजना करीत आहे पण कधी नैसर्गिक संकट तर कधी सुल्तानी संकट शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाही. या घटनेत कापडणीस यांचा 5 ट्रॉली चारा जळून खाक झाला आहे.

नेमके घटनेचे कारण काय?

यंदाच्या उन्हाळ्यामध्ये शेत शिवारात आगीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या. यापूर्वी ऊसाच्या फडाला आग लागल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. तर आता साठवलेल्या चाऱ्याचे नुकसान होत आहे. या सर्व घटनांचे कारण शॉर्टसर्किटच आहे. त्यामुळे निसर्गाच्या लहरीपणाबरोबर महावितरणच्या मनमानी कारभाराचाही सामना करावा लागला आहे. द्याने येथील घटनाही शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.वाऱ्यामुळे विद्युत तारांचे घर्षण झाल्याने हा प्रकार घडल्याचे शेतकरी सांगत आहेत.

साठवलेल्या कांद्याचाही वांदाच

एकतर कांद्याला बाजारापेठेत दर नाही. त्यामुळे शेतकरी आता विक्रीपेक्षा साठवणूकीवर भर देत आहेत. कांदाचाळीमध्ये साठवणूक करुन वाढीव दराच्या प्रतिक्षेत असलेल्या कापडणीस यांना वेगळ्याच समस्येला सामोरे जावे लागले आहे. वाळलेल्या चाऱ्याबरोबर आगीची झळ कांद्यालाही लागली. यामध्ये कापडणीस यांना दुहेरी फटका बसला आहे.

आर्थिक नुकसान, वर्षभर चाऱ्याचा प्रश्न

आगीच्या घटनेत कापडणीस यांचे तर न भरुन निघणारे नुकसान झालेच आहे. पण आता वर्षभर जनावरांपुढे काय टाकावे हा प्रश्न आहे. कारण साठवणूक केलेला तब्बल 5 ट्रॉली कडबा जळून खाक झाला आहे. तर हिरवा चाराही नाही. त्यामुळे वर्षभर जनावरे सांभाळावीत कशी असा सवाल त्यांच्यासमोर आहे. सध्या 1हजार 300 शेकडा कडबा असून तो विकतचा घेणे मुश्किल झाले आहे. शेतीमालाचे दर कमी झाले असतनाच त्यांच्यासमोर असे संकट उभारले गेले आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.