Nashik : दुष्काळात तेरावा, आगीच्या दुर्घटनेत जनावरांचा चारा जळून खाक, कांद्यालाही झळ

यंदाच्या उन्हाळ्यामध्ये शेत शिवारात आगीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या. यापूर्वी ऊसाच्या फडाला आग लागल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. तर आता साठवलेल्या चाऱ्याचे नुकसान होत आहे. या सर्व घटनांचे कारण शॉर्टसर्किटच आहे. त्यामुळे निसर्गाच्या लहरीपणाबरोबर महावितरणच्या मनमानी कारभाराचाही सामना करावा लागला आहे.

Nashik : दुष्काळात तेरावा, आगीच्या दुर्घटनेत जनावरांचा चारा जळून खाक, कांद्यालाही झळ
Follow us
| Updated on: May 23, 2022 | 11:49 AM

नाशिक : यंदा (Summer Season) उन्हाच्या झळा अधिक तीव्र झाल्याने चारा टंचाई निर्माण झाली आहे. शिवाय (Green Fodder) हिरवा चारा दुरापस्त झाल्यानंतर नाशिकमधील द्याने गावच्या (Farmer) शेतकऱ्यासमोर दुष्काळात तेरावा अशी काहीशी स्थिती निर्माण झाली आहे, द्याने शिवारात संजय कापडणीस यांनी काढणी झालेल्या चारा पिकांची गंज लावण्यात आली होती. असे असताना चारा गंजीला आग लागल्याची दुर्दैवी घटना घडलीय. यामध्ये चारा पिकाचे तर नुकसान झालेच आहे पण साठवणूक केलेल्या कांद्यालाही याची झळ पोहचली आहे. शेतकरी उत्पादन वाढवून खर्च कमी करण्यासाठी एक ना अनेक उपाययोजना करीत आहे पण कधी नैसर्गिक संकट तर कधी सुल्तानी संकट शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाही. या घटनेत कापडणीस यांचा 5 ट्रॉली चारा जळून खाक झाला आहे.

नेमके घटनेचे कारण काय?

यंदाच्या उन्हाळ्यामध्ये शेत शिवारात आगीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या. यापूर्वी ऊसाच्या फडाला आग लागल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. तर आता साठवलेल्या चाऱ्याचे नुकसान होत आहे. या सर्व घटनांचे कारण शॉर्टसर्किटच आहे. त्यामुळे निसर्गाच्या लहरीपणाबरोबर महावितरणच्या मनमानी कारभाराचाही सामना करावा लागला आहे. द्याने येथील घटनाही शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.वाऱ्यामुळे विद्युत तारांचे घर्षण झाल्याने हा प्रकार घडल्याचे शेतकरी सांगत आहेत.

साठवलेल्या कांद्याचाही वांदाच

एकतर कांद्याला बाजारापेठेत दर नाही. त्यामुळे शेतकरी आता विक्रीपेक्षा साठवणूकीवर भर देत आहेत. कांदाचाळीमध्ये साठवणूक करुन वाढीव दराच्या प्रतिक्षेत असलेल्या कापडणीस यांना वेगळ्याच समस्येला सामोरे जावे लागले आहे. वाळलेल्या चाऱ्याबरोबर आगीची झळ कांद्यालाही लागली. यामध्ये कापडणीस यांना दुहेरी फटका बसला आहे.

हे सुद्धा वाचा

आर्थिक नुकसान, वर्षभर चाऱ्याचा प्रश्न

आगीच्या घटनेत कापडणीस यांचे तर न भरुन निघणारे नुकसान झालेच आहे. पण आता वर्षभर जनावरांपुढे काय टाकावे हा प्रश्न आहे. कारण साठवणूक केलेला तब्बल 5 ट्रॉली कडबा जळून खाक झाला आहे. तर हिरवा चाराही नाही. त्यामुळे वर्षभर जनावरे सांभाळावीत कशी असा सवाल त्यांच्यासमोर आहे. सध्या 1हजार 300 शेकडा कडबा असून तो विकतचा घेणे मुश्किल झाले आहे. शेतीमालाचे दर कमी झाले असतनाच त्यांच्यासमोर असे संकट उभारले गेले आहे.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.