Nashik | भुयारी मार्गात पाणी साचत असल्याने धोकादायक पध्दतीने वाहतूक सुरू

| Updated on: Jul 31, 2022 | 9:40 AM

नगरसूल रेल्वेस्थानकाजवळ रेल्वमार्ग ओलांडण्यासाठी तयार करण्यात आलेल्या भुयारी मार्गात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतोयं. प्रवाशांचे, शालेय विद्यार्थीचे येथून प्रवास करताना प्रचंड हाल होत आहेत.

Nashik | भुयारी मार्गात पाणी साचत असल्याने धोकादायक पध्दतीने वाहतूक सुरू
Follow us on

येवला : नाशिक (Nashik) जिल्हात पावसाने जोरदार हजेरी लावलीयं. यामुळे नद्यांना पूर आला इतकेच नाही तर अनेक ठिकाणी रस्त्यावरही पाणी साचल्याचे चित्र आहे. नागरिकांना पावसाच्या पाण्यातून वाट काढत रस्त्याने ये जा करावी लागत आहे. येवला-नांदगाव प्रमुख राज्य महामार्ग (Highway) क्रमांक सातवरील नगरसूल रेल्वेस्थानकाजवळ रेल्वमार्ग ओलांडण्यासाठी तयार करण्यात आलेल्या भुयारी मार्गात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याले आहे. याच गुडघाभर पाण्यातून रस्ता काढत नागरिकांना धोकादायक (Dangerous) पध्दतीने ये-जा करावी लागत आहे.

भुयारी मार्गात मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने नागरिकांना मोठा त्रास

नगरसूल रेल्वेस्थानकाजवळ रेल्वमार्ग ओलांडण्यासाठी तयार करण्यात आलेल्या भुयारी मार्गात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतोयं. प्रवाशांचे, शालेय विद्यार्थीचे येथून प्रवास करताना प्रचंड हाल होत आहेत. शिर्डीला येणाऱ्या भाविकांना देखील याच मार्गाने जावे लागत असल्याने भाविकांना देखील मोठा त्रास सहन करावा लागतोयं.

हे सुद्धा वाचा

पाण्याचा निचरा करण्याची उपाययोजना करण्याची मागणी

भुयारी मार्गात पाणी साचण्याची समस्या गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. थोडा जरी पाऊस झाला की, याठिकाणी गुडघाभर पाणी साचते. बऱ्याच वेळा तर नागरिकांना या पाण्यातून वाहने चालवणे देखील अवघड होते. या पाण्यातून जाताना अनेकदा गाड्या देखील बंद पडतात. या पाण्याचा निचरा करण्याची उपाययोजना त्वरित करण्यात अशी मागणी नागरिकांकडून सातत्याने केली जातयं.