AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोबीला मातीमोल भाव; 2 एकरातील भाजीवर रोटर फिरवला…

गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य बाजारभाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी आता टोकाचे पाऊल उचलले आहे. कवडीमोल भावाने शेतीमाल घेतला जात असल्याने पीक भूईसपाट करण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे.

कोबीला मातीमोल भाव; 2 एकरातील भाजीवर रोटर फिरवला...
| Edited By: | Updated on: Feb 28, 2023 | 2:43 PM
Share

येवला/नाशिक : राज्यातील सरकार कोणतंही असो, सत्तांतर होऊन सरकार बदलले गेले तरी शेतकऱ्यांच्या परिस्थितीमध्ये मात्र कोणताही बदल झाल्याचे दिसून येत आहे. शेतीच्या प्रत्येक हंगामात कोणत्या ना कोणत्या समस्यांचा डोंगर मात्र हटता हटेना अशी अवस्था शेतकऱ्यांच्या झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य बाजारभाव मिळत नाही. शेतकऱ्यांनी पिकासाठी केलेला खर्चही शेतीमालातून निघणं कठीण झाले आहे. शेतीमाल एक क्विंटल घालूनही शेतकऱ्यांच्या हातात शंभर रुपये मिळणे कठीण झाले आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांनी आता शेतातील पीक काढण्यापेक्षा आणि खर्च करण्यापेक्षा ते मातीतच घातलेले बरे म्हणून आता त्यांनी शेतीमालावरच नांगर फिरवण्याचे धाडस केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून कांदा, वांगे, आणि इतर भाजीपाल्याच्या मालाला योग्य बाजारभाव मिळत नाही. त्यामुळेच शेतकऱ्यांनी शेतात आलेल्या पिकावर कधी ट्रॅक्टर फिरवतात,

कधी उभा पिकात जनावरं सोडतात तर विजय जेजुरकर यांच्यासारख्या शेतकऱ्याकडून आलेल्या कोबीच्या पिकावर रोटर फिरवून हे पीक आता मातीमोल करुन टाकण्यात आले आहे.

त्यांनी या पिकावर रोटर फिरवला असला तरी त्यासाठी केलेली मेहनत, त्याच्यासाठी वापरण्यात आलेली खते, औषध फवारणीचा साधा खर्चही या पिकातून निघणार नसल्यामुळेच विजय जेजुरकर यांनी हा निर्णय घेतला आहे.

काही दिवसांपूर्वी कांद्याच्या पिकावरही ट्रॅक्टर फिरवून कांदा मातीत घातला होता. तर काल पुणे जिल्ह्यातील पुरंदर जिल्ह्यातील एका गावामध्ये वांगे पिकावर ट्रॅक्टर फिरवण्यात आला होता.

त्यानंतर आता कांद्यापाठोपाठ कोबी पिकावर रोटर फिरवत जोमदार कोबीचे पीक भुईसपाट करण्यात आले आहे. येवला तालुक्यातील धामणगाव येथील शेतकरी विजय जेजुरकर यांनी कोबी पिकावर रोटर फिरवून त्यांनी आपले पीक भुईसपाट करण्यात आले आहे.

विजय जेजुरकर यांनी पन्नास हजार रुपये खर्च करून दोन एकरमध्ये कोबीचे पीक घेतले होते. मात्र दीड ते दोन किलो वजनाच्या कोबीच्या गट्ट्याला दोन रुपये इतका मिळत आहे त्यामुळेच जेजुरकर यांनी पिकावर रोटर फिरवण्याचा निर्णय घेतला.

गणेश नाईक यांच्या आरोपांवर एकनाथ शिंदेंचे पहिल्यांदाच भाष्य, नेमकं काय
गणेश नाईक यांच्या आरोपांवर एकनाथ शिंदेंचे पहिल्यांदाच भाष्य, नेमकं काय.
अजित पवार यांचं विमान पडलं, त्यानंतर पुन्हा 3 स्फोट? नेमकं काय घडलं?
अजित पवार यांचं विमान पडलं, त्यानंतर पुन्हा 3 स्फोट? नेमकं काय घडलं?.
जळालेल्या ब्लॅक बॉक्सचा डेटा परदेशात तपासणीसाठी पाठवण्याची शक्यता
जळालेल्या ब्लॅक बॉक्सचा डेटा परदेशात तपासणीसाठी पाठवण्याची शक्यता.
DGCA चा प्राथमिक अहवाल तत्काळ जाहीर करा, रोहित पवारांची मागणी
DGCA चा प्राथमिक अहवाल तत्काळ जाहीर करा, रोहित पवारांची मागणी.
अमरावतीत बस स्थानकाची दुर्दशा; जीर्ण इमारतीमुळे प्रवाशांमध्ये चिंता
अमरावतीत बस स्थानकाची दुर्दशा; जीर्ण इमारतीमुळे प्रवाशांमध्ये चिंता.
महायुतीत वाद पुन्हा तापला; रवींद्र धंगेकरांची गणेश नाईकावर जोरदार टीका
महायुतीत वाद पुन्हा तापला; रवींद्र धंगेकरांची गणेश नाईकावर जोरदार टीका.
सत्तारांच्या मंदिर भेटीवरून अंबादास दानवेंची मोठी प्रतिक्रिया
सत्तारांच्या मंदिर भेटीवरून अंबादास दानवेंची मोठी प्रतिक्रिया.
छत्रपती संभाजीनगरचे आमदार, नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या भेटीला
छत्रपती संभाजीनगरचे आमदार, नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या भेटीला.
...तर वनमंत्री काय कामाचे? गणेश नाईकांच्या भूमिकेवर नीलेश राणे संतापले
...तर वनमंत्री काय कामाचे? गणेश नाईकांच्या भूमिकेवर नीलेश राणे संतापले.
रायगडावरील शिवरायांचे समाधीस्थळ अंधारात, आमदार गोपीचंद पडळकरांकडून दखल
रायगडावरील शिवरायांचे समाधीस्थळ अंधारात, आमदार गोपीचंद पडळकरांकडून दखल.