राष्ट्रवादीचे प्रवक्ते म्हणून बोलायला लागल्याने राऊतांची ओळख, गिरीश महाजन यांची खोचक टीका

शिवसेना नेते संजय राऊत यांच्याकडून करण्यात आलेल्या फोन टॅपिंगच्या आरोपावर भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राऊत यांच्या बोलण्याला काही किंमत नाही.

राष्ट्रवादीचे प्रवक्ते म्हणून बोलायला लागल्याने राऊतांची ओळख, गिरीश महाजन यांची खोचक टीका
राष्ट्रवादीचे प्रवक्ते म्हणून बोलायला लागल्याने राऊतांची ओळख, गिरीश महाजन यांची खोचक टीकाImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 05, 2022 | 2:46 PM

नाशिक: शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांच्याकडून करण्यात आलेल्या फोन टॅपिंगच्या (phone tapping) आरोपावर भाजपचे नेते गिरीश महाजन (girish mahajan) यांनी राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राऊत यांच्या बोलण्याला काही किंमत नाही. ज्या वेळेस आमची सत्ता होती, तेव्हा संजय राऊत कुठे होते? संजय राऊत यांना याआधी कोणी ओळखत नव्हते. मागच्या काही दिवसांपासून त्यांना लोक ओळखायला लागले. राष्ट्रवादीचे प्रवक्ते म्हणून बोलायला लागले, तेव्हा त्यांची ओळख झाली, अशी खोचक टीका गिरीश महाजन यांनी केली आहे. शिवसेना आम्हाला सोडून गेली त्यात सर्वात मोठा पुढाकार संजय राऊत यांचा होता. त्यानंतर त्यांना लोक ओळखायला लागले, असा टोलाही महाजन यांनी लगावला. गिरीश महाजन नाशिकमध्ये आले होते. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधत असताना राऊत यांच्यावर घणाघाती हल्ला चढवला.

नाशिकचं प्रभारीपद मिळाल्यानंतर गिरीश महाजन पहिल्यांदा नाशिकमध्ये आले होते. आमच्या काळात फोन टॅप झाले याबाबतचे कोणतेही पुरावे नाहीत. देशभरातील सर्व विरोधकांचे आता राऊत नाव घेतील. ते भंपक विधाने करत आहेत. आरोप करतायत तर पुरावे द्या ना, असं सांगतानाच राऊत यांच्या जीभेला हाड उरले नाही, अशी टीका गिरीश महाजन यांनी केली. रश्मी शुक्लाप्रकरणी राज्य सरकार आणि पोलीस यंत्रणा काम करत आहेत. या चौकशीत काही पुरावे समोर आले तर त्या गोष्टीला अर्थ आहे, असंही ते म्हणाले.

मनासारखं होत नसल्यानेच राज्यपाल हटाव

सत्ताधाऱ्यांकडून राज्यपाल हटावची मागणी केली जात आहे. त्यावर त्यांनी टीका केली. राज्यपालांची नेमणूक काही शिवसेना किंवा राष्ट्रवादीच्या हातात नाही. आमच्या मना सारख करा नाहीतर राज्यपालांना हटवा अशी त्यांची भूमिका आहे. शासनाच्या, पोलीस खात्याच्या बदल्यांमध्येही हाच प्रकार सुरू आहे. मनासारखं करा नाही तर हटवा, हे धोरण राबवले जात आहे. पण राज्यपालांचं पद संवैधानिक आहे. कोणी कितीही म्हटलं तरी आम्ही फारसा लक्ष देत नाही, असं ते म्हणाले.

मलिकांचा राजीनामा घ्या

नवाब मलिक यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा ही आमची मागणी आहे. दाऊदच्या हस्तकाकडून नगण्य किमतीत त्यांनी प्रॉपर्टी घेतली आहे. हसीना पारकरला पैसे दिले आहेत. तरीही राज्यसरकार त्यांना देशभक्त म्हणत असेल तर काय बोलणार. मग संजय राठोड यांचा राजीनामा का घेतला? हे गेंड्याच्या कातडीचे सरकार आहे. यांना जनाची मनाची काहीच राहिली नाही. कुठे बाळासाहेबांची शिवसेना आणि आज नवाब मलिक जिंदाबादच्या घोषणा देणारी शिवसेना. यापेक्षा शिवसेनेचे दुर्दैव काही नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

तोपर्यंत निवडणुका नकोच

ओबीसी आरक्षण मिळत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नये ही आमची मागणी आहे. पण राज्य सरकार नाकर्ते आहे. या सरकारने कोर्टाला अहवाल पाठवला त्यावर सही, तारीखही नव्हती. मंत्रिमंडळाच्या बैठका घेतात आणि मुख्यमंत्र्यांनी सही पण केली नाही, असंही ते म्हणाले.

संबंधित बातम्या:

ज्योतिषाचं काम घ्यावं इतकी माझी वाईट अवस्था नाहीये; शरद पवारांचा नेमका टोला कुणाला?

फडणवीस असताना फोन टॅपिंगच्या घटना घडल्या, किंमत अधिकाऱ्यांना चुकवावी लागेल: शरद पवारांचा इशारा

नारायण राणे मालवणी पोलीस स्टेशनला पोहोचले; दिशा सालियन प्रकरणात आपली बाजू मांडणार

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.