AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ketaki Chitale : कुणाच्या वडिलांनी मरावं अशी पोस्ट कोणत्या संस्कृतीत बसते? केतकी चितळेच्या पोस्टवरून सुप्रिया सुळेंनी फटकारलं

आज तिला ठाणे कोर्टात हजर केलं त्यानंतर कोर्टानं तिला तीन दिवसांची कोठडी सुनावली आहे. मात्र यावर अजूनही राष्ट्रवादीकडून आक्रमक प्रतिक्रिया उमटत आहेत. आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यावरून केतकी चितळेला फटकारलं आहे.

Ketaki Chitale : कुणाच्या वडिलांनी मरावं अशी पोस्ट कोणत्या संस्कृतीत बसते? केतकी चितळेच्या पोस्टवरून सुप्रिया सुळेंनी फटकारलं
केतकी चितळेची पोलीस कोठडी वाढवून मागणार Image Credit source: tv9 marathi
दादासाहेब कारंडे
दादासाहेब कारंडे | Updated on: May 15, 2022 | 3:52 PM
Share

नाशिक : राज्यात हिंदूत्व हनुमान, चालीसा, नवनीत राणा (Navneet Rana), रवी राणा यांची अटक अशी प्रकरण गाजत असताना आता नव्या वादाला तोंड फुडलंय. कारण अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) हिने तिच्या पोस्टमध्ये पवारांबद्दल (Sharad Pawar) वादग्रस्त मजकूर टाकला. त्यानंतर शनिवारी केतकी चितळेविरोधात गुन्हे दाखल व्हायची मालिका सुरू झाली. आणि बघता बघता केतली चितळेला पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली. आज तिला ठाणे कोर्टात हजर केलं त्यानंतर कोर्टानं तिला तीन दिवसांची कोठडी सुनावली आहे. मात्र यावर अजूनही राष्ट्रवादीकडून आक्रमक प्रतिक्रिया उमटत आहेत. आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यावरून केतकी चितळेला फटकारलं आहे. कुणाच्या वडिलांनी मरावं अशी पोस्ट कोणत्या संस्कृतीत बसते? असा सवाल त्यांनी केतकी चितळेला केला आहे.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

या पोस्टवर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, काही लोकांनी त्यांच्या वॉलवर काहीतरी लिहलं आहे. जे काही झालं ते अत्यंत दुरुदैवी आहे. मी कितेकी चितळेला ओळखत नाही. मात्र मी मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस, आणि राज ठाकरेंचे आभार मानते, ही विकृती समाजासाठी अत्यंत वाईट आहे, ही वेळ कुणावरही येऊ शकते, त्यासाठी सर्वांनी एकत्र येण गरजेचं आहे, अशाही सुप्रिया सुळे म्हणाल्या. तसेच मी ज्या मराठी संस्कृतीत वागले ते त्या संस्कृतीत हे बसत नाही, पवारांनी आजपर्यंत असा कुणाबद्दल शब्द नाही काढला, असे त्यानी आवर्जुन सांगितले.

महागाई सर्वात मोठी समस्या

तसेच त्यांनी इतरही विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे. अनिल देशमुखांवर बोलताना त्या म्हणाल्या. अनेक वेळा रेड करण्याचा विक्रम केंद्र सरकारने केला आहे. त्यांच्या हाती काही लागलं नाही, एवढ्या रेड होतात हे दुर्दैव आहे, असे म्हणत त्यांनी केंद्रावर निशाणा साधला आहे. तसेच जनतेच्या पुढील महागाई हा सर्वात मोठा प्रश्न आहे असे म्हणत. सुषमा स्वराज यांचं उदाहरण देऊन सुप्रिया सुळेंनी हल्लाबोल केला आहे. तर पंतप्रधानांनी सगळ्या मुख्यमंत्र्यांची बैठक राजकारण बाजुला ठेवून घ्यावी आणि महागाईवर आधी तोडगा काढावा, असे आवाहनही त्यांनी केलं. तसेच नाना पटोले यांच्या खंजीर खुपसला या वक्तव्यावर बोलताना त्या म्हणाल्या नाना पटोलेंचं वक्तव्य म्हणजे घरात भांड्याला भांड लागतं. मात्र त्यांनं नात जास्त घट्ट होतं. ज्याच्याकडून अपेक्षा असते त्यांच्याकडून त्यांनी मागितलं पाहिजे, असे म त्यांनी व्यक्त केलं आहे.

Follow Us
कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल..
मोठी बातमी! कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल एक कोटी....
अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं...
Mumbai | अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं इमर्जेन्सी लँडिंग
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले.
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले... नेमकी भानगड काय?
CJP चा सरकारला अल्टिमेटम! FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
CJP On Students Protest | CJP चा सरकारला अल्टिमेटम! उद्यापर्यंत FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या'
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या' पोस्टची तुफान चर्चा
अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? मोठा खुलासा
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? तुकाराम मुंडेंसोबतच्या भेटीबाबत रोहित पवारांचा खुलासा
फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका...
Bharat Gogawale | फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं, व्हिडीओ व्हायरल होताच...
संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक
Om Birla | संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक; नेमकी कोणत्या विषयावर चर्चा?