AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ketaki Chitale : कुणाच्या वडिलांनी मरावं अशी पोस्ट कोणत्या संस्कृतीत बसते? केतकी चितळेच्या पोस्टवरून सुप्रिया सुळेंनी फटकारलं

आज तिला ठाणे कोर्टात हजर केलं त्यानंतर कोर्टानं तिला तीन दिवसांची कोठडी सुनावली आहे. मात्र यावर अजूनही राष्ट्रवादीकडून आक्रमक प्रतिक्रिया उमटत आहेत. आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यावरून केतकी चितळेला फटकारलं आहे.

Ketaki Chitale : कुणाच्या वडिलांनी मरावं अशी पोस्ट कोणत्या संस्कृतीत बसते? केतकी चितळेच्या पोस्टवरून सुप्रिया सुळेंनी फटकारलं
केतकी चितळेची पोलीस कोठडी वाढवून मागणार Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 15, 2022 | 3:52 PM
Share

नाशिक : राज्यात हिंदूत्व हनुमान, चालीसा, नवनीत राणा (Navneet Rana), रवी राणा यांची अटक अशी प्रकरण गाजत असताना आता नव्या वादाला तोंड फुडलंय. कारण अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) हिने तिच्या पोस्टमध्ये पवारांबद्दल (Sharad Pawar) वादग्रस्त मजकूर टाकला. त्यानंतर शनिवारी केतकी चितळेविरोधात गुन्हे दाखल व्हायची मालिका सुरू झाली. आणि बघता बघता केतली चितळेला पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली. आज तिला ठाणे कोर्टात हजर केलं त्यानंतर कोर्टानं तिला तीन दिवसांची कोठडी सुनावली आहे. मात्र यावर अजूनही राष्ट्रवादीकडून आक्रमक प्रतिक्रिया उमटत आहेत. आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यावरून केतकी चितळेला फटकारलं आहे. कुणाच्या वडिलांनी मरावं अशी पोस्ट कोणत्या संस्कृतीत बसते? असा सवाल त्यांनी केतकी चितळेला केला आहे.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

या पोस्टवर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, काही लोकांनी त्यांच्या वॉलवर काहीतरी लिहलं आहे. जे काही झालं ते अत्यंत दुरुदैवी आहे. मी कितेकी चितळेला ओळखत नाही. मात्र मी मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस, आणि राज ठाकरेंचे आभार मानते, ही विकृती समाजासाठी अत्यंत वाईट आहे, ही वेळ कुणावरही येऊ शकते, त्यासाठी सर्वांनी एकत्र येण गरजेचं आहे, अशाही सुप्रिया सुळे म्हणाल्या. तसेच मी ज्या मराठी संस्कृतीत वागले ते त्या संस्कृतीत हे बसत नाही, पवारांनी आजपर्यंत असा कुणाबद्दल शब्द नाही काढला, असे त्यानी आवर्जुन सांगितले.

महागाई सर्वात मोठी समस्या

तसेच त्यांनी इतरही विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे. अनिल देशमुखांवर बोलताना त्या म्हणाल्या. अनेक वेळा रेड करण्याचा विक्रम केंद्र सरकारने केला आहे. त्यांच्या हाती काही लागलं नाही, एवढ्या रेड होतात हे दुर्दैव आहे, असे म्हणत त्यांनी केंद्रावर निशाणा साधला आहे. तसेच जनतेच्या पुढील महागाई हा सर्वात मोठा प्रश्न आहे असे म्हणत. सुषमा स्वराज यांचं उदाहरण देऊन सुप्रिया सुळेंनी हल्लाबोल केला आहे. तर पंतप्रधानांनी सगळ्या मुख्यमंत्र्यांची बैठक राजकारण बाजुला ठेवून घ्यावी आणि महागाईवर आधी तोडगा काढावा, असे आवाहनही त्यांनी केलं. तसेच नाना पटोले यांच्या खंजीर खुपसला या वक्तव्यावर बोलताना त्या म्हणाल्या नाना पटोलेंचं वक्तव्य म्हणजे घरात भांड्याला भांड लागतं. मात्र त्यांनं नात जास्त घट्ट होतं. ज्याच्याकडून अपेक्षा असते त्यांच्याकडून त्यांनी मागितलं पाहिजे, असे म त्यांनी व्यक्त केलं आहे.

Follow Us
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का.
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये...
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये....
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले.
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त.
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?.
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला.
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान.
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग.
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह.
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम.