AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लासलगावचे कांदा लिलाव ठप्प, बाजार समिती प्रशासनाच्या भूमिकेवर शेतकरी संतप्त

विंचूर येथील कृषी साधना महिला शेतकरी संस्था ही कांदा व्यापारी असोसिएशनची सभासद नसल्याने कांदा लिलावातून काढता पाय घेतल्याने कांदा व्यापाऱ्यांच्या या आडमुठ्या भूमिकेमुळे कांद्याचे लिलाव ठप्प झाले. Lasalgaon onion auction

लासलगावचे कांदा लिलाव ठप्प, बाजार समिती प्रशासनाच्या भूमिकेवर शेतकरी संतप्त
संग्रहित छायाचित्र.
| Edited By: | Updated on: Jun 03, 2021 | 7:08 PM
Share

उमेश पारीक, टीव्ही 9 मराठी, लासलगाव

नाशिकः आशिया खंडातील कांद्याची अग्रेसर बाजार समिती म्हणून नावलौकिक असलेल्या लासलगाव बाजार समितीत महिला सभापती आणि उपसभापती असताना महिला संस्थेची कांदा खरेदीसाठी गळचेपी पाहायला मिळतेय. विंचूर येथील कृषी साधना महिला शेतकरी संस्था ही कांदा व्यापारी असोसिएशनची सभासद नसल्याने कांदा लिलावातून काढता पाय घेतल्याने कांदा व्यापाऱ्यांच्या या आडमुठ्या भूमिकेमुळे कांद्याचे लिलाव ठप्प झाले, दुपारपर्यंत कुठलाही तोडगा न निघाल्याने लासलगाव बाजार समिती प्रशासनाच्या या दुटप्पी भूमिकेमुळे शेतकरी संतप्त झालाय. (Lasalgaon onion auction stalled, farmers angry over market committee administration’s role)

कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे वांदे होताना दिसतायत

लासलगाव बाजार समितीत नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे वांदे होताना पाहायला मिळते. आज विंचूर येथील कृषी साधना महिला शेतकरी संस्था ही नाफेडसाठी कांदा खरेदीला उतरली असता, ही संस्था लासलगाव कांदा व्यापारी असोसिएशनचे सभासद नसल्याने कांदा व्यापाऱ्यांनी लिलावातून सहभाग काढून घेतल्याने कांद्याचे लिलाव ठप्प झाले. कांदा लिलाव बंद पडल्याने शेतकरी आक्रमक होत लिलाव पूर्ववत सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांनी बाजार समिती प्रशासनाकडे केली.

केंद्र सरकारने आधारभूत किंमत योजनेंतर्गत मे महिन्यात कांदा खरेदी सुरू केली

लासलगाव बाजारपेठेत गेल्या वर्षी केंद्र सरकारने आधारभूत किंमत योजनेंतर्गत मे महिन्यात कांदा खरेदी सुरू केली होती. ऑगस्टपर्यंत 31 हजार 694 क्विंटल कांद्याची खरेदी कमाल 1187 रुपये, किमान 532 रुपये तर सर्वसाधारण 950 रुपयाने खरेदी केली होती. मात्र यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने नाशिक जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट आल्याने नाफेडमार्फत केंद्र सरकारची कांदा खरेदी तब्बल एक महिना लेट सुरू झाली. आज लासलगाव बाजार समितीतून नाफेडसाठी दोन वाहनांतून कांद्याची खरेदी करण्यात आली, कमाल 2057 तर किमान 1850 इतका बाजार भाव मिळाला आहे.

कांदा व्यापाऱ्यांनी काढता पाय घेतल्याने बाजार समितीतील लिलाव ठप्प

लासलगाव बाजार समितीचे परवानाधारक असलेल्या विंचूर येथील कृषी साधना शेतकरी संस्थेच्या वतीने नाफेडसाठी महिलेने खरेदी सुरू करताच पुरुष प्रधान असलेल्या कांदा व्यापाऱ्यांनी काढता पाय घेतल्याने बाजार समितीतील लिलाव ठप्प झाले. लवकरच यात तोडगा काढून लिलाव पूर्ववत सुरू करणार असल्याचे बाजार समितीचे सचिव यांनी सांगितले.

संबंधित बातम्या:

दर महिन्याच्या अमावस्येला लासलगाव बाजार समिती असते बंद, कारण….!

सरकारने 39.55 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवले 75 हजार कोटी, नेमकं कारण काय?

Lasalgaon onion auction stalled, farmers angry over market committee administration’s role

Follow Us
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया.
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान.
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका.
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका.
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता.
नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात
नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात.
बच्चू कडूंचा सरकारला दुपारी ४ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम; काय घडलं?
बच्चू कडूंचा सरकारला दुपारी ४ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम; काय घडलं?.
प्री-ओपनिंगमध्ये शेअर बाजारात मोठी घसरण!
प्री-ओपनिंगमध्ये शेअर बाजारात मोठी घसरण!.
भारत तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषक विजेता! पंतप्रधानांनी केलं अभिनंदन
भारत तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषक विजेता! पंतप्रधानांनी केलं अभिनंदन.