AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इगतपुरी रेल्वे स्थानकावर खाद्यपदार्थ विक्री बंद, कारवाईविरोधात विक्रेत्यांकडून पोलिसांचा निषेध

गेल्या 10 दिवसांत लोहमार्ग पोलिसांनी नाशिकमधील इगतपुरी रेल्वे स्थानकावर 35 वेंडरवर बेकायदेशीर दंडात्मक कार्यवाही केली. ही कारवाई अयोग्य असून पोलिस आम्हाला नाहक त्रास देत असल्याचा आरोप खाद्य पदार्थ विक्रेत्यांनी केला आहे.

इगतपुरी रेल्वे स्थानकावर खाद्यपदार्थ विक्री बंद, कारवाईविरोधात विक्रेत्यांकडून पोलिसांचा निषेध
इगतपुरी रेल्वे स्थानक
| Edited By: | Updated on: Sep 26, 2021 | 11:04 AM
Share

नाशिक : लोहमार्ग पोलीस, इगतपुरी आणि इगतपुरी रेल्वे स्थानकावर काम करणाऱ्या मध्य रेल्वेच्या अधिकृत वेंडर (खाद्य विक्रेते) यामधील वाद चव्हाट्यावर आला आहे. लोहमार्ग पोलिसांच्या विनाकारण कारवाईच्या निषेधार्थ रेल्वे स्थानकातील सुमारे 200 वेंडर यांनी आज इगतपुरी रेल्वे स्थानकातील सर्व खाद्य पदार्थ विक्री बंद करुन लोहमार्ग पोलिसांचा निषेध केला आहे. यामुळे स्थानकात आलेल्या एकाही प्रवाशाला खाद्य पदार्थ मिळालेल नाहीत. यामुळे प्रवाशांचे हाल झाले.

गेल्या 10 दिवसांत लोहमार्ग पोलिसांनी नाशिकमधील इगतपुरी रेल्वे स्थानकावर 35 वेंडरवर बेकायदेशीर दंडात्मक कार्यवाही केली. ही कारवाई अयोग्य असून पोलिस आम्हाला नाहक त्रास देत असल्याचा आरोप खाद्य पदार्थ विक्रेत्यांनी केला आहे. दरम्यान, सकाळपासून संध्याकाळपर्यंत स्थानकावरील सर्व मुख्य पाच कँटीन बंद ठेवण्यात आले. कँटीन मालक आणि वेंडर यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने रेल्वे प्रशासनाची धावपळ उडाली.

दरम्यान, इगतपुरी लोहमार्ग पोलीस ठाण्याचे सहाययक पोलीस निरीक्षक सोपान भाईक यांनी केलेल्या कार्यवाहीचे समर्थन केले असून, सुरक्षिततेच्या दृष्टीने ही कार्यवाही योग्य असून कायद्याच्या तरतुदीनुसार केली असल्याचे सांगितले आहे.

मुंबईत भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

दुसरीकडे, राज्यातील अन्न आणि औषध विभाग (FDA) मार्फत मुंबईत अनेक ठिकाणी कारवाई करण्यात आली. फेब्रुवारी महिन्यात झालेल्या या कारवाईत मोठ्या प्रमाणात निकृष्ट आणि भेसळयुक्त दर्जाचे खाद्य तेल जप्त करण्यात आले होते. त्यामुळे सर्वसामान्य जनतेने खाद्य तेल खरेदी करताना सावधानता बाळगावी, असे आवाहन एफडीएतर्फे करण्यात आले आहे.

राज्यातील नागरिकांना उत्तम दर्जाचे खाद्य पदार्थ मिळावे यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाकडून (एफडीए) वारंवार विविध दुकानांवर छापेमारी करतात. एफडीतर्फे छापेमारीचे सत्र सुरु केले आहेत. यावेळी अन्न शिजवण्यासाठी गृहिणी जे तेल वापरतात, त्यातील सुमारे 50 टक्के तेल वापरण्यास योग्य नसून ते भेसळयुक्त होते. अन्न आणि औषध प्रशासनाच्या तपासणीत ही गंभीर बाब उघड झाली होती

झोपडपट्टीत मोठी मागणी

एफडीएने स्थानिक पातळीवर मिळणाऱ्या सुट्या तेलाचे नमुने गोळा करून त्याची प्रयोगशाळेत तपासणी केली होती. मात्र यात रंग मिसळलेलं किंवा दुसरे तेल मिक्स अल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे अनेक नामवंत कंपन्यांच्या तुलनेत हे तेल खूपच स्वस्त असल्यामुळे या भेसळयुक्त तेलाला झोपडपट्टी विभागात मोठय़ा प्रमाणात मागणी असते. मात्र हे तेल आरोग्याला अपायकारक असते.या खाद्यतेलात रंग मिसळलेला असतो.

एफडीए प्रशासनाने 30 अन्ननिरीक्षकांची विविध पथके स्थापन करून या उत्पादकांवर कारवाई केली आहे. या धाड सत्रात आठ उत्पादकांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत चार कोटी 98 लाख रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. यात शेंगदाणा, मोहरी, तीळ, सोयाबीन, सूर्यफूल, पामोलिन इत्यादी तेलांचे सुमारे 93 नमुने तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले. यापैकी 49 नमुने भेसळयुक्त असल्याचे स्पष्ट झाले.

संबंधित बातम्या :

सावधान! मुंबईत निकृष्ट आणि भेसळयुक्त खाद्यतेलाचा मोठा साठा जप्त

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.