AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मराठा समाजाला सरसकट कुणबी म्हणून आरक्षण देण्यावर मंत्री गिरीश महाजन यांचं महत्त्वाच वक्तव्य

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या विषयावर तोडगा काढण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलवण्यात आली आहे. "उदयनराजे, संभाजीराजे यांना देखील बोलवलं आहे. सगळे समाज रस्त्यावर उतरले तर राज्याचे हिताचे होणार नाही" असं गिरीश महाजन म्हणाले.

मराठा समाजाला सरसकट कुणबी म्हणून आरक्षण देण्यावर मंत्री गिरीश महाजन यांचं महत्त्वाच वक्तव्य
Maratha Reservation Manoj Jarange Patil
| Updated on: Sep 11, 2023 | 11:45 AM
Share

नाशिक (चैतन्य गायकवाड) : मराठा समाजाला आरक्षण मिळावं, त्यांना कुणबी जातप्रमाणपत्र द्यावं, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण सुरु आहे. त्यांच्या उपोषणाचा आज 13 वा दिवस आहे. दरम्यान मराठा आरक्षणाच्या विषयावर तोडगा निघावा, यासाठी राज्य सरकारने आज सर्वपक्षीय बैठक बोलवली आहे. “बैठकीत तोडगा निघावा हा आमचा प्रयत्न आहे. त्यांनी उपोषण सोडावे अशी माझी जरांगे पाटील यांना विनंती आहे. त्यांनी पाणी सोडलं आहे, तब्येत खराब होत आहे. तात्काळ जीआर काढला तर टिकणार नाही” असं राज्य सरकारमधील मंत्री गिरीश महाजन म्हणाले. “न्यायमुर्ती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. सकारात्मक निर्णय होईल अशी अपेक्षा आहे. सरसकट आरक्षण तांत्रिकदृष्ट्या टिकणारं नाही. सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातूनच मार्ग निघेल. परमनंट सोल्युशन काढण्यासाठी शासनाला त्यांनी वेळ द्यावा” असं गिरीश महाजन म्हणाले.

“मनोज जरांगे पाटील यांची मागणी सुरुवातीला वेगळी होती. मराठवाड्यामधील मराठा समाज वेगळा आहे, असं त्यांनी सांगितलं होतं. कुणबी समाज वेगवेगळ्या भागात आहे. मराठवाड्यातील निजाम काळातून वेगळे झाल्यानंतर समाज कुणबी मराठा झाला. आता ते मागणी करतायत, संपूर्ण राज्यातील मराठा समाजाला कुणबी म्हणून दाखला द्यावा. हे कायद्याच्या चौकटीत बसणारं नाही. हे अश्यक्य आहे, कोर्टातूनच आरक्षण घ्यावे लागेल. सरसकट कुणबी म्हणून आरक्षण दिलं, तर ते कोर्टात टिकणार नाही. पहिल्याच दिवशी ते फेटाळला जाईल त्यासाठी वेळ दिला पाहिजे” असं गिरीश महाजन म्हणाले. ‘कायद्याचा आधार असला पाहिजे’

“आज सगळ्या छोट्या मोठ्या विरोधी पक्ष नेत्यांच्या लोकांना बोलावलं आहे. उदयनराजे, संभाजीराजे यांना देखील बोलवलं आहे. सगळे समाज रस्त्यावर उतरले तर राज्याचे हिताचे होणार नाही” असं गिरीश महाजन म्हणाले. पृथ्वीराज चव्हाण यांच्याबद्दल गिरीश महाजन म्हणाले की, “सगळेच लोक मागणी करू लागतील. पश्चिम महाराष्ट्रातील लोकही बोलतील. आरक्षण सर्वांनाच पाहिजे आहे, कुणाला नको आहे. कॅबिनेटमध्ये निर्णय करून हा प्रश्न सुटणार नाही. त्याला कायद्याचा आधार असला पाहिजे”

मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.