AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मशिदीच्या भोंग्यांवरुन माझ्या 17 हजार कार्यकर्त्यांवर केसेस आणि उद्धव ठाकरे हिंदुत्ववादी, राज ठाकरे कडाडले

"पुण्यात एक पत्रकार भेटला, त्याने सांगितलं, की, माझी मुलगी लहान आहे. तिला भोंग्यांचा त्रास होत होता. म्हणून मी मशिदीत जाऊन मौलवीला सांगितलं, ते ऐकायला तयार नव्हते. आंदोलन झाल्यानंतर भोंगे बंद झाले" हा किस्सा राज ठाकरे यांनी नाशिकच्या वर्धापन दिन कार्यक्रमात बोलताना सांगितला.

मशिदीच्या भोंग्यांवरुन माझ्या 17 हजार कार्यकर्त्यांवर केसेस आणि उद्धव ठाकरे हिंदुत्ववादी, राज ठाकरे कडाडले
Raj-Uddhav
| Updated on: Mar 09, 2024 | 1:27 PM
Share

नाशिक : “आपली भूमिका स्वच्छ होती, आहे. टोल जगभर चालतात. टोलमधून पैसे येतात, ते किती येतात? ते जातात कुठे? हा मुद्दा होता. मुंबई-गोवा रस्ता भीषण आहे. रस्ते नीट करता येत नाही आणि टोल वसूल करताय” अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. “अनेक प्रार्थना स्थळ, मशिदींवरचे भोंगे बंद झाले होते. हे डरपोक सरकार. उद्धव ठाकरे सरकारच्या काळातील भोंग्यांबद्दल बोललो. 17 हजार महाराष्ट्र सैनिकांवर केसेस टाकल्या आणि हे स्वत:ला हिंदुत्वावादी समजतात” अशा शब्दात राज ठाकरे यांनी टीका केली.

“माझ्या 17 हजार कार्यकर्त्यांवर केसेस टाकल्या, काय चूक होती त्यांची?. त्या भोंग्यांचा मुस्लिम समाजालाही त्रास होतो. हा आमचा मामू इथे आलाय, काल तिथे गेले होते. अनेक मुस्लिम बांधव भेटले. पुण्यात एक पत्रकार भेटला, त्याने सांगितलं, की, माझी मुलगी लहान आहे. तिला भोंग्यांचा त्रास होत होता. म्हणून मी मशिदीत जाऊन मौलवीला सांगितलं, ते ऐकायला तयार नव्हते. आंदोलन झाल्यानंतर भोंगे बंद झाले. सरकार ढिली पडल्यावर पुन्हा सुरु. तुमच्या कष्टातून एकदा राज्य हातात द्या, सगळे भोंगे एकसाथ बंद करुन टाकतो. बघू कोणाची हिम्मत होते भोंगे लावायची” असं राज ठाकरे म्हणाले.

समुद्रातील दर्गा पाडल्यावर मुस्लिम समाजाकडून का प्रतिक्रिया आली नाही?

“माहीमच्या समुद्रात अनधिकृत दर्गा बांधत होते. एकारात्रीत तोडायला लावला. त्यानंतर मुस्लिम समाजाकडून कुठलीही प्रतिक्रिया आली नाही. कारण त्यांना माहित आहे, हे अनधिकृत आहे. समुद्रात जिथे दर्गा उभारला जात होता, तिथून पोलीस स्टेशन 100 फुटावर आहे, का त्यांच्या लक्षात आलं नाही? महापालिकेच लक्ष का गेलं नाही?” असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल