AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मशिदीच्या भोंग्यांवरुन माझ्या 17 हजार कार्यकर्त्यांवर केसेस आणि उद्धव ठाकरे हिंदुत्ववादी, राज ठाकरे कडाडले

"पुण्यात एक पत्रकार भेटला, त्याने सांगितलं, की, माझी मुलगी लहान आहे. तिला भोंग्यांचा त्रास होत होता. म्हणून मी मशिदीत जाऊन मौलवीला सांगितलं, ते ऐकायला तयार नव्हते. आंदोलन झाल्यानंतर भोंगे बंद झाले" हा किस्सा राज ठाकरे यांनी नाशिकच्या वर्धापन दिन कार्यक्रमात बोलताना सांगितला.

मशिदीच्या भोंग्यांवरुन माझ्या 17 हजार कार्यकर्त्यांवर केसेस आणि उद्धव ठाकरे हिंदुत्ववादी, राज ठाकरे कडाडले
Raj-Uddhav
| Updated on: Mar 09, 2024 | 1:27 PM
Share

नाशिक : “आपली भूमिका स्वच्छ होती, आहे. टोल जगभर चालतात. टोलमधून पैसे येतात, ते किती येतात? ते जातात कुठे? हा मुद्दा होता. मुंबई-गोवा रस्ता भीषण आहे. रस्ते नीट करता येत नाही आणि टोल वसूल करताय” अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. “अनेक प्रार्थना स्थळ, मशिदींवरचे भोंगे बंद झाले होते. हे डरपोक सरकार. उद्धव ठाकरे सरकारच्या काळातील भोंग्यांबद्दल बोललो. 17 हजार महाराष्ट्र सैनिकांवर केसेस टाकल्या आणि हे स्वत:ला हिंदुत्वावादी समजतात” अशा शब्दात राज ठाकरे यांनी टीका केली.

“माझ्या 17 हजार कार्यकर्त्यांवर केसेस टाकल्या, काय चूक होती त्यांची?. त्या भोंग्यांचा मुस्लिम समाजालाही त्रास होतो. हा आमचा मामू इथे आलाय, काल तिथे गेले होते. अनेक मुस्लिम बांधव भेटले. पुण्यात एक पत्रकार भेटला, त्याने सांगितलं, की, माझी मुलगी लहान आहे. तिला भोंग्यांचा त्रास होत होता. म्हणून मी मशिदीत जाऊन मौलवीला सांगितलं, ते ऐकायला तयार नव्हते. आंदोलन झाल्यानंतर भोंगे बंद झाले. सरकार ढिली पडल्यावर पुन्हा सुरु. तुमच्या कष्टातून एकदा राज्य हातात द्या, सगळे भोंगे एकसाथ बंद करुन टाकतो. बघू कोणाची हिम्मत होते भोंगे लावायची” असं राज ठाकरे म्हणाले.

समुद्रातील दर्गा पाडल्यावर मुस्लिम समाजाकडून का प्रतिक्रिया आली नाही?

“माहीमच्या समुद्रात अनधिकृत दर्गा बांधत होते. एकारात्रीत तोडायला लावला. त्यानंतर मुस्लिम समाजाकडून कुठलीही प्रतिक्रिया आली नाही. कारण त्यांना माहित आहे, हे अनधिकृत आहे. समुद्रात जिथे दर्गा उभारला जात होता, तिथून पोलीस स्टेशन 100 फुटावर आहे, का त्यांच्या लक्षात आलं नाही? महापालिकेच लक्ष का गेलं नाही?” असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला.

Follow Us
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर APMC मार्केटमध्ये आंब्याच्या पेट्या दाखल
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर APMC मार्केटमध्ये आंब्याच्या पेट्या दाखल.
मुंबईतील गिरगावात शोभायात्रेचा उत्साह, तरूणाईचा उत्साह शिगेला
मुंबईतील गिरगावात शोभायात्रेचा उत्साह, तरूणाईचा उत्साह शिगेला.
गुढीपाडव्याचा उत्सव; राज ठाकरे आणि कुटुंबियांकडून गुढीचं पूजन
गुढीपाडव्याचा उत्सव; राज ठाकरे आणि कुटुंबियांकडून गुढीचं पूजन.
चाकणकर मूर्ख, खोट बोलत आहेत, चाकणकरांवर संजय राऊत यांचा जोरदार हल्ला
चाकणकर मूर्ख, खोट बोलत आहेत, चाकणकरांवर संजय राऊत यांचा जोरदार हल्ला.
ठाकरेंचे खासदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात, मातोश्रीचं टेन्शन वाढताच...
ठाकरेंचे खासदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात, मातोश्रीचं टेन्शन वाढताच....
सांगली जिल्हा परिषदेत मविआची सत्ता, अध्यक्षपदी पवार गटाची महिला
सांगली जिल्हा परिषदेत मविआची सत्ता, अध्यक्षपदी पवार गटाची महिला.
उद्या गुढीपाडवा... पण नववर्ष कधी सुरू होणार?
उद्या गुढीपाडवा... पण नववर्ष कधी सुरू होणार?.
ठाकरे युतीनंतर पहिलाच गुढीपाडवा मेळावा, राज ठाकरे काय बोलणार?
ठाकरे युतीनंतर पहिलाच गुढीपाडवा मेळावा, राज ठाकरे काय बोलणार?.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गॅस तुटवड्यानंतर आणखी एक मोठं संकट
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गॅस तुटवड्यानंतर आणखी एक मोठं संकट.
मुंबईला गँगवॉरकडे जाऊ देणार नाही - CM फडणवीस
मुंबईला गँगवॉरकडे जाऊ देणार नाही - CM फडणवीस.